शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

कळवळा, आततायीपणा की राजकारण...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:10 IST

थकबाकीदार शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट केल्याने थेट चाळीसगावहून शेतकऱ्यांना सोबत घेत जळगावात येऊन महावितरणच्या अधिकाऱ्याला कार्यालयातच खुर्चीला बांधून ठेवण्याचा, ...

थकबाकीदार शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट केल्याने थेट चाळीसगावहून शेतकऱ्यांना सोबत घेत जळगावात येऊन महावितरणच्या अधिकाऱ्याला कार्यालयातच खुर्चीला बांधून ठेवण्याचा, एवढचे नव्हे तर शिविगाळ करीत बांधलेल्या खुर्चीसह त्या अधिकाऱ्याला बाहेर नेण्याचा उद्योग भाजपचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केला. त्यामुळे हा शेतकऱ्यांचा खरोखर कळवळा आहे?, आततायीपणा आहे? की राजकारण? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

कोरानामुळे अनेक लहान-मोठे उद्योग बंद पडल्याने अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. तसेच लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांच्या मालालाही भाव न मिळाल्याने त्यांचेही नुकसान झाले. त्यातच आता शासनाच्या आदेशावरून महावितरणने चालू तीन महिन्यांची थकबाकी वसुलीची मोहीम सुरू केली आहे. ती न भरणाऱ्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट केले जात आहे. चाळीसगाव तालुक्यात सुमारे ७ हजार शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट केल्याचा आमदार चव्हाण यांचा दावा आहे. हाताशी आलेले शेतातील पीक पाण्याअभावी हातचे जाण्याची भीती असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे आमदार चव्हाण यांनी लोकप्रतिनिधी म्हणून शेतकऱ्यांची बाजू घेणे योग्यच आहे. मात्र कायदा हातात घेण्याची, त्यातही वरिष्ठांच्या आदेशावर चालणाऱ्या अधिकाऱ्याला वेठीस धरून जाब विचारणे, शिविगाळ करणे, खुर्चीला बांधून ठेवण्याच्या कृतीचे समर्थन होऊ शकत नाही. आमदार म्हणून त्यांनी आंदोलन केले असते किंवा ज्या शेख नामक अधीक्षक अभियंत्यावर राग काढत त्यांना खुर्चीला बांधून ठेवले, त्यांच्या वरिष्ठांशी चर्चा करून शेख हे मनमानी करीत आहेत की आदेशाचे पालन ? याची खातरजमा करून घेणे अपेक्षित होते. जर शेख यांनी मनमानी केल्याचे निदर्शनास आले असते तर त्यांच्यावर कारवाईसाठी वरिष्ठांकडे आग्रह धरणे उचित ठरले असते. मात्र तसे न करता कायदा हातात घेत स्वत:ला शेतकऱ्यांच्या नजरेत हिरो ठरविण्याची खेळी आमदार चव्हाण यांनी खेळली. याबाबत भाजपच्या नेतेमंडळींनी देखील आतापर्यंत चकार शब्द काढलेला नाही.

मात्र दुसरीकडे राज्य शासनाकडेही महसूल नसल्याने व कोरोना उपाययोजनांवर मोठ्या प्रमाणावर खर्च होत असल्याने महसूल वाढविण्यासाठी वसुली मोहीम राबवित आहे. आमदार चव्हाण यांनी शेतकऱ्यांची व्यथा शासनस्तरावर मांडून त्यांना दिलासा मिळवून द्यायला हवा होता. मात्र तसे न करता त्यांनी सवंग लोकप्रियतेचा मार्ग निवडल्याचीच चर्चा सध्या सुरू आहे. मात्र त्यामुळे शेतकऱ्यांना कितपत लाभ होईल? त्याबाबत अनिश्चितता आहे.