शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

पावसाच्या ‘कमबॅक’ने शेतशिवार झालं आबादानी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:17 IST

भुसावळ : सुरुवातीच्या पावसानंतर पावसाने दडी मारली होती. यामुळे बळीराजा चिंतातूर झाला होता, मात्र पावसाच्या ‘कमबॅक’ने हंगामाच्या सुरुवातीला ...

भुसावळ : सुरुवातीच्या पावसानंतर पावसाने दडी मारली होती. यामुळे बळीराजा चिंतातूर झाला होता, मात्र पावसाच्या ‘कमबॅक’ने हंगामाच्या सुरुवातीला अर्ध्या तालुक्यात अतिवृष्टी, तर अर्धा तालुका कोरडा अशी स्थिती होती. मात्र १५ जुलैनंतर तालुक्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस झाल्याने तालुक्यात खरिपाची पेरणी जवळपास ७० टक्के पूर्ण झाली आहे. सध्या सर्वत्र पिकांची कोळपणी, औषध फवारणी व निंदणीच्या लगबगीतून कष्टकऱ्यांनी शेतशिवार फुलून गेले आहे.

तालुक्यात यंदा जून महिन्यात पावसाने दगा दिला. काही भागात तुरळक पाऊस तर काही भागात टिपूसही नाही, अशी स्थिती होती. ज्या भागात पेरण्या झालेल्या होत्या. त्या पेरण्यादेखील उलटण्याची स्थिती उदभवली होती. पिके करपू लागली होती; मात्र थोड्या उशिराने दाखल झालेल्या पावसाने पिकांना संजीवनी मिळाली. सोबतच रखडलेल्या पेरण्यादेखील पूर्ण झाल्या पेरणीनंतरही पावसाने उसंत दिली. त्यामुळे पेरण्या उलटण्याचीही भीती होती; मात्र गत आठवड्यात तालुक्यात सर्वत्र समाधानकारकरित्या पाऊस बरसला असल्याने सध्या खरिपाची पिके जोमात आहेत. या पिकांत शेतकरी आता कोळपे मारून व निंदण करून तण काढत आहेत.

सोबतच पिकांवरील कीड व विविध रोगांचा अटकाव करण्यासाठी औषध फवारणी चालविली आहे. तालुक्याचे प्रमुख सोयाबीनचे पीक काही भागात पिवळे पडत असल्याने शेतकरी सोयाबीन पिकावरदेखील औषधी फवारणी व खतांचा 'बुस्टर’ डोस देताना दिसत आहेत.

शेतशिवारात सर्वत्र पिके डोलू लागली आहेत. तालुक्यातील पूर्वकडील भागात जास्त पाऊस पडलेला असल्याने या भागातील पिके जोरदार बहरली आहेत. या भागातील शेतकऱ्यांना आता पावसापासून थोडी उसंत हवी आहे. आतापर्यंतच्या पावसाने शेतशिवारात सर्वत्र आबादानी असून पिके वाढीच्या अवस्थेत असल्याने बळीराजा सुखावलेला आहे.