शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
2
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
3
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
4
"तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
5
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
6
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
7
Operation Sindoor Live Updates: 'पाकिस्तानला मेसेज मिळालाय, आता थेट तुमच्या मुख्यालयावरच हल्ला करू'
8
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
9
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
10
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
11
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
12
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
13
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
14
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
15
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
16
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
17
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
18
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
19
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
20
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती

यावलच्या अतिरिक्त साठवण तलावाचे काम पूर्णत्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:12 IST

अतिरिक्त साठवण तलावाचे काम अंतिम टप्प्यात यावल शहराचा भविष्यातील ३० वर्षांचा पाणी प्रश्न सुटणार यावल : ...

अतिरिक्त साठवण तलावाचे काम अंतिम टप्प्यात

यावल शहराचा भविष्यातील ३० वर्षांचा पाणी प्रश्न सुटणार

यावल : शहरास सध्या पाणीपुरवठा होत असलेल्या साठवण तलावालगतच अतिरिक्त साठवण तलावाचे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे. दोन्ही साठवण तलावांत सुमारे पाच महिने पुरेल एवढा साठा राहणार असल्याने शहराचा सुमारे ३० वर्षांचा पाणी प्रश्न सुटणार असल्याचे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अतुल पाटील यांनी बुधवारी सायंकाळी साठवण तलावावर पत्रकारांना माहिती देताना सांगितले.

सुमारे २२ वर्षांपूर्वी येथील जुन्या भालशिव रस्त्यावर हतनूर कालव्यालगत शहरास सुमारे तीन महिने पुरेल एवढ्या साठ्याचा तलाव करण्यात आला होता. मात्र, कालांतराने तलावास लागलेली गळती आणि गाळाचे प्रमाण वाढल्याने हा साठा निम्म्यावरच आला. एखाद्या वर्षी पावसाळा कमी झाल्याने हतनूरमधील पाणीपातळी खालावते. त्यामुळे उन्हाळ्यात आवर्तन सुटण्यास विलंब होतो. पर्यायाने शहरवासीयांना पाणीटंचाईस सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेता पालिकेने याच तलावालगत दोन कोटी ८७ लाख रुपये किमतीच्या १०० एमएललडी क्षमतेचा पाणीसाठा होणारा अतिरिक्त तलाव तयार करण्याच्या कामास सुरुवात केली आहे. पूर्वीचा ३०० एलडी आणि हा १०० एमएलडी, असा ४०० एमएलडी साठा आता शहरास उपलब्ध राहणार असून, हा साठा शहरास सुमारे पाच महिने पुरणार आहे व भविष्यात लोकसंख्या वाढली तरी तीस वर्षे शहराची पाणीटंचाईचा प्रश्न सुटणार असल्याचे नगरसेवक पाटील यांनी

सांगितले.

२०० मीटर लांब, ५० मीटर रुंद आणि ११ मीटरची खोली असलेल्या या तलावाचे काम आधुनिक पद्धतीने करण्यात आले आहे. या संपूर्ण तलावावर ३००

मायक्रॉन जाडीची एचडीपीई ताडपत्री अंथरण्यात आली आहे. यामुळे तलावातील पाण्याचा जमिनीच्या पृष्ठभागाशी संपर्क येणार नसल्याने पाण्याची गळतीच

होणार नाही, असेही पाटील यांनी सांगितले. पूर्वी शहरास एकमेव साठवण तलाव

असल्याने तलावातून होत असलेल्या पाण्याच्या गळतीचे, तसेच साचलेला गाळ

काढण्याचे काम पालिका करू शकत नव्हती. आता मात्र जुन्या तलावाची दुरुस्ती

करता येईल व भविष्यात पाणीटंचाईचा प्रश्न उद्भवणार नसल्याचे पाटील यांनी सांगितले. तलावाचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून, केवळ इनलेट व आउटलेटचे

पाइपलाइनचे काम बाकी आहे. ते आगामी आठ दिवसांत पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी त्यांच्यासमवेत माजी उपनगराध्यक्ष प्रा. मुकेश येवले, राकेश कोलते, समीर शेख, गणेश महाजन, डॉ. युवराज चौधरी, दिलीप वाणी, राजू फालक, धीरज महाजन, एजाज पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.