शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

आगामी काळात दारूबंदीसाठी आंदोलन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 12:48 IST

सप्टेबर महिन्यात रथयात्रा काढणार

ठळक मुद्दे भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांची ‘लोकमत’ ला माहिती

जळगाव : एक - दोन ठिकाणी दारूबंदी करून उपयोग नाही तर संपूर्ण महाराष्टÑ दारूमुक्त झाला पाहीजे, यासाठी भविष्यात आंदोलन करण्यात येईल,त्याचाच एक भाग म्हणून सप्टेंबर महिन्यात रथयात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी ‘लोकमत’ भेटीप्रसंगी दिली.जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर जळगावात आयोजित कार्यक्रमासाठी तृप्ती देसाई व भूमाता ब्रिगेडच्या सदस्या जळगावात आल्या आहेत. गुरूवारी दुपारी त्यांनी ‘लोकमत’ कार्यालयास भेट दिली. यावेळी निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले. या भेटीत तृप्ती देसाई यांनी आपल्या आंदोलनांबाबतचे विविध अनुभव कथन केले. त्यांच्याशी झालेल्या गप्पा प्रश्नोत्तर स्वरुपात.प्रश्न - अनेक महिला मंदिरातील प्रवेशाच्या विषयांवर आपणाशी जुळल्या आहेत. आंदोलनाची भूमिका त्यांना कशा पटवून देता ?तृप्ती देसाई - शनिशिंगणापूरसह विविध मंदिरात महिलांना प्रवेशाचा विषय आला, त्यावेळी अगोदर खूप विरोध झाला. धर्माशी जुळलेला विषय असल्यामुळे धमक्या आल्या, बदनामी केली गेली. जिच्या उदरातून प्रत्यक्ष देवाने जन्म घेतला तिला मंदिरात जायला विरोध का? मग स्त्री- पुरूष समानता कोठे आहे? कुठलेली काम करताना इच्छाशक्ती प्रबळ असावी हे महिलांना पटवून दिले व त्यांनाही ही ते पटत गेले.प्रश्न - बरोबर असलेल्यांची मानसिक तयारी कशी करून घेता ?तृप्ती देसाई : मंदिरात महिला व पुरूष जोडीने जातात. पण दर्शनास केवळ पुरूष मध्ये जातो. हा सन्मान स्त्रीला का नाही? मग मंदिर असो की दर्गा, गुरूद्वारा वा मशिद प्रत्येक ठिकाणी महिलेला समान वागणूक पान १ वरूनमिळावी हे आपण सर्वांना पटवून दिले.प्रश्न - लोकांचे प्रबोधन आपण करत आहात, त्याला आता प्रतिसाद कसा आहे ?तृप्ती देसाई - २०१३ पासून मंदिरांमध्ये महिलांना प्रवेशासाठी आपण काम करत आहोत. ग्रामीण भागातील नागरिक तर चूल बंद ठेऊ, पण तुमच्या लढ्यात आमच्या घरातील महिलांनाही सहभागी करून घ्या, असे सांगतात. हीच या आंदोलनाच्या यशाची पावती आहे. एक मजबूत संघटन उभे रहात आहे. १२ हजार महिला आज आपल्या बरोबर आहेत.प्रश्न - भविष्यातील आपल्या आंदोलनाची दिशा काय असेल ?तृप्ती देसाई - नजीकच्या गुजरात राज्यात दारूबंदी होऊ शकते मग महाराष्टÑात का नाही? मुख्यमंत्र्यांची भेट झाली, त्यावेळी आपण त्यांना म्हणालो, आपण दारू विक्रीतून महसूल जमा करतात पण तो या राज्यातील महिलांचा तळतळाट आहे. भविष्यात आपण राज्य दारूमुक्तीसाठी आंदोलन करणार आहोत. दारूमुक्ती शिवाय आपण थांबणार नाही.प्रश्न - मंदिरांच्या संस्थानात मोठ्या प्रमाणात पैसा जमा होतो. एक पर्यायी यंत्रणाच येथे असते, याबाबत काय सांगाल ?तृप्ती देसाई - खरे आहे, मंदिरांमध्ये करोडोे रूपये जमा होतात. आपण म्हणतो की मंदिरांमध्ये ५० टक्के पुजारी या महिला असाव्यात. महामंडलेश्वर उपाधी महिलांना का मिळत नाही? मंदिरांमधील ट्रस्टींमध्येही ५० टक्के महिला असाव्यात तेथील व्यवहारही चांगले होतील, असा मला विश्वास आहे. तसेच जमा होणारा निधी हा ८० टक्के सरकार जमा होऊन त्यातून दीन, दलित व अडचणीतील शेतकऱ्यांना, शिक्षणापासून वंचित मुलींना मदत मिळावी.शेकडो महिलांची साखळीशबरीमाला मंदिर प्रवेशासाठी जेव्हा आंदोलनाचा विषय झाला त्यावेळी केरळात मोठा प्रतिसाद मिळाला. मंदिर प्रवेशासाठीच्या भूमिकेतून तेथील शेकडो महिला एकत्र आल्या व मानवी साखळी तयार करण्यात आली. मात्र तेथील विरोधाची तीव्रता लक्षात घेऊन प्रवेश टाळला. भविष्यात गनिमी काव्याने मंदिरात प्रवेश करूच, असा विश्वासही देसाई यांनी व्यक्त केला.यावेळी त्यांच्या समवेत पती प्रशांत देसाई, वासंती दिघे (जळगाव) यांच्यासह माधवी टोम्पे, मीनाक्षी दोंदे, स्वाती वट्टमवार, हिराबाई पवार, राजश्री पाटील, सविता राऊत, माया कांबळे, सागर कचरे, विक्रांत पवार आदी उपस्थित होते.‘ती’ च्या गणपपतीमुळे मिळाली प्रेरणा‘लोकमत’ने सुरु केलेल्या ‘ती’ च्या गणपतीमुळे आपल्याला आंदोलनाची प्रेरणा मिळाली. आपल्या आंदोलनास प्रोत्साहनाची गरज होती. नगर येथे ‘लोकमत’ ने ती भूमिका अतिशय चांगल्या पद्धतीने मांडली. परिणामी आंदोलनास प्रतिसाद वाढत गेला. ग्रामीण भागात आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठीचे काम ‘लोकमत’ ने केले. यामुळे आंदोलनास पाठिंबा वाढत गेल्याचे त्या म्हणाल्या.