शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

महामार्ग अपघात कार्यवाहीसाठी मुख्यमंत्र्यांच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:13 IST

शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या सर्वच रस्त्याची दुरवस्था झाली आहे. चौपदरीकरणादरम्यान रस्त्यांची कामे संथ गतीने सुरू आहेत. काही ठिकाणी ...

शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या सर्वच रस्त्याची दुरवस्था झाली आहे. चौपदरीकरणादरम्यान रस्त्यांची कामे संथ गतीने सुरू आहेत. काही ठिकाणी खोदकाम करून दोन ते तीन महिने उलटले तरी, पुढील काम सुरू केले जात नाही. वाहनचालकांसह परिसरातील रहिवासी त्रस्त झाले आहेत. खोदलेल्या रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल खड्ड्यामुळे दररोज अनेक अपघात होत आहेत म्हणून भुसावळ शिवसेनेतर्फे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली होती.

प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना वारंवार सूचना देऊनसुद्धा उपाययोजना केल्या नाही. अपघातांचे प्रमाण वाढत आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा संघटक विलास मुळे, उपजिल्हाप्रमुख ॲड. श्याम श्रीगोंदेकर, कार्यालयीन उपजिल्हाप्रमुख प्रा.उत्तम सुरवाडे, तालुकाप्रमुख समाधान महाजन, विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे, तालुका संघटक प्रा.धीरज पाटील, शहरप्रमुख नीलेश महाजन, शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे व इतर पदाधिकारी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे.

मार्च महिन्यात खोदकाम केले पण, त्यानंतर अत्यंत संथपणे रस्त्यांचे काम होत आहे. अर्धवट कामामुळे नागरिक त्रस्त आहेत. हे काम तातडीने पूर्ण करावे अन्यथा नागरिकांसमवेत आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही. संथ गतीने होणाऱ्या या कामास पूर्णत: महामार्ग प्राधिकरण प्रशासन जबाबदार आहे.

-संतोष सोनवणे, विधानसभा क्षेत्र प्रमुख

खड्ड्यांचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खोदकामामुळे रस्त्यावरून वाहन चालविणे अवघड झाले आहे. रस्त्याचे काम केव्हा पूर्ण होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सुरक्षा कठडा नसल्याने शेख जावेद यांची दुचाकी खड्ड्यात पडली, त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. नुकसान भरपाईसह उपचाराचा खर्च महामार्ग प्राधिकरणाने देणे अपेक्षित आहे.

-प्रा.धीरज पाटील, शिवसेना तालुका संघटक, भुसावळ