शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
3
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
4
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
5
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
6
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
7
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
8
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
9
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
10
खासदार प्रिया सरोज आणि क्रिकेटर रिंकू सिंह यांच्या लग्नाची तारीख टळली; समोर आलं मोठं कारण...
11
धारावीतील २४९ पैकी १६१ बांधकामे पात्र, पहिली यादी जाहीर; अपात्र लोकांना ५ जुलैपर्यंत संधी
12
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
13
सोहेलसोबत पळून जाऊन केलेलं लग्न, मग २४ वर्षांनी का झाला घटस्फोट? सीमा सजदेहने सांगितलं खरं कारण
14
कसली भारी दिसत्येय 'सैराट'मधील परश्याचा मित्र 'लंगड्या'ची गर्लफ्रेंड, सौंदर्यात नायिकांनाही देते टक्कर!
15
ठाणे: आणखी २ इमारतींवर हातोडा, मुंब्रा-शीळच्या बेकायदा इमारतींमधील रहिवासी रस्त्यावर
16
मध्य पूर्वेतील तणाव, हिंडगनबर्गचे आरोप अन् धारावी प्रकल्प; गौतम अदानी स्पष्टच बोलले
17
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
18
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
19
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
20
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?

शेतजमिनीच्या व्यवहारासाठी ‘शेतकरी दाखला’ सक्तीचा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:18 IST

गेल्या ८ ते १० वर्षांपासून शेतजमीन खरेदी करताना शेतकरी किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्यालाच शेतजमीन नावे घेता येते. यासाठी ...

गेल्या ८ ते १० वर्षांपासून शेतजमीन खरेदी करताना शेतकरी किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्यालाच शेतजमीन नावे घेता येते. यासाठी कुटुंबातील व्यक्तीचा ७/१२ उतारा ग्राह्य धरून शेतजमिनीचे व्यवहार नोंदणी करून हस्तांतरण केले जात आहे. असे असतानाच आता अचानक नवीन नियमाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ चे कलम ६३नुसार जी व्यक्ती शेतकरी नाही किंवा शेतमजूर नाही, अशा व्यक्तीच्या नावे जमीन हस्तांतरण होणार नाही व ते विधिग्राह्य असणार नाही, असे आदेश पारित झाले आहेत. मात्र शेतजमीन हस्तांतरण करताना शेतकरी कुटुंबातील सदस्यालादेखील शेतजमिनीचे व्यवहार करता येत होते. आता मात्र त्यावरही जाचक नियम लागू करण्यात आले आहेत.

कुटुंबात शेतजमीन नावे असूनही ज्याच्या नावे ७/१२ त्यालाच शेतजमीन घेणे सहज शक्य आहे. ज्याच्या नावे ७/१२ नाही त्याला शेतजमीन नावे करताना सक्षम अधिकारी म्हणजे उपविभागीय अधिकाऱ्यांकडील शेतकरी कुटुंबातील सदस्य, शेतमजूर म्हणून दाखला घेणे आता बंधनकारक आहे. यामुळे शेतजमिनीचे व्यवहार नोंदणी हस्तांतरण ठप्प झाले आहेत.

जाचक नियमामुळे अडचणीत वाढ

शेतकरी पुरावा, दाखला घेण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयात पुरेशी यंत्रणा व तत्काळ दाखला मिळण्यासाठी व्यवस्था व्हावी, यासाठी आता शेतजमीन नावे करण्यासाठी कागदपत्रे तयार करणे, दाखल करणे, वेळ देणे, खर्चवाढ व वारंवार खेटा माराव्या लागणार असून, एकापेक्षा जास्त टेबलवर फायली जाणार आहे. यामुळे हा नियम अधिक जाचक झाला आहे.

इच्छा असूनही शेतजमीन नावे करणे अवघड झाले आहे. त्यातच ‘तुकडेबंदी तुकडेजोड कायदा’ आदी अडचणी असल्याने शेतजमिनीचे व्यवहार रखडले आहेत.

शेतजमीन व्यवहार नोंदणीसाठी आता सक्षम अधिकाऱ्याचा शेतकरी, शेतमजूर दाखला असणे किंवा नावे ७/१२ असणे बंधनकारक असून, त्याशिवाय शेतजमिनीचे व्यवहार दस्त नोंदणी होणार नाही.

डी. व्ही. बाविस्कर, प्रभारी दुय्यम निबंधक, पाचोरा

कुटुंबात शेतजमीन असणे आवश्यक आहे, हे ठीक आहे. मात्र कुटुंबातील सदस्य शेतकरी असल्याचा दाखला प्रांताधिकारी यांच्याकडून घेणे बंधनकारक केल्याने शेतकऱ्यांचा वेळ व पैसा खर्च होऊन व्यवहाराला अडचण निर्माण झाली आहे. हा नियम रद्द झाला पाहिजे.

-राजेेंद्र महाजन, तंटामुक्त समिती अध्यक्ष, शेतकरी, पिंपळगाव हरे, ता. पाचोरा