शहरं
Join us  
Trending Stories
1
PM KP Sharma Oli Resign: अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
2
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
3
लाल किल्ल्यावरील कार्यक्रमातून का केली १ कोटींच्या कलशाची चोरी? समोर आलं भलतंच कारण!
4
आज नवे आयफोन लाँच होणार! iPhone 17 मध्ये ५००० एमएएच बॅटरी? आयफोन १६, १५ च्या किंमती कोसळणार
5
नेपाळमधील आंदोलनाने भारत चिंतेत? शेजारी राष्ट्र आपल्यासाठी इतका महत्त्वाचा का?
6
नेपाळमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर, पंतप्रधानांचा राजीनामा, आंदोलकांनी संसद भवन पेटवले
7
कोण आहे बालेन शाह? ज्यांच्याकडे देशाचं नेतृत्व सोपवण्याची मागणी Gen Z आंदोलनकर्ते करतायेत
8
Video - स्वाभिमानापेक्षा पैसा मोठा नाही! पूरग्रस्त भागातील मुलाने जिंकलं मन, पाणी घेतलं अन्...
9
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
10
मुंबई विमानतळावरील अधिकारी जप्त नारळ, तेलाच्या बाटल्या नेत होते; १५ जणांना नोकरीवरून काढले
11
Video : नेपाळमधील आंदोलन आणखी पेटलं; मंत्र्यांची घरं जाळल्यानंतर लोकांचा सुरक्षा दलांवर हल्ला
12
रणबीर कपूर 'या' कंपनीचे १२.५ लाख शेअर्स खरेदी करणार, सलग दुसऱ्या दिवशी अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल
13
iPhone 17: अ‍ॅपल आज मोठा धमाका करणार! पहिल्यांदाच आयफोनमध्ये 'हे' ४ फीचर्स मिळण्याची शक्यता
14
हिरो डॉग! मालकाला वाचवण्यासाठी जळते डायनामाइट तोंडात धरले अन्..; Video पाहून भावूक झाले लोक
15
एक व्यक्ती, ६ जिल्ह्यात एकाच वेळी केली ९ वर्षे नोकरी, सरकारला घातला कोट्यवधींचा गंडा 
16
ओलाच्या नावाने शिमगा केला, बजाज चेतक भररस्त्यात पेटली; इचलकरंजीत शोला बनला आग का गोला...
17
नेपाळमध्ये सरकार कोसळण्याचं संकट, घटकपक्षाने सोडली साथ; आतापर्यंत ३ मंत्र्यांनी दिले राजीनामे
18
हेल्दी वाटणारा मिल्कशेक मेंदूसाठी ठरतोय 'विष'; आवडीने पिणाऱ्यांना धोक्याचा इशारा
19
डिफेन्स कंपनीचा शेअर ठरला 'मल्टीबॅगर', ६ महिन्यांत पैसे दुप्पट; ५ वर्षांत दिला २०००% परतावा
20
रशियन कच्च्या तेलावरील भारताच्या नफ्याला म्हटलं 'ब्लड मनी'; ट्रम्प यांच्या सहकाऱ्यानं पुन्हा गरळ ओकली

ढगाळ वातावरण ; शेतकऱ्यांना गहू, हरभरा या पिकांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:32 IST

- असे आहे रब्बीचे क्षेत्र (हेक्टरमध्ये) गहू - ३७ हजार हरभरा -९० हजार मका - २७ हजार दादर - ...

- असे आहे रब्बीचे क्षेत्र (हेक्टरमध्ये)

गहू - ३७ हजार

हरभरा -९० हजार

मका - २७ हजार

दादर - ३१ हजार

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम असून, अवकाळी पावसाचीही रिपरिप सुरू आहे. यामुळे रब्बीच्या पिकांना फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यंदा अतिवृष्टीमुळे आधीच खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. आता रब्बीच्या सुरुवातीलाच

बेभरोसे हवामानामुळे रब्बीच्या हंगामालादेखील फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

खरीप हंगामात शेतकऱ्यांना कापसाव्यतिरिक्त इतर पिकांचे उत्पन्न न आल्यासारखेच आहे. खरीप हंगामातील नुकसानीची भर रब्बी हंगामात भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात रब्बीची लागवड केली. मात्र, निसर्गाच्या चक्राने पुन्हा शेतकऱ्यांचा अडचणी वाढवल्या आहेत. जिल्ह्यात यंदा ३ लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे. त्यात हरभऱ्याची पेरणी सर्वाधिक आहे. मात्र, गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम असल्याने हरभऱ्यावर घाटअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तसेच गहू व हरभऱ्याचा वाढीवरदेखील परिणाम होण्याची शक्यता आहे. यासह कापसाच्या फरदळचेदेखील नुकसान झाले आहे. फरदळ कापसाचेदेखील बऱ्यापैकी उत्पन्न जिल्ह्यातील शेतकरी घेत असतात. मात्र, पावसामुळे या कापसाचे नुकसान झाले आहे.

यासह शासकीय खरेदीदेखील थांबली असल्याने शेतकऱ्यांचा गुदामामध्ये माल पडलेला आहे. या पावसामुळे हा माल खराब होण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.

धुक्यामुळे अधिक फटका

जिल्ह्यात जर केवळ पाऊस झाला असता तर रब्बी पिकांना कदाचित यामुळे फायदा झाला असता. मात्र, ढगाळ वातावरणदेखील कायम असून, त्यासोबतच धुकेदेखील पडले असल्याने हे वातावरण मक्यावर पडणाऱ्या अळीला पोषक आहे. यासह हरभऱ्यावरदेखील घाटअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तसेच मका व दादरच्या पिकालादेखील फटका बसण्याची शक्यता आहे.

ही घ्यावी काळजी

ढगाळ वातावरण कमी झाल्यानंतर हरभरा व मक्यावर अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. यामुळे चार ते पाच दिवसांनंतर लिंबोळी अर्काची फवारणी करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

कोट..

जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या पावसामुळे नुकसानीची कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही. मात्र, पावसाचा मुक्काम वाढल्यास रब्बी पिकांवर परिणाम होऊ शकतो.

-अनिल भोकरे, कृषी उपसंचालक