शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

आसोद्यात पॅनलपद्धतीची व्यूहरचना सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:14 IST

नशिराबाद : तालुक्यातील आसोदा येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीचा वेग वाढू लागला आहे. गुप्त बैठका, निवडणुकीचे नियोजन, प्रचाराची व्यूहरचना आखली ...

नशिराबाद : तालुक्यातील आसोदा येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीचा वेग वाढू लागला आहे. गुप्त बैठका, निवडणुकीचे नियोजन, प्रचाराची व्यूहरचना आखली जात आहे. या ठिकाणी पॅनलपद्धतीने निवडणूक आतापर्यंत झाली आहे. त्यामुळे पॅनलमध्ये कोणाला उमेदवारी द्यायची, यासंदर्भात नियोजन पूर्णत्वास आले आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षानुवर्षांपासून पाणीटंचाईचा सामना असोदेकर करीत आहे, त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मूलभूत समस्यांसह पाणीटंचाईचा प्रमुख मुद्दा चांगलाच ऐरणीवर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गावात एकूण सहा वाॅर्ड असून १७ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. सुमारे १२ हजारांच्यावर मतदारसंख्या आहे. आतापर्यंत या ठिकाणी पॅनलपद्धतीने निवडणूक लढविण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला प्रचार सुरू केला आहे. यंदाच्या निवडणुकीत नवीन चेह-यांना संधी मिळण्याकरिताही प्रयत्न सुरू आहे. सर्वच राजकीय प्रमुख पक्षांनी गावाचा कारभार आपल्या हाती येण्याकरिता कंबर कसली आहे. माजी सरपंच विलास चौधरी, ग्रामपंचायत माजी सदस्य रवींद्र देशमुख, तर ग्रामीण विकास पॅनलचे प्रमुख तुषार महाजन निवडणुकीच्या आखाड्यात पॅनल उतरणेकरिता हालचाली गतिमान केल्या आहेत. पॅनलपद्धतीच्या नियोजनाला सुरुवात केली आहे. पॅनलमध्ये आपल्याच उमेदवाराचा विजय कसा होईल, याबाबतचे नियोजन व आखणी पॅनलप्रमुख करताना दिसत आहे.

पाणीटंचाईचा वनवास आसोदेकरांना पाणीटंचाई नवीन नाही. पाणीटंचाई ही आसोदेकरांना पाचवीलाच पुजलेली आहे. प्रत्येक निवडणुकीत पाणीसमस्या सोडविण्याबाबत आश्वासन मिळते. मात्र, शुद्ध पाणीपुरवठा होत नसल्याची ओरड ग्रामस्थांनी केली आहे. सन २०१२ पासून सुमारे पाच कोटी रुपयांची सुरू झालेली पाणीयोजनाही सन २०२० मध्ये पूर्णत्वास आली. तरीही पाणी समस्या कायम असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वर्षानुवर्षांपासून सुरू असलेल्या पाणीटंचाईचा वनवास संपणार कधी? पुन्हा तेच आश्वासन मिळेल का, याची चर्चा नागरिकांमध्ये रंगत आहे. सध्या महिन्यातून एकदाच गावकऱ्यांना पाणी मिळत असल्याने संताप व्यक्त होत आहे.