शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरण ; शेतकऱ्यांना गहू, हरभरा या पिकांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:32 IST

- असे आहे रब्बीचे क्षेत्र (हेक्टरमध्ये) गहू - ३७ हजार हरभरा -९० हजार मका - २७ हजार दादर - ...

- असे आहे रब्बीचे क्षेत्र (हेक्टरमध्ये)

गहू - ३७ हजार

हरभरा -९० हजार

मका - २७ हजार

दादर - ३१ हजार

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम असून, अवकाळी पावसाचीही रिपरिप सुरू आहे. यामुळे रब्बीच्या पिकांना फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यंदा अतिवृष्टीमुळे आधीच खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. आता रब्बीच्या सुरुवातीलाच

बेभरोसे हवामानामुळे रब्बीच्या हंगामालादेखील फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

खरीप हंगामात शेतकऱ्यांना कापसाव्यतिरिक्त इतर पिकांचे उत्पन्न न आल्यासारखेच आहे. खरीप हंगामातील नुकसानीची भर रब्बी हंगामात भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात रब्बीची लागवड केली. मात्र, निसर्गाच्या चक्राने पुन्हा शेतकऱ्यांचा अडचणी वाढवल्या आहेत. जिल्ह्यात यंदा ३ लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे. त्यात हरभऱ्याची पेरणी सर्वाधिक आहे. मात्र, गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम असल्याने हरभऱ्यावर घाटअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तसेच गहू व हरभऱ्याचा वाढीवरदेखील परिणाम होण्याची शक्यता आहे. यासह कापसाच्या फरदळचेदेखील नुकसान झाले आहे. फरदळ कापसाचेदेखील बऱ्यापैकी उत्पन्न जिल्ह्यातील शेतकरी घेत असतात. मात्र, पावसामुळे या कापसाचे नुकसान झाले आहे.

यासह शासकीय खरेदीदेखील थांबली असल्याने शेतकऱ्यांचा गुदामामध्ये माल पडलेला आहे. या पावसामुळे हा माल खराब होण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.

धुक्यामुळे अधिक फटका

जिल्ह्यात जर केवळ पाऊस झाला असता तर रब्बी पिकांना कदाचित यामुळे फायदा झाला असता. मात्र, ढगाळ वातावरणदेखील कायम असून, त्यासोबतच धुकेदेखील पडले असल्याने हे वातावरण मक्यावर पडणाऱ्या अळीला पोषक आहे. यासह हरभऱ्यावरदेखील घाटअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तसेच मका व दादरच्या पिकालादेखील फटका बसण्याची शक्यता आहे.

ही घ्यावी काळजी

ढगाळ वातावरण कमी झाल्यानंतर हरभरा व मक्यावर अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. यामुळे चार ते पाच दिवसांनंतर लिंबोळी अर्काची फवारणी करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

कोट..

जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या पावसामुळे नुकसानीची कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही. मात्र, पावसाचा मुक्काम वाढल्यास रब्बी पिकांवर परिणाम होऊ शकतो.

-अनिल भोकरे, कृषी उपसंचालक