शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
3
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
4
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
5
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
6
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
7
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
10
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
11
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
12
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
13
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
14
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
15
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
16
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
20
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!

राज्यमार्गाच्या मालकीबाबत संभ्रम

By admin | Updated: January 18, 2017 00:43 IST

मनपाकडे असले तरीही मूळ मालकी व अस्तित्व हे राज्य मार्ग असल्याने मनपाने हे रस्ते स्वत:च्या ताब्यात घ्यावेत यासाठी लिकर लॉबी सक्रीय झाली आहे.

जळगाव: मनपा हद्दीतील चार राज्य मार्ग व राष्ट्रीय महामार्ग क्र.6 पासून 500 मीटरच्या आतील दारू विक्री दुकानांनाही न्यायालय व शासनाच्या आदेशानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने नोटीस बजावल्या आहेत. त्यामुळे देखभाल दुरूस्तीसाठी मनपाकडे असले तरीही मूळ मालकी व अस्तित्व हे राज्य मार्ग असल्याने मनपाने हे रस्ते स्वत:च्या ताब्यात घ्यावेत यासाठी लिकर लॉबी सक्रीय झाली आहे. दरम्यान हे रस्ते अवर्गीकृत होऊन मनपाकडे हस्तांतरीत झाले आहेत की नाहीत? याचे कोणतेच रेकॉर्ड मनपाकडे नसल्याचे सांगत हात वर करण्यात आले आहेत. त्यामुळे याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. राज्य व राष्ट्रीय महामार्गालगत 500 मीटरच्या अंतरातील सर्व दारू विक्री दुकाने, बियरबार हटविण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार शासनाने राज्य उत्पादन शुल्क विभागाला कारवाईचे आदेश दिले आहेत. मनपा हद्दीतून जाणारे व सध्या देखभाल दुरुस्तीसाठी मनपाच्या ताब्यात असलेले परंतू अवर्गीकृत घोषीत न झाल्याने आजही राज्यमार्ग म्हणून अस्तित्वात असलेल्या चार रस्त्यांवरील दारू विक्री दुकाने, बिअरबार, हॉटेल्स यांनाही नोटीस बजावण्यात आल्या आहेत. तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र.6 पासून 500 मीटर अंतरावर असलेल्या हॉटेल्सलाही नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्यात अगदी मोठे व नामांकित हॉटेल्सचाही समावेश असल्याचे समजते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने हे रस्ते अवर्गीकृत घोषित करून मनपाने हे रस्ते ताब्यात घ्यावेत, यासाठी लिकर लॉबी सक्रीय झाली आहे. हे आहेत रस्तेमूळ राज्यमार्ग दर्जा असलेले परंतू सध्या मनपाकडे देखभाल दुरूस्तीसाठी असलेल्या रस्त्यांमध्ये पुढील रस्त्यांचा समावेश आहे. 1) पहूर-इंदूर राज्य मार्ग (अजिंठा चौफुली-नेरीनाका-टॉवर चौक रस्ता) 2) शिरसोली रस्ता, 3)असोदा रस्ता,4) कानळदा रस्ता तसेच 5)चौपदरीकरणात वळण रस्ता मंजूर झाल्याने शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र.6 यांचा समावेश आहे. रस्ते मजबूतीकरणाची मागणीमनपाकडून मात्र मूळ मालकी सार्वजनिक बांधकाम विभागाची असलेल्या या रस्त्यांचे मजबुतीकरण करून ते मिळण्याची मागणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली जाणार आहे. तसेच शिवाजीनगर उड्डाणपूल, पिंप्राळा उड्डाणपूलासाठीही शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा. त्यासाठी येत्या अर्थसंकल्पात तरतूद करावी, अशी मागणी केली जाणार असल्याची माहिती महापौर नितीन लढ्ढा यांनी दिली.