शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

आसोद्यात पॅनलपद्धतीची व्यूहरचना सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:12 IST

नशिराबाद : तालुक्यातील आसोदा येथे ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळीचा वेग वाढू लागला आहे. गुप्त बैठका निवडणुकीचे नियोजन प्रचाराची व्यूहरचना आखली ...

नशिराबाद : तालुक्यातील आसोदा येथे ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळीचा वेग वाढू लागला आहे. गुप्त बैठका निवडणुकीचे नियोजन प्रचाराची व्यूहरचना आखली जात आहे. या ठिकाणी पॅनलपद्धतीने निवडणूक आतापर्यंत झाली आहे. त्यामुळे पॅनलमध्ये कोणाला उमेदवारी द्यायची यासंदर्भात नियोजन पूर्णत्वास आले आहे. मात्र गेल्या अनेक वर्षानुवर्षांपासून पाणीटंचाईचा सामना असोदेकर करीत आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मूलभूत समस्यांसह पाणीटंचाईचा प्रमुख मुद्दा चांगलाच ऐरणीवर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

गावात एकूण सहा वॉर्ड असून, १७ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. सुमारे १२ हजारांच्या वर मतदारसंख्या आहे. आतापर्यंत या ठिकाणी पॅनलपद्धतीने निवडणूक लढविण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला प्रचार सुरुवात केली आहे. यंदाच्या निवडणुकीत नवीन चेहर्‍यांना संधी मिळण्याकरिता ही प्रयत्न सुरू आहे. सर्वच राजकीय प्रमुख पक्षांनी गावाचा कारभार आपल्या हाती येण्याकरिता कंबर कसली आहे. माजी सरपंच विलास चौधरी, ग्रामपंचायत माजी सदस्य रवींद्र देशमुख, तर ग्रामीण विकास पॅनलचे प्रमुख तुषार महाजन निवडणुकीच्या आखाड्यात पॅनल उतरण्याकरिता हालचाली गतिमान केले आहे. पॅनलपद्धतीचे नियोजनाला सुरुवात केली आहे. पॅनलमध्ये आपल्याच उमेदवाराचा विजय कसा होईल याबाबतचे नियोजन व आखणी पॅनलप्रमुख करताना दिसत आहे.

पाणीटंचाईचा वनवास

आसोदेकरांना पाणीटंचाई नवीन नाही पाणीटंचाई ही आसोदेकरांना पाचवीलाच पुजलेली आहे. प्रत्येक निवडणुकीत पाणी समस्या सोडविण्याबाबत आश्वासन मिळते, मात्र शुद्ध पाणीपुरवठा होत नसल्याची ओरड ग्रामस्थांनी केली आहे. सन २०१२ पासून सुमारे पाच कोटी रुपयांची सुरू झालेली पाणी योजनाही सन २०२० मध्ये पूर्णत्वास आली. तरीही पाणी समस्या कायम असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वर्षानुवर्षांपासून सुरू असलेल्या पाणीटंचाईचा वनवास संपणार कधी? पुन्हा तेच आश्वासन मिळतील का? याची चर्चा नागरिकांमध्ये रंगत आहे सध्या महिन्यातून एकदाच गावकऱ्यांना पाणी मिळत असल्याने संताप व्यक्त होत आहे.