शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

आसोद्यात पॅनलपद्धतीची व्यूहरचना सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:14 IST

नशिराबाद : तालुक्यातील आसोदा येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीचा वेग वाढू लागला आहे. गुप्त बैठका, निवडणुकीचे नियोजन, प्रचाराची व्यूहरचना आखली ...

नशिराबाद : तालुक्यातील आसोदा येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीचा वेग वाढू लागला आहे. गुप्त बैठका, निवडणुकीचे नियोजन, प्रचाराची व्यूहरचना आखली जात आहे. या ठिकाणी पॅनलपद्धतीने निवडणूक आतापर्यंत झाली आहे. त्यामुळे पॅनलमध्ये कोणाला उमेदवारी द्यायची, यासंदर्भात नियोजन पूर्णत्वास आले आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षानुवर्षांपासून पाणीटंचाईचा सामना असोदेकर करीत आहे, त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मूलभूत समस्यांसह पाणीटंचाईचा प्रमुख मुद्दा चांगलाच ऐरणीवर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गावात एकूण सहा वाॅर्ड असून १७ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. सुमारे १२ हजारांच्यावर मतदारसंख्या आहे. आतापर्यंत या ठिकाणी पॅनलपद्धतीने निवडणूक लढविण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला प्रचार सुरू केला आहे. यंदाच्या निवडणुकीत नवीन चेह-यांना संधी मिळण्याकरिताही प्रयत्न सुरू आहे. सर्वच राजकीय प्रमुख पक्षांनी गावाचा कारभार आपल्या हाती येण्याकरिता कंबर कसली आहे. माजी सरपंच विलास चौधरी, ग्रामपंचायत माजी सदस्य रवींद्र देशमुख, तर ग्रामीण विकास पॅनलचे प्रमुख तुषार महाजन निवडणुकीच्या आखाड्यात पॅनल उतरणेकरिता हालचाली गतिमान केल्या आहेत. पॅनलपद्धतीच्या नियोजनाला सुरुवात केली आहे. पॅनलमध्ये आपल्याच उमेदवाराचा विजय कसा होईल, याबाबतचे नियोजन व आखणी पॅनलप्रमुख करताना दिसत आहे.

पाणीटंचाईचा वनवास आसोदेकरांना पाणीटंचाई नवीन नाही. पाणीटंचाई ही आसोदेकरांना पाचवीलाच पुजलेली आहे. प्रत्येक निवडणुकीत पाणीसमस्या सोडविण्याबाबत आश्वासन मिळते. मात्र, शुद्ध पाणीपुरवठा होत नसल्याची ओरड ग्रामस्थांनी केली आहे. सन २०१२ पासून सुमारे पाच कोटी रुपयांची सुरू झालेली पाणीयोजनाही सन २०२० मध्ये पूर्णत्वास आली. तरीही पाणी समस्या कायम असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वर्षानुवर्षांपासून सुरू असलेल्या पाणीटंचाईचा वनवास संपणार कधी? पुन्हा तेच आश्वासन मिळेल का, याची चर्चा नागरिकांमध्ये रंगत आहे. सध्या महिन्यातून एकदाच गावकऱ्यांना पाणी मिळत असल्याने संताप व्यक्त होत आहे.