शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
4
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
5
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
6
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
7
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
8
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
9
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
10
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
11
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
12
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
14
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
15
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
16
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
17
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
18
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
19
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
20
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग

सरकारच्या ‘ड्रीम प्रोजेक्ट’मधील कॉलेज जळगावात सुरू

By अमित महाबळ | Updated: September 8, 2022 16:08 IST

जिल्ह्यातील वैद्यकीय सुविधांमध्ये शासकीय होमिओपॅथी महाविद्यालयाची भर पडली असून, येत्या शैक्षणिक सत्रापासून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहेत.

जळगाव :

जिल्ह्यातील वैद्यकीय सुविधांमध्ये शासकीय होमिओपॅथी महाविद्यालयाची भर पडली असून, येत्या शैक्षणिक सत्रापासून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहेत. अधिष्ठातापदी डॉ. अविनाश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सद्यस्थितीत शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या जागेतच हे महाविद्यालय सुरू होत आहे. 

जळगाव जिल्ह्यात चिंचोलीला मेडिकल हब मंजूर असून, त्यामध्ये वैद्यकीय (एमबीबीएस), आयुर्वेद, दंत, होमिओपॅथी, फिजिओथेरेपी महाविद्यालये मंजूर आहेत. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात एप्रिल २०१७ मध्ये याची घोषणा झाली होती. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून मेडिकल हब ओळखले जाते. या ठिकाणी सर्वात आधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे काम होणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर महाविद्यालये सुरू केली जाणार आहेत.  

वैद्यकीय महाविद्यालय जिल्हा रुग्णालयाच्या जागेत, तर आयुर्वेद महाविद्यालय शिरसोली रस्त्यावरील भाड्याच्या इमारतीत सुरू झाले असून, आता होमिओपॅथी कॉलेजचा मार्ग मोकळा झाला आहे. या कॉलेजच्या अधिष्ठातापदी डॉ. अविनाश महाजन आणि निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. रितेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील हे पहिलेच शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय आहे. त्या दृष्टीने त्याचे महत्त्व अधिक आहे. 

पहिली बॅच ५० विद्यार्थ्यांचीयेत्या शैक्षणिक सत्रापासून होमिओपॅथीसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतील. पहिली बॅच ५० विद्यार्थ्यांची आहे. सद्यस्थितीत आयुर्वेद महाविद्यालयाच्या परिसरातच कॉलेजला जागा मिळाली आहे. मात्र, कॉलेज व रुग्णालयासाठी प्रशस्त जागेचा शोध घेतला जात आहे. 

जळगावकरांना मिळणार ओपीडी कॉलेजसाठी नऊ शिक्षक व रुग्णालयासाठी चार वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती कंत्राटी तत्वावर करण्यात आली आहे. या कॉलेजमुळे होमिओपॅथीची बाह्य रुग्ण सेवा (ओपीडी) जळगावकरांना उपलब्ध होणार आहे.

अशी होईल प्रवेश प्रक्रियानीटचा रिझल्ट लागल्यानंतर गुणवत्ता यादीनुसार, एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमस या पद्धतीने विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पार पडेल. याशिवाय विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार व गुणवत्तेनुसार विद्याशाखेचा प्राधान्यक्रम निवडून शकतात, अशी माहिती मिळाली.