शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शहर स्वच्छतेचा सत्ताधाऱ्यांचा दावा फोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:13 IST

जळगाव : स्वच्छतेबाबत कोणत्याही तक्रारी नसल्याचा दावा भाजपने रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. त्यानंतर ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीमध्ये ...

जळगाव : स्वच्छतेबाबत कोणत्याही तक्रारी नसल्याचा दावा भाजपने रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. त्यानंतर ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीमध्ये शहरातील अनेक भागात कचऱ्याचे ढीग व गटारी तुंबलेल्या आढळून आल्याने सत्ताधाऱ्यांचा दावा फोल ठरला आहे. या कचऱ्यामुळे संबंधित परिसरातील नागरिकांनी मनपा प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करीत असत.

शहरातील विविध भागातील नागरिकांकडून अनियमित साफसफाईच्या तक्रारी येत असतानाही, भाजपकडून मात्र शहरातील सर्व भागातील कचरा ४८ तासांत उचलला जात असल्याचा दावा केला आहे. या दाव्याच्या अनुषंगाने ‘लोकमत’ प्रतिनिधीने सोमवारी शहरातील काही भागांची पाहणी केली असता, अनेक ठिकाणी कचराकुंड्या भरून वाहताना दिसून आल्या. तर काही ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले दिसून आले. या ठिकाणी नियमित घंटागाडी येत नसून, सफाईसाठी मजूरही नियमित येत नाहीत. त्यामुळे कचरा तीन ते चार दिवस जागेवरच पडून राहत असल्याचे नागरिकांनी सांगितले. याबाबत स्थानिक नगरसेवकांकडेही अनेक वेळा तक्रारी केल्या. मात्र, तरीदेखील नियमित स्वच्छता होत नसल्यामुळे आता तक्रारी करणेच बंद केले असल्याचेही रहिवाशांनी सांगितले. विशेष म्हणजे काही रहिवाशांनी तर नियमित स्वछता होत नसल्यामुळे अस्वच्छतेत राहण्याची सवय झाली असल्याचे सांगितले.