शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
3
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
6
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
7
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
8
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
9
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
10
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
11
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
12
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
13
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
14
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
15
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
16
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
17
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
18
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
19
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
20
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त

सर्व्हर बंद व वाहन निरीक्षकाअभावी ‘आरटीओ’ कार्यालयात गोंधळ

By admin | Updated: February 22, 2017 00:43 IST

वाहनधारकांचे हाल : ‘एमआयडीसीत’ही वाहनांच्या रांगा

जळगाव : सर्व्हर वारंवार बंद पडणे, संथ गती त्यातच खंडित वीजपुरवठा यामुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात मंगळवारी शिकाऊ वाहन परवाना काढण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. वारंवार अडचणी निर्माण होत असल्याने प्रचंड गोंधळ उडाला होता तर औद्यागिक वसाहतमध्ये योग्यता प्रमाणपत्रासाठीही प्रचंड गर्दी झाली होती. वाहन निरीक्षक नसल्याने ग्रामीण भागातून आलेल्या वाहनधारकांनी प्रचंड संताप व्यक्त केला.रात्री उशिरा पर्यंत गर्दी कायम होती. दोन्ही ठिकाणी वाहन धारक व कर्मचाºयांमध्ये किरकोळ वादही झाले.उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कामकाजाचे अनेक टप्पे आॅनलाईन झाले आहेत. १ फेब्रुवारी सारथी-४ ही प्रणाली आॅनलाईन प्रणाली सुरु झाल्याने शिकाऊ परवाना याच प्रणालीद्वारे काढावा लागत आहे. त्यातच वारंवार सर्व्हर बंद पडणे, कधी त्याला गती नसणे तर कधी वीज पुरवठा बंद होणे यामुळे कामाचा खोळंबा होत आहे. अनेक उमेदवार दिवसभर थांबून आल्या पाऊले माघारी जात आहेत.आठ संगणकावर चालते कामपरिवहन कार्यालयात परवान्यासाठी आठ संगणक आहेत. त्यात इंटरनेटच्या दोन लाईन देण्यात आल्या आहेत. एका लाईनवर आयएमव्ही व व्हेरीफीकेशन तर दुसºया लाईनवर परीक्षा घेतली जाते. उमेदवारांच्या मते सर्व्हरची गती कमी असल्याने दोनच संगणकावर हे काम घेण्यात येत आहे तर अधिकाºयांच्या मते आॅनलाईनमुळे नेहमीप्रमाणे उमदेवार येत नाहीत, त्यामुळे काही वेळा संगणक बंद असतात. मंगळवारीही प्रचंड हाल झाले.वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे आज संगणक बंद होते, त्यामुळे किरकोळ गोंधळ उडाला. सर्वच कार्यालये आॅनलाईन असल्यामुळे काही वेळा सर्व्हरची गती कमी होते. सध्या उमेदवारच कमी येत असल्याने परवाने कमी निघतात. दोन दिवस काम बंद असल्याने योग्यता प्रमाणपत्रासाठी आज गर्दी झाली.-जयंत पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारीदुपारपर्यंत निरीक्षकच नसल्याने वाहनधारकांचा संताप गेल्या आठवड्यात जिल्हा परिषद निवडणूक व निरीक्षकांच्या परिक्षेमुळे कार्यालयात वाहन निरीक्षक नसल्याने योग्यता प्रमाणपत्राचे काम चार दिवस बंद होते. मंगळवारी हे काम सुरु होणार असल्याने वाहनधारकांना सकाळपासून एमआयडीसीत बोलावण्यात आले होते, मात्र दुपारपर्यंत निरीक्षकच नसल्याने वाहनधारकांनी प्रचंड संताप व्यक्त केला. यावेळी लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वादाचे प्रसंग घडले. तेथे वाद सुरु असल्याचे समजताच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी तातडीने निरीक्षकांना तेथे रवाना केले.