शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या ‘कमबॅक’ने शेतशिवार झालं आबादानी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:17 IST

भुसावळ : सुरुवातीच्या पावसानंतर पावसाने दडी मारली होती. यामुळे बळीराजा चिंतातूर झाला होता, मात्र पावसाच्या ‘कमबॅक’ने हंगामाच्या सुरुवातीला ...

भुसावळ : सुरुवातीच्या पावसानंतर पावसाने दडी मारली होती. यामुळे बळीराजा चिंतातूर झाला होता, मात्र पावसाच्या ‘कमबॅक’ने हंगामाच्या सुरुवातीला अर्ध्या तालुक्यात अतिवृष्टी, तर अर्धा तालुका कोरडा अशी स्थिती होती. मात्र १५ जुलैनंतर तालुक्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस झाल्याने तालुक्यात खरिपाची पेरणी जवळपास ७० टक्के पूर्ण झाली आहे. सध्या सर्वत्र पिकांची कोळपणी, औषध फवारणी व निंदणीच्या लगबगीतून कष्टकऱ्यांनी शेतशिवार फुलून गेले आहे.

तालुक्यात यंदा जून महिन्यात पावसाने दगा दिला. काही भागात तुरळक पाऊस तर काही भागात टिपूसही नाही, अशी स्थिती होती. ज्या भागात पेरण्या झालेल्या होत्या. त्या पेरण्यादेखील उलटण्याची स्थिती उदभवली होती. पिके करपू लागली होती; मात्र थोड्या उशिराने दाखल झालेल्या पावसाने पिकांना संजीवनी मिळाली. सोबतच रखडलेल्या पेरण्यादेखील पूर्ण झाल्या पेरणीनंतरही पावसाने उसंत दिली. त्यामुळे पेरण्या उलटण्याचीही भीती होती; मात्र गत आठवड्यात तालुक्यात सर्वत्र समाधानकारकरित्या पाऊस बरसला असल्याने सध्या खरिपाची पिके जोमात आहेत. या पिकांत शेतकरी आता कोळपे मारून व निंदण करून तण काढत आहेत.

सोबतच पिकांवरील कीड व विविध रोगांचा अटकाव करण्यासाठी औषध फवारणी चालविली आहे. तालुक्याचे प्रमुख सोयाबीनचे पीक काही भागात पिवळे पडत असल्याने शेतकरी सोयाबीन पिकावरदेखील औषधी फवारणी व खतांचा 'बुस्टर’ डोस देताना दिसत आहेत.

शेतशिवारात सर्वत्र पिके डोलू लागली आहेत. तालुक्यातील पूर्वकडील भागात जास्त पाऊस पडलेला असल्याने या भागातील पिके जोरदार बहरली आहेत. या भागातील शेतकऱ्यांना आता पावसापासून थोडी उसंत हवी आहे. आतापर्यंतच्या पावसाने शेतशिवारात सर्वत्र आबादानी असून पिके वाढीच्या अवस्थेत असल्याने बळीराजा सुखावलेला आहे.