शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

मुर्दापूर धरण उंची वाढ तत्काळ पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:21 IST

नशिराबाद : लघु पाटबंधारे अंतर्गत येथून जवळच असलेला व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर लाभ होऊ शकणाऱ्या मुर्दापूर धरणाची रखडलेली उंची ...

नशिराबाद : लघु पाटबंधारे अंतर्गत येथून जवळच असलेला व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर लाभ होऊ शकणाऱ्या मुर्दापूर धरणाची रखडलेली उंची वाढ तत्काळ मार्गी लागावी, अशा मागणीचे निवेदन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना नशिराबादचे माजी सरपंच पंकज महाजन यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांनी दिले. उंची वाढ बाबत पाठपुरावा करून मार्ग काढण्याची ग्वाही पाटील यांनी दिली.

निवेदनावर माजी सरपंच पंकज महाजन,विकास पाटील सै.बरकत अली, प्रकाश महाजन, सय्यद नवाब अली, संतोष चौधरी, चंद्रकांत नारखेडे, चंद्रकांत पाटील, राजू सुरमारे, डिगंबर रोटे, विजय पाटील, किरण चौधरी, देवेंद्र माळी, सचिन भोळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहे.

मुर्दापूर धरणाची उंची वाढ प्रस्तावाचे ९५ टक्के काम झाले असल्याने सांडव्याची व जमिनीचा योग्य तो मोबदला शेतकऱ्यांना देऊन लघु पाटबंधारे तलाव नशिराबादचे रखडलेले काम पूर्णत्वास यावे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होईल अशी अपेक्षा निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. मुर्दापूर धरण प्रकल्पास १९८८ मध्ये मान्यता मिळाली. १९९६-९७ मध्ये काम पूर्णत्वास आले. तलावाची क्षमता ३.१२३ टीएमसी पाणी साठवण इतकी असून साधारणत: ५६५ हेक्टर जमीन ओलिताखाली येते. त्यामुळे सदर भागातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ होण्यास मदत झाली. मात्र उंची वाढीच्या प्रस्तावास मूळ प्रशासकीय मान्यता १९९९ मध्ये मिळाली असून सदर उंची वाढण्याच्या कामात केवळ सांडव्याचे काम वगळता सर्व काम २०१६-१७ मध्ये सुरू होऊन २०१७-१८ मध्ये पूर्ण करण्यात आले आहे. सांडव्याचे काम पूर्ण झाल्यावर उंची वाढीची संकल्पना प्रत्यक्षात येण्यास मदत होईल. त्यामुळे तलावाची पाणी साठवण्याची क्षमता ६.७४ टीएमसी होणार आहे. ९४२ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल. या प्रकल्पासाठी लागणारी जमीन देण्यास शेतकरी तयार असून त्यांना योग्य तो मोबदला देण्यात यावा. प्रकल्पासाठी लागणारा जमिनीचा मोबदला हा प्रकल्पात झालेल्या विलंबामुळे जास्त होत असल्याने उंची वाढीचा प्रस्ताव रद्द करण्याची शिफारस या पूर्वीच्या कार्यकारी संचालकांनी शासनाकडे केली असल्याने नशिराबाद परिसरातील शेतकऱ्यांना समृद्ध करणारे काम होत नसल्याचे निवेदनात नमूद केले आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी याबाबत तत्काळ पाठपुरावा करून उंची वाढ प्रकल्प पूर्णत्वास न्यावे व शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. शेळगाव बॅरेज प्रकल्प तत्काळ गती देऊन काम पूर्णत्वास न्यावे अशी मागणीही निवेदनात केली आहे.