शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

उघड्यावर पडलेल्या गणेश मूर्ती संकलित करून विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 00:36 IST

अमळनेर तालुक्यातील सावखेडा आणि चोपडा तालुक्यातील नीमगव्हाण येथील तापी नदीपात्रात विसर्जनानंतर उघड्यावर पडलेल्या गणपतीच्या शेकडो मूर्ती गोळा करुन अमळनेरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांचे विधीवत विसर्जन केले. या बाबत लोकमतने शनिवारच्या अंकात सचित्र वृत्त प्रसिद्ध केले होते.

ठळक मुद्देतापी पात्रातून तूटफूट झालेल्या शेकडो मूर्ती केल्या गोळा  पात्रातच खड्डा खोदून केले मूर्ती विसर्जन

अमळनेर : तालुक्यातील सावखेडा येथील तापी पात्रातील गणपती विसर्जनानंतर अनेक मूर्तींची विटंबना , वाताहत, मोडतोड पाहता शहरातील विकी जाधव मित्र परिवाराच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी भर पावसात नदी पात्रातील मूर्र्तींचे संकलन करून त्यांची रीतसर विल्हेवाट लावून धार्मिक भावना जोपासल्या आहेत . त्यातून सामाजिक शांतता, स्वच्छता व पर्यावरण संवर्धन केले गेले . ‘लोकमत’ने याबाबत शनिवारी वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची अशी विधायक दखल घेण्यात आली.यंदाच्या गणेशोत्सवात पाचव्या दिवसांपासून गणपतीचे विसर्जन करण्यात येत असून अमळनेर व चोपडा तालुक्यातील गणपती मूर्र्तींचे विसर्जन सावखेडा येथील तापी नदी पात्रात केले गेले. मात्र अनेक भक्तांनी पुलावरूनच मूर्ती फेकल्याने त्यांची मोडतोड झाली. तसेच नदी पात्रात पाणी नसल्याने लहान मोठ्या अशा हजारो मूर्त्या विखुरलेल्या अवस्थेत पडलेल्या होत्या. एरवी गणेश मंडळात भक्तीभावाने पूजा, आरती करणारे भक्त विसर्जन वेळी गणेशाची अशी अवस्था करतात याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात होते.अप्रत्यक्षपणे मूर्र्तींची विटंबना होत होती. गणपतीचे तोंड, सोंड, दात, हात, पाय असे अवयव तापी पात्रात पडलेले होते मात्र एकही मंडळ रितसर विसर्जन वा विल्हेवाट लावण्यासाठी पुढे आले नाही ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करून सामाजिक संघटनांना आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत अखेर अमळनेरचे विकी जाधव यांनी त्यांच्या मित्र परिवाराचे कार्यकर्ते यांना सोबत घेऊन तसेच ट्रॅक्टर, डंपर, जेसीबी मशीनसह भर पावसात तापी पात्रात उतरले आणि पात्रातील लहान मोठ्या सर्व मूर्त्या गोळा करून त्यांचे रीतसर विसर्जन केले. मोठ्या मूर्र्तींसाठी पाणी नव्हते म्हणून त्यांनी नदी पात्रात खड्डे खोदले व त्या पाण्यात मोठ्या गणपतींचे विसर्जन केले. जाधव मित्र परिवाराच्या या कार्यामुळे पोकळ भक्ती दाखवणाऱ्या मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अंजन घातले गेले आहे. त्यांचे हे कौतुकास्पद कार्य पाहून प्रांताधिकारी संजय गायकवाड, पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर व अमळनेरातील सामाजिक संघटनांनी अभिनंदन केले आहे. 

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जन