शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

आवक घटल्याने खोबरे ३०० रुपयांच्या दिशेने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:19 IST

विजयकुमार सैतवाल जळगाव : केरळमध्ये कोरोना संसर्ग वाढल्यानंतर खोबऱ्याच्या आवकवर परिणाम होऊन त्याच्या भावात थेट ६० ते ८० रुपये ...

विजयकुमार सैतवाल

जळगाव : केरळमध्ये कोरोना संसर्ग वाढल्यानंतर खोबऱ्याच्या आवकवर परिणाम होऊन त्याच्या भावात थेट ६० ते ८० रुपये प्रति किलोने वाढ झाली झाली आहे. यामुळे खोबऱ्याचे भाव थेट २६० ते २८० रुपये प्रति किलोवर पोहचले आहेत. दिवाळीपर्यंत आणखी भाववाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सुकामेवा, मसाल्याचे पदार्थ यांच्या आवकवर सध्या कोणत्या न कोणत्या कारणाने परिणाम होत आहे. कोकणातील पूरस्थिती, अफगाणिस्तानील तणाव, विविध देशांतील कोरोना संसर्ग यामुळे काजू, बदाम तसेच इतर सुकामेव्यासह मसाल्याची आवक घटल्याने त्यांचे भाव वाढले आहे. या सोबतच आता मसाल्यातील महत्त्वाचा घटक असलेले खोबरे व खसखसच्या आवकवरही परिणाम झाला आहे.

२५ टक्क्यांनी आवक घटली

खोबऱ्याची प्रमुख आवक असलेल्या केरळमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्याने तेथून येणाऱ्या खोबऱ्याच्या आवकवर चांगलाच परिणाम झाला आहे. एरव्ही दररोज दोन टन आवक असलेल्या खोबऱ्याची आवक २५ टक्क्यांनी कमी होऊन ती दीड टनवर आली आहे. यामुळे २०० ते २२० रुपये प्रति किलो असलेल्या खोबऱ्याचे भाव २६० ते २८० रुपये प्रति किलोवर पोहचले आहेत.

दिवाळीपर्यंत ३०० रुपयांवर?

सध्या आवक कमी व सणवारामुळे मागणी वाढणार असल्याने खोबऱ्याचे भाव आणखी वाढत जाण्याची शक्यता आहे. दिवाळीमध्ये खोबऱ्याची मागणी जास्त असते. त्यामुळे या काळात खोबरे ३०० रुपये प्रति किलोवर पोहोचण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे.

केरळमधून येणाऱ्या खोबऱ्याची आवक कमी झाल्याने त्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. दिवाळीपर्यंत खोबरे ३०० रुपये प्रति किलोपर्यंत जाऊ शकते. खोबऱ्यासोबतच खसखसचेही भाव वाढले आहेत.

- सचिन जैन, मसाले विक्रेते