शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

उघड्यावर पडलेल्या गणेश मूर्ती संकलित करून विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 00:36 IST

अमळनेर तालुक्यातील सावखेडा आणि चोपडा तालुक्यातील नीमगव्हाण येथील तापी नदीपात्रात विसर्जनानंतर उघड्यावर पडलेल्या गणपतीच्या शेकडो मूर्ती गोळा करुन अमळनेरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांचे विधीवत विसर्जन केले. या बाबत लोकमतने शनिवारच्या अंकात सचित्र वृत्त प्रसिद्ध केले होते.

ठळक मुद्देतापी पात्रातून तूटफूट झालेल्या शेकडो मूर्ती केल्या गोळा  पात्रातच खड्डा खोदून केले मूर्ती विसर्जन

अमळनेर : तालुक्यातील सावखेडा येथील तापी पात्रातील गणपती विसर्जनानंतर अनेक मूर्तींची विटंबना , वाताहत, मोडतोड पाहता शहरातील विकी जाधव मित्र परिवाराच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी भर पावसात नदी पात्रातील मूर्र्तींचे संकलन करून त्यांची रीतसर विल्हेवाट लावून धार्मिक भावना जोपासल्या आहेत . त्यातून सामाजिक शांतता, स्वच्छता व पर्यावरण संवर्धन केले गेले . ‘लोकमत’ने याबाबत शनिवारी वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची अशी विधायक दखल घेण्यात आली.यंदाच्या गणेशोत्सवात पाचव्या दिवसांपासून गणपतीचे विसर्जन करण्यात येत असून अमळनेर व चोपडा तालुक्यातील गणपती मूर्र्तींचे विसर्जन सावखेडा येथील तापी नदी पात्रात केले गेले. मात्र अनेक भक्तांनी पुलावरूनच मूर्ती फेकल्याने त्यांची मोडतोड झाली. तसेच नदी पात्रात पाणी नसल्याने लहान मोठ्या अशा हजारो मूर्त्या विखुरलेल्या अवस्थेत पडलेल्या होत्या. एरवी गणेश मंडळात भक्तीभावाने पूजा, आरती करणारे भक्त विसर्जन वेळी गणेशाची अशी अवस्था करतात याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात होते.अप्रत्यक्षपणे मूर्र्तींची विटंबना होत होती. गणपतीचे तोंड, सोंड, दात, हात, पाय असे अवयव तापी पात्रात पडलेले होते मात्र एकही मंडळ रितसर विसर्जन वा विल्हेवाट लावण्यासाठी पुढे आले नाही ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करून सामाजिक संघटनांना आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत अखेर अमळनेरचे विकी जाधव यांनी त्यांच्या मित्र परिवाराचे कार्यकर्ते यांना सोबत घेऊन तसेच ट्रॅक्टर, डंपर, जेसीबी मशीनसह भर पावसात तापी पात्रात उतरले आणि पात्रातील लहान मोठ्या सर्व मूर्त्या गोळा करून त्यांचे रीतसर विसर्जन केले. मोठ्या मूर्र्तींसाठी पाणी नव्हते म्हणून त्यांनी नदी पात्रात खड्डे खोदले व त्या पाण्यात मोठ्या गणपतींचे विसर्जन केले. जाधव मित्र परिवाराच्या या कार्यामुळे पोकळ भक्ती दाखवणाऱ्या मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अंजन घातले गेले आहे. त्यांचे हे कौतुकास्पद कार्य पाहून प्रांताधिकारी संजय गायकवाड, पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर व अमळनेरातील सामाजिक संघटनांनी अभिनंदन केले आहे. 

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जन