शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

ढगाळ वातावरण ; शेतकऱ्यांना गहू, हरभरा या पिकांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:32 IST

- असे आहे रब्बीचे क्षेत्र (हेक्टरमध्ये) गहू - ३७ हजार हरभरा -९० हजार मका - २७ हजार दादर - ...

- असे आहे रब्बीचे क्षेत्र (हेक्टरमध्ये)

गहू - ३७ हजार

हरभरा -९० हजार

मका - २७ हजार

दादर - ३१ हजार

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम असून, अवकाळी पावसाचीही रिपरिप सुरू आहे. यामुळे रब्बीच्या पिकांना फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यंदा अतिवृष्टीमुळे आधीच खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. आता रब्बीच्या सुरुवातीलाच

बेभरोसे हवामानामुळे रब्बीच्या हंगामालादेखील फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

खरीप हंगामात शेतकऱ्यांना कापसाव्यतिरिक्त इतर पिकांचे उत्पन्न न आल्यासारखेच आहे. खरीप हंगामातील नुकसानीची भर रब्बी हंगामात भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात रब्बीची लागवड केली. मात्र, निसर्गाच्या चक्राने पुन्हा शेतकऱ्यांचा अडचणी वाढवल्या आहेत. जिल्ह्यात यंदा ३ लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे. त्यात हरभऱ्याची पेरणी सर्वाधिक आहे. मात्र, गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम असल्याने हरभऱ्यावर घाटअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तसेच गहू व हरभऱ्याचा वाढीवरदेखील परिणाम होण्याची शक्यता आहे. यासह कापसाच्या फरदळचेदेखील नुकसान झाले आहे. फरदळ कापसाचेदेखील बऱ्यापैकी उत्पन्न जिल्ह्यातील शेतकरी घेत असतात. मात्र, पावसामुळे या कापसाचे नुकसान झाले आहे.

यासह शासकीय खरेदीदेखील थांबली असल्याने शेतकऱ्यांचा गुदामामध्ये माल पडलेला आहे. या पावसामुळे हा माल खराब होण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.

धुक्यामुळे अधिक फटका

जिल्ह्यात जर केवळ पाऊस झाला असता तर रब्बी पिकांना कदाचित यामुळे फायदा झाला असता. मात्र, ढगाळ वातावरणदेखील कायम असून, त्यासोबतच धुकेदेखील पडले असल्याने हे वातावरण मक्यावर पडणाऱ्या अळीला पोषक आहे. यासह हरभऱ्यावरदेखील घाटअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तसेच मका व दादरच्या पिकालादेखील फटका बसण्याची शक्यता आहे.

ही घ्यावी काळजी

ढगाळ वातावरण कमी झाल्यानंतर हरभरा व मक्यावर अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. यामुळे चार ते पाच दिवसांनंतर लिंबोळी अर्काची फवारणी करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

कोट..

जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या पावसामुळे नुकसानीची कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही. मात्र, पावसाचा मुक्काम वाढल्यास रब्बी पिकांवर परिणाम होऊ शकतो.

-अनिल भोकरे, कृषी उपसंचालक