शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने प्रवाशांना उडवले, तिघांची प्रकृती गंभीर; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
4
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
5
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
6
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
7
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
8
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
9
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
10
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
11
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
12
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
13
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
14
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
15
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
16
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
17
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
18
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
19
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
20
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार

शेतजमिनीच्या व्यवहारासाठी ‘शेतकरी दाखला’ सक्तीचा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:18 IST

गेल्या ८ ते १० वर्षांपासून शेतजमीन खरेदी करताना शेतकरी किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्यालाच शेतजमीन नावे घेता येते. यासाठी ...

गेल्या ८ ते १० वर्षांपासून शेतजमीन खरेदी करताना शेतकरी किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्यालाच शेतजमीन नावे घेता येते. यासाठी कुटुंबातील व्यक्तीचा ७/१२ उतारा ग्राह्य धरून शेतजमिनीचे व्यवहार नोंदणी करून हस्तांतरण केले जात आहे. असे असतानाच आता अचानक नवीन नियमाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ चे कलम ६३नुसार जी व्यक्ती शेतकरी नाही किंवा शेतमजूर नाही, अशा व्यक्तीच्या नावे जमीन हस्तांतरण होणार नाही व ते विधिग्राह्य असणार नाही, असे आदेश पारित झाले आहेत. मात्र शेतजमीन हस्तांतरण करताना शेतकरी कुटुंबातील सदस्यालादेखील शेतजमिनीचे व्यवहार करता येत होते. आता मात्र त्यावरही जाचक नियम लागू करण्यात आले आहेत.

कुटुंबात शेतजमीन नावे असूनही ज्याच्या नावे ७/१२ त्यालाच शेतजमीन घेणे सहज शक्य आहे. ज्याच्या नावे ७/१२ नाही त्याला शेतजमीन नावे करताना सक्षम अधिकारी म्हणजे उपविभागीय अधिकाऱ्यांकडील शेतकरी कुटुंबातील सदस्य, शेतमजूर म्हणून दाखला घेणे आता बंधनकारक आहे. यामुळे शेतजमिनीचे व्यवहार नोंदणी हस्तांतरण ठप्प झाले आहेत.

जाचक नियमामुळे अडचणीत वाढ

शेतकरी पुरावा, दाखला घेण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयात पुरेशी यंत्रणा व तत्काळ दाखला मिळण्यासाठी व्यवस्था व्हावी, यासाठी आता शेतजमीन नावे करण्यासाठी कागदपत्रे तयार करणे, दाखल करणे, वेळ देणे, खर्चवाढ व वारंवार खेटा माराव्या लागणार असून, एकापेक्षा जास्त टेबलवर फायली जाणार आहे. यामुळे हा नियम अधिक जाचक झाला आहे.

इच्छा असूनही शेतजमीन नावे करणे अवघड झाले आहे. त्यातच ‘तुकडेबंदी तुकडेजोड कायदा’ आदी अडचणी असल्याने शेतजमिनीचे व्यवहार रखडले आहेत.

शेतजमीन व्यवहार नोंदणीसाठी आता सक्षम अधिकाऱ्याचा शेतकरी, शेतमजूर दाखला असणे किंवा नावे ७/१२ असणे बंधनकारक असून, त्याशिवाय शेतजमिनीचे व्यवहार दस्त नोंदणी होणार नाही.

डी. व्ही. बाविस्कर, प्रभारी दुय्यम निबंधक, पाचोरा

कुटुंबात शेतजमीन असणे आवश्यक आहे, हे ठीक आहे. मात्र कुटुंबातील सदस्य शेतकरी असल्याचा दाखला प्रांताधिकारी यांच्याकडून घेणे बंधनकारक केल्याने शेतकऱ्यांचा वेळ व पैसा खर्च होऊन व्यवहाराला अडचण निर्माण झाली आहे. हा नियम रद्द झाला पाहिजे.

-राजेेंद्र महाजन, तंटामुक्त समिती अध्यक्ष, शेतकरी, पिंपळगाव हरे, ता. पाचोरा