शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मुर्दापूर धरण उंची वाढ तत्काळ पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:21 IST

नशिराबाद : लघु पाटबंधारे अंतर्गत येथून जवळच असलेला व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर लाभ होऊ शकणाऱ्या मुर्दापूर धरणाची रखडलेली उंची ...

नशिराबाद : लघु पाटबंधारे अंतर्गत येथून जवळच असलेला व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर लाभ होऊ शकणाऱ्या मुर्दापूर धरणाची रखडलेली उंची वाढ तत्काळ मार्गी लागावी, अशा मागणीचे निवेदन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना नशिराबादचे माजी सरपंच पंकज महाजन यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांनी दिले. उंची वाढ बाबत पाठपुरावा करून मार्ग काढण्याची ग्वाही पाटील यांनी दिली.

निवेदनावर माजी सरपंच पंकज महाजन,विकास पाटील सै.बरकत अली, प्रकाश महाजन, सय्यद नवाब अली, संतोष चौधरी, चंद्रकांत नारखेडे, चंद्रकांत पाटील, राजू सुरमारे, डिगंबर रोटे, विजय पाटील, किरण चौधरी, देवेंद्र माळी, सचिन भोळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहे.

मुर्दापूर धरणाची उंची वाढ प्रस्तावाचे ९५ टक्के काम झाले असल्याने सांडव्याची व जमिनीचा योग्य तो मोबदला शेतकऱ्यांना देऊन लघु पाटबंधारे तलाव नशिराबादचे रखडलेले काम पूर्णत्वास यावे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होईल अशी अपेक्षा निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. मुर्दापूर धरण प्रकल्पास १९८८ मध्ये मान्यता मिळाली. १९९६-९७ मध्ये काम पूर्णत्वास आले. तलावाची क्षमता ३.१२३ टीएमसी पाणी साठवण इतकी असून साधारणत: ५६५ हेक्टर जमीन ओलिताखाली येते. त्यामुळे सदर भागातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ होण्यास मदत झाली. मात्र उंची वाढीच्या प्रस्तावास मूळ प्रशासकीय मान्यता १९९९ मध्ये मिळाली असून सदर उंची वाढण्याच्या कामात केवळ सांडव्याचे काम वगळता सर्व काम २०१६-१७ मध्ये सुरू होऊन २०१७-१८ मध्ये पूर्ण करण्यात आले आहे. सांडव्याचे काम पूर्ण झाल्यावर उंची वाढीची संकल्पना प्रत्यक्षात येण्यास मदत होईल. त्यामुळे तलावाची पाणी साठवण्याची क्षमता ६.७४ टीएमसी होणार आहे. ९४२ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल. या प्रकल्पासाठी लागणारी जमीन देण्यास शेतकरी तयार असून त्यांना योग्य तो मोबदला देण्यात यावा. प्रकल्पासाठी लागणारा जमिनीचा मोबदला हा प्रकल्पात झालेल्या विलंबामुळे जास्त होत असल्याने उंची वाढीचा प्रस्ताव रद्द करण्याची शिफारस या पूर्वीच्या कार्यकारी संचालकांनी शासनाकडे केली असल्याने नशिराबाद परिसरातील शेतकऱ्यांना समृद्ध करणारे काम होत नसल्याचे निवेदनात नमूद केले आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी याबाबत तत्काळ पाठपुरावा करून उंची वाढ प्रकल्प पूर्णत्वास न्यावे व शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. शेळगाव बॅरेज प्रकल्प तत्काळ गती देऊन काम पूर्णत्वास न्यावे अशी मागणीही निवेदनात केली आहे.