शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
5
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
6
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
7
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
8
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
9
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
10
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
11
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
12
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
13
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
14
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
15
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
16
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
17
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
18
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
19
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
20
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."

राज्यमार्गाच्या मालकीबाबत संभ्रम

By admin | Updated: January 18, 2017 00:43 IST

मनपाकडे असले तरीही मूळ मालकी व अस्तित्व हे राज्य मार्ग असल्याने मनपाने हे रस्ते स्वत:च्या ताब्यात घ्यावेत यासाठी लिकर लॉबी सक्रीय झाली आहे.

जळगाव: मनपा हद्दीतील चार राज्य मार्ग व राष्ट्रीय महामार्ग क्र.6 पासून 500 मीटरच्या आतील दारू विक्री दुकानांनाही न्यायालय व शासनाच्या आदेशानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने नोटीस बजावल्या आहेत. त्यामुळे देखभाल दुरूस्तीसाठी मनपाकडे असले तरीही मूळ मालकी व अस्तित्व हे राज्य मार्ग असल्याने मनपाने हे रस्ते स्वत:च्या ताब्यात घ्यावेत यासाठी लिकर लॉबी सक्रीय झाली आहे. दरम्यान हे रस्ते अवर्गीकृत होऊन मनपाकडे हस्तांतरीत झाले आहेत की नाहीत? याचे कोणतेच रेकॉर्ड मनपाकडे नसल्याचे सांगत हात वर करण्यात आले आहेत. त्यामुळे याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. राज्य व राष्ट्रीय महामार्गालगत 500 मीटरच्या अंतरातील सर्व दारू विक्री दुकाने, बियरबार हटविण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार शासनाने राज्य उत्पादन शुल्क विभागाला कारवाईचे आदेश दिले आहेत. मनपा हद्दीतून जाणारे व सध्या देखभाल दुरुस्तीसाठी मनपाच्या ताब्यात असलेले परंतू अवर्गीकृत घोषीत न झाल्याने आजही राज्यमार्ग म्हणून अस्तित्वात असलेल्या चार रस्त्यांवरील दारू विक्री दुकाने, बिअरबार, हॉटेल्स यांनाही नोटीस बजावण्यात आल्या आहेत. तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र.6 पासून 500 मीटर अंतरावर असलेल्या हॉटेल्सलाही नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्यात अगदी मोठे व नामांकित हॉटेल्सचाही समावेश असल्याचे समजते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने हे रस्ते अवर्गीकृत घोषित करून मनपाने हे रस्ते ताब्यात घ्यावेत, यासाठी लिकर लॉबी सक्रीय झाली आहे. हे आहेत रस्तेमूळ राज्यमार्ग दर्जा असलेले परंतू सध्या मनपाकडे देखभाल दुरूस्तीसाठी असलेल्या रस्त्यांमध्ये पुढील रस्त्यांचा समावेश आहे. 1) पहूर-इंदूर राज्य मार्ग (अजिंठा चौफुली-नेरीनाका-टॉवर चौक रस्ता) 2) शिरसोली रस्ता, 3)असोदा रस्ता,4) कानळदा रस्ता तसेच 5)चौपदरीकरणात वळण रस्ता मंजूर झाल्याने शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र.6 यांचा समावेश आहे. रस्ते मजबूतीकरणाची मागणीमनपाकडून मात्र मूळ मालकी सार्वजनिक बांधकाम विभागाची असलेल्या या रस्त्यांचे मजबुतीकरण करून ते मिळण्याची मागणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली जाणार आहे. तसेच शिवाजीनगर उड्डाणपूल, पिंप्राळा उड्डाणपूलासाठीही शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा. त्यासाठी येत्या अर्थसंकल्पात तरतूद करावी, अशी मागणी केली जाणार असल्याची माहिती महापौर नितीन लढ्ढा यांनी दिली.