शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

यावलच्या अतिरिक्त साठवण तलावाचे काम पूर्णत्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:12 IST

अतिरिक्त साठवण तलावाचे काम अंतिम टप्प्यात यावल शहराचा भविष्यातील ३० वर्षांचा पाणी प्रश्न सुटणार यावल : ...

अतिरिक्त साठवण तलावाचे काम अंतिम टप्प्यात

यावल शहराचा भविष्यातील ३० वर्षांचा पाणी प्रश्न सुटणार

यावल : शहरास सध्या पाणीपुरवठा होत असलेल्या साठवण तलावालगतच अतिरिक्त साठवण तलावाचे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे. दोन्ही साठवण तलावांत सुमारे पाच महिने पुरेल एवढा साठा राहणार असल्याने शहराचा सुमारे ३० वर्षांचा पाणी प्रश्न सुटणार असल्याचे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अतुल पाटील यांनी बुधवारी सायंकाळी साठवण तलावावर पत्रकारांना माहिती देताना सांगितले.

सुमारे २२ वर्षांपूर्वी येथील जुन्या भालशिव रस्त्यावर हतनूर कालव्यालगत शहरास सुमारे तीन महिने पुरेल एवढ्या साठ्याचा तलाव करण्यात आला होता. मात्र, कालांतराने तलावास लागलेली गळती आणि गाळाचे प्रमाण वाढल्याने हा साठा निम्म्यावरच आला. एखाद्या वर्षी पावसाळा कमी झाल्याने हतनूरमधील पाणीपातळी खालावते. त्यामुळे उन्हाळ्यात आवर्तन सुटण्यास विलंब होतो. पर्यायाने शहरवासीयांना पाणीटंचाईस सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेता पालिकेने याच तलावालगत दोन कोटी ८७ लाख रुपये किमतीच्या १०० एमएललडी क्षमतेचा पाणीसाठा होणारा अतिरिक्त तलाव तयार करण्याच्या कामास सुरुवात केली आहे. पूर्वीचा ३०० एलडी आणि हा १०० एमएलडी, असा ४०० एमएलडी साठा आता शहरास उपलब्ध राहणार असून, हा साठा शहरास सुमारे पाच महिने पुरणार आहे व भविष्यात लोकसंख्या वाढली तरी तीस वर्षे शहराची पाणीटंचाईचा प्रश्न सुटणार असल्याचे नगरसेवक पाटील यांनी

सांगितले.

२०० मीटर लांब, ५० मीटर रुंद आणि ११ मीटरची खोली असलेल्या या तलावाचे काम आधुनिक पद्धतीने करण्यात आले आहे. या संपूर्ण तलावावर ३००

मायक्रॉन जाडीची एचडीपीई ताडपत्री अंथरण्यात आली आहे. यामुळे तलावातील पाण्याचा जमिनीच्या पृष्ठभागाशी संपर्क येणार नसल्याने पाण्याची गळतीच

होणार नाही, असेही पाटील यांनी सांगितले. पूर्वी शहरास एकमेव साठवण तलाव

असल्याने तलावातून होत असलेल्या पाण्याच्या गळतीचे, तसेच साचलेला गाळ

काढण्याचे काम पालिका करू शकत नव्हती. आता मात्र जुन्या तलावाची दुरुस्ती

करता येईल व भविष्यात पाणीटंचाईचा प्रश्न उद्भवणार नसल्याचे पाटील यांनी सांगितले. तलावाचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून, केवळ इनलेट व आउटलेटचे

पाइपलाइनचे काम बाकी आहे. ते आगामी आठ दिवसांत पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी त्यांच्यासमवेत माजी उपनगराध्यक्ष प्रा. मुकेश येवले, राकेश कोलते, समीर शेख, गणेश महाजन, डॉ. युवराज चौधरी, दिलीप वाणी, राजू फालक, धीरज महाजन, एजाज पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.