शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

पावसाच्या ‘कमबॅक’ने शेतशिवार झालं आबादानी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:17 IST

भुसावळ : सुरुवातीच्या पावसानंतर पावसाने दडी मारली होती. यामुळे बळीराजा चिंतातूर झाला होता, मात्र पावसाच्या ‘कमबॅक’ने हंगामाच्या सुरुवातीला ...

भुसावळ : सुरुवातीच्या पावसानंतर पावसाने दडी मारली होती. यामुळे बळीराजा चिंतातूर झाला होता, मात्र पावसाच्या ‘कमबॅक’ने हंगामाच्या सुरुवातीला अर्ध्या तालुक्यात अतिवृष्टी, तर अर्धा तालुका कोरडा अशी स्थिती होती. मात्र १५ जुलैनंतर तालुक्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस झाल्याने तालुक्यात खरिपाची पेरणी जवळपास ७० टक्के पूर्ण झाली आहे. सध्या सर्वत्र पिकांची कोळपणी, औषध फवारणी व निंदणीच्या लगबगीतून कष्टकऱ्यांनी शेतशिवार फुलून गेले आहे.

तालुक्यात यंदा जून महिन्यात पावसाने दगा दिला. काही भागात तुरळक पाऊस तर काही भागात टिपूसही नाही, अशी स्थिती होती. ज्या भागात पेरण्या झालेल्या होत्या. त्या पेरण्यादेखील उलटण्याची स्थिती उदभवली होती. पिके करपू लागली होती; मात्र थोड्या उशिराने दाखल झालेल्या पावसाने पिकांना संजीवनी मिळाली. सोबतच रखडलेल्या पेरण्यादेखील पूर्ण झाल्या पेरणीनंतरही पावसाने उसंत दिली. त्यामुळे पेरण्या उलटण्याचीही भीती होती; मात्र गत आठवड्यात तालुक्यात सर्वत्र समाधानकारकरित्या पाऊस बरसला असल्याने सध्या खरिपाची पिके जोमात आहेत. या पिकांत शेतकरी आता कोळपे मारून व निंदण करून तण काढत आहेत.

सोबतच पिकांवरील कीड व विविध रोगांचा अटकाव करण्यासाठी औषध फवारणी चालविली आहे. तालुक्याचे प्रमुख सोयाबीनचे पीक काही भागात पिवळे पडत असल्याने शेतकरी सोयाबीन पिकावरदेखील औषधी फवारणी व खतांचा 'बुस्टर’ डोस देताना दिसत आहेत.

शेतशिवारात सर्वत्र पिके डोलू लागली आहेत. तालुक्यातील पूर्वकडील भागात जास्त पाऊस पडलेला असल्याने या भागातील पिके जोरदार बहरली आहेत. या भागातील शेतकऱ्यांना आता पावसापासून थोडी उसंत हवी आहे. आतापर्यंतच्या पावसाने शेतशिवारात सर्वत्र आबादानी असून पिके वाढीच्या अवस्थेत असल्याने बळीराजा सुखावलेला आहे.