शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

स्वच्छतेचा संदेश देणा:या शॉर्टफिल्मला ‘बेस्ट एक्सलन्स अवॉर्ड’

By admin | Updated: April 15, 2017 16:04 IST

‘ओजस्विनी’च्या दोन विद्यार्थिनींनी घेतली मेहनत

अजय पाटील

जळगाव,दि.15 -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात स्वच्छता मोहिम राबविली जात आहे. यामध्ये युवकांचा मोठय़ा प्रमाणात सहभाग आहे,  हा सहभाग वाढावा यासाठी केंद्राच्या मनुष्यबळ विकास मंत्रालय व नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड (एन.एफ.डी.सी) कडून आयोजित स्वच्छ भारत अभियान शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल स्पर्धेत जळगावच्या ओजस्विनी कला महाविद्यालयातील विद्यार्थिनी जयश्री बारी व विद्यार्थी विजय बारी यांनी स्वच्छतेच्या संदेश देणा:या दोन वेगवेगळ्या शॉर्ट फिल्मला अवघ्या महाराष्ट्रातून ‘बेस्ट एक्सलन्स अवॉर्ड’ प्राप्त झाला आहे. 
 स्वच्छ भारत अभियान शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल स्पर्धेत देशभरातील 4 हजार 500 विद्याथ्र्यानी आपला सहभाग घेतला होता. जयश्री बारी हिने ‘स्वच्छता की और एक कदम’ तर विजय बारी यांनी ‘खुद बदलो, भारत बदलेगा’ या विषयावरील शॉर्ट फिल्म तयार केल्या.अजिंठा चौफुली जवळील एका रेस्टॉरंट मध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी नाश्ता करताना त्यांच्याकडून घाण केली जाते, मात्र त्याच ठिकाणावरून मार्गस्थ होत असलेल्या दोन शाळकरी विद्याथ्र्याकडून ती घाण स्वच्छ केली जाते. त्यानंतर त्या महाविद्यालयीन विद्याथ्र्यामध्ये झालेला बदल यामध्ये दाखविण्यात आला आहे. 
प्रत्येकजण कचरा फेकल्यानंतर तो स्वच्छ करण्याची जबाबदारी ही केवळ महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत यांचीच असते असा गैरसमज आहे.  मात्र हा देश आपला, व देशाला स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी देखील देशातील प्रत्येक नागरिकाची आहे. ही जाणीव या शॉर्टफिल्म मधून आजच्या पिढीला करून देण्यात आली आहे. ‘बेस्ट एक्सलन्स अवॉर्ड’ मिळाल्याबद्दल या दोन्ही विद्याथ्र्याचा केसीई सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, ओजस्विनीचे प्राचार्य अविनाश काटे, प्रा.योगेश लहाने, प्रा.पुरुषोत्तम घाटोळ यांनी सत्कार केला.