शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

यावलच्या अतिरिक्त साठवण तलावाचे काम पूर्णत्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:12 IST

अतिरिक्त साठवण तलावाचे काम अंतिम टप्प्यात यावल शहराचा भविष्यातील ३० वर्षांचा पाणी प्रश्न सुटणार यावल : ...

अतिरिक्त साठवण तलावाचे काम अंतिम टप्प्यात

यावल शहराचा भविष्यातील ३० वर्षांचा पाणी प्रश्न सुटणार

यावल : शहरास सध्या पाणीपुरवठा होत असलेल्या साठवण तलावालगतच अतिरिक्त साठवण तलावाचे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे. दोन्ही साठवण तलावांत सुमारे पाच महिने पुरेल एवढा साठा राहणार असल्याने शहराचा सुमारे ३० वर्षांचा पाणी प्रश्न सुटणार असल्याचे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अतुल पाटील यांनी बुधवारी सायंकाळी साठवण तलावावर पत्रकारांना माहिती देताना सांगितले.

सुमारे २२ वर्षांपूर्वी येथील जुन्या भालशिव रस्त्यावर हतनूर कालव्यालगत शहरास सुमारे तीन महिने पुरेल एवढ्या साठ्याचा तलाव करण्यात आला होता. मात्र, कालांतराने तलावास लागलेली गळती आणि गाळाचे प्रमाण वाढल्याने हा साठा निम्म्यावरच आला. एखाद्या वर्षी पावसाळा कमी झाल्याने हतनूरमधील पाणीपातळी खालावते. त्यामुळे उन्हाळ्यात आवर्तन सुटण्यास विलंब होतो. पर्यायाने शहरवासीयांना पाणीटंचाईस सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेता पालिकेने याच तलावालगत दोन कोटी ८७ लाख रुपये किमतीच्या १०० एमएललडी क्षमतेचा पाणीसाठा होणारा अतिरिक्त तलाव तयार करण्याच्या कामास सुरुवात केली आहे. पूर्वीचा ३०० एलडी आणि हा १०० एमएलडी, असा ४०० एमएलडी साठा आता शहरास उपलब्ध राहणार असून, हा साठा शहरास सुमारे पाच महिने पुरणार आहे व भविष्यात लोकसंख्या वाढली तरी तीस वर्षे शहराची पाणीटंचाईचा प्रश्न सुटणार असल्याचे नगरसेवक पाटील यांनी

सांगितले.

२०० मीटर लांब, ५० मीटर रुंद आणि ११ मीटरची खोली असलेल्या या तलावाचे काम आधुनिक पद्धतीने करण्यात आले आहे. या संपूर्ण तलावावर ३००

मायक्रॉन जाडीची एचडीपीई ताडपत्री अंथरण्यात आली आहे. यामुळे तलावातील पाण्याचा जमिनीच्या पृष्ठभागाशी संपर्क येणार नसल्याने पाण्याची गळतीच

होणार नाही, असेही पाटील यांनी सांगितले. पूर्वी शहरास एकमेव साठवण तलाव

असल्याने तलावातून होत असलेल्या पाण्याच्या गळतीचे, तसेच साचलेला गाळ

काढण्याचे काम पालिका करू शकत नव्हती. आता मात्र जुन्या तलावाची दुरुस्ती

करता येईल व भविष्यात पाणीटंचाईचा प्रश्न उद्भवणार नसल्याचे पाटील यांनी सांगितले. तलावाचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून, केवळ इनलेट व आउटलेटचे

पाइपलाइनचे काम बाकी आहे. ते आगामी आठ दिवसांत पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी त्यांच्यासमवेत माजी उपनगराध्यक्ष प्रा. मुकेश येवले, राकेश कोलते, समीर शेख, गणेश महाजन, डॉ. युवराज चौधरी, दिलीप वाणी, राजू फालक, धीरज महाजन, एजाज पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.