शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कळवळा, आततायीपणा की राजकारण...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:10 IST

थकबाकीदार शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट केल्याने थेट चाळीसगावहून शेतकऱ्यांना सोबत घेत जळगावात येऊन महावितरणच्या अधिकाऱ्याला कार्यालयातच खुर्चीला बांधून ठेवण्याचा, ...

थकबाकीदार शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट केल्याने थेट चाळीसगावहून शेतकऱ्यांना सोबत घेत जळगावात येऊन महावितरणच्या अधिकाऱ्याला कार्यालयातच खुर्चीला बांधून ठेवण्याचा, एवढचे नव्हे तर शिविगाळ करीत बांधलेल्या खुर्चीसह त्या अधिकाऱ्याला बाहेर नेण्याचा उद्योग भाजपचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केला. त्यामुळे हा शेतकऱ्यांचा खरोखर कळवळा आहे?, आततायीपणा आहे? की राजकारण? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

कोरानामुळे अनेक लहान-मोठे उद्योग बंद पडल्याने अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. तसेच लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांच्या मालालाही भाव न मिळाल्याने त्यांचेही नुकसान झाले. त्यातच आता शासनाच्या आदेशावरून महावितरणने चालू तीन महिन्यांची थकबाकी वसुलीची मोहीम सुरू केली आहे. ती न भरणाऱ्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट केले जात आहे. चाळीसगाव तालुक्यात सुमारे ७ हजार शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट केल्याचा आमदार चव्हाण यांचा दावा आहे. हाताशी आलेले शेतातील पीक पाण्याअभावी हातचे जाण्याची भीती असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे आमदार चव्हाण यांनी लोकप्रतिनिधी म्हणून शेतकऱ्यांची बाजू घेणे योग्यच आहे. मात्र कायदा हातात घेण्याची, त्यातही वरिष्ठांच्या आदेशावर चालणाऱ्या अधिकाऱ्याला वेठीस धरून जाब विचारणे, शिविगाळ करणे, खुर्चीला बांधून ठेवण्याच्या कृतीचे समर्थन होऊ शकत नाही. आमदार म्हणून त्यांनी आंदोलन केले असते किंवा ज्या शेख नामक अधीक्षक अभियंत्यावर राग काढत त्यांना खुर्चीला बांधून ठेवले, त्यांच्या वरिष्ठांशी चर्चा करून शेख हे मनमानी करीत आहेत की आदेशाचे पालन ? याची खातरजमा करून घेणे अपेक्षित होते. जर शेख यांनी मनमानी केल्याचे निदर्शनास आले असते तर त्यांच्यावर कारवाईसाठी वरिष्ठांकडे आग्रह धरणे उचित ठरले असते. मात्र तसे न करता कायदा हातात घेत स्वत:ला शेतकऱ्यांच्या नजरेत हिरो ठरविण्याची खेळी आमदार चव्हाण यांनी खेळली. याबाबत भाजपच्या नेतेमंडळींनी देखील आतापर्यंत चकार शब्द काढलेला नाही.

मात्र दुसरीकडे राज्य शासनाकडेही महसूल नसल्याने व कोरोना उपाययोजनांवर मोठ्या प्रमाणावर खर्च होत असल्याने महसूल वाढविण्यासाठी वसुली मोहीम राबवित आहे. आमदार चव्हाण यांनी शेतकऱ्यांची व्यथा शासनस्तरावर मांडून त्यांना दिलासा मिळवून द्यायला हवा होता. मात्र तसे न करता त्यांनी सवंग लोकप्रियतेचा मार्ग निवडल्याचीच चर्चा सध्या सुरू आहे. मात्र त्यामुळे शेतकऱ्यांना कितपत लाभ होईल? त्याबाबत अनिश्चितता आहे.