शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

सर्व्हर बंद व वाहन निरीक्षकाअभावी ‘आरटीओ’ कार्यालयात गोंधळ

By admin | Updated: February 22, 2017 00:43 IST

वाहनधारकांचे हाल : ‘एमआयडीसीत’ही वाहनांच्या रांगा

जळगाव : सर्व्हर वारंवार बंद पडणे, संथ गती त्यातच खंडित वीजपुरवठा यामुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात मंगळवारी शिकाऊ वाहन परवाना काढण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. वारंवार अडचणी निर्माण होत असल्याने प्रचंड गोंधळ उडाला होता तर औद्यागिक वसाहतमध्ये योग्यता प्रमाणपत्रासाठीही प्रचंड गर्दी झाली होती. वाहन निरीक्षक नसल्याने ग्रामीण भागातून आलेल्या वाहनधारकांनी प्रचंड संताप व्यक्त केला.रात्री उशिरा पर्यंत गर्दी कायम होती. दोन्ही ठिकाणी वाहन धारक व कर्मचाºयांमध्ये किरकोळ वादही झाले.उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कामकाजाचे अनेक टप्पे आॅनलाईन झाले आहेत. १ फेब्रुवारी सारथी-४ ही प्रणाली आॅनलाईन प्रणाली सुरु झाल्याने शिकाऊ परवाना याच प्रणालीद्वारे काढावा लागत आहे. त्यातच वारंवार सर्व्हर बंद पडणे, कधी त्याला गती नसणे तर कधी वीज पुरवठा बंद होणे यामुळे कामाचा खोळंबा होत आहे. अनेक उमेदवार दिवसभर थांबून आल्या पाऊले माघारी जात आहेत.आठ संगणकावर चालते कामपरिवहन कार्यालयात परवान्यासाठी आठ संगणक आहेत. त्यात इंटरनेटच्या दोन लाईन देण्यात आल्या आहेत. एका लाईनवर आयएमव्ही व व्हेरीफीकेशन तर दुसºया लाईनवर परीक्षा घेतली जाते. उमेदवारांच्या मते सर्व्हरची गती कमी असल्याने दोनच संगणकावर हे काम घेण्यात येत आहे तर अधिकाºयांच्या मते आॅनलाईनमुळे नेहमीप्रमाणे उमदेवार येत नाहीत, त्यामुळे काही वेळा संगणक बंद असतात. मंगळवारीही प्रचंड हाल झाले.वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे आज संगणक बंद होते, त्यामुळे किरकोळ गोंधळ उडाला. सर्वच कार्यालये आॅनलाईन असल्यामुळे काही वेळा सर्व्हरची गती कमी होते. सध्या उमेदवारच कमी येत असल्याने परवाने कमी निघतात. दोन दिवस काम बंद असल्याने योग्यता प्रमाणपत्रासाठी आज गर्दी झाली.-जयंत पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारीदुपारपर्यंत निरीक्षकच नसल्याने वाहनधारकांचा संताप गेल्या आठवड्यात जिल्हा परिषद निवडणूक व निरीक्षकांच्या परिक्षेमुळे कार्यालयात वाहन निरीक्षक नसल्याने योग्यता प्रमाणपत्राचे काम चार दिवस बंद होते. मंगळवारी हे काम सुरु होणार असल्याने वाहनधारकांना सकाळपासून एमआयडीसीत बोलावण्यात आले होते, मात्र दुपारपर्यंत निरीक्षकच नसल्याने वाहनधारकांनी प्रचंड संताप व्यक्त केला. यावेळी लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वादाचे प्रसंग घडले. तेथे वाद सुरु असल्याचे समजताच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी तातडीने निरीक्षकांना तेथे रवाना केले.