शहरं
Join us  
Trending Stories
1
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
2
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
3
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
4
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
5
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
6
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
7
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
8
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
9
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
10
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
11
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
12
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
13
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
14
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
15
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
16
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
17
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
18
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
19
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
20
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 

शहरात उष्णतेचा कहर...

By admin | Updated: March 30, 2017 00:01 IST

शहराचा पारा ४२ अंशावर : सात वर्षातील सर्वाधिक तापमान

जळगाव : गेल्या आठवड्याभरापासून जळगाव शहरात उष्णतेची लाट पसरली असून, मार्च महिन्यात पारा ४२.८ अंशावर पोहचला असल्याने तापमानाने गेल्या सात वर्षाचा विक्रम मोडला आहे. जळगाव शहराचे तापमानाने मार्च महिन्यातच चाळीशी पार केल्याने जळगावकरांना असह्य उकाड्याचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जळगाव शहरात दिवसभर अघोषित संचारबंदी असल्याचा भास जाणवत आहे. महाराष्टÑात सध्या कोरड्या व उष्ण वाºयांचा म्हणजेच ‘लू’ वाºयांचा प्र्रकोप वाढला असल्याने उष्णतेची लाट कायम राहणार आहे. जळगाव शहराच्या तापमानाने ४२ अंशाचा पारा गाठला आहे. मार्र्च महिन्यात जळगाव पाºयाने ७ वर्षानंतर पहिल्यांदाच ४० अंशाचा पारा ओलांडला आहे. याआधी  २०१० मध्ये जळगावचा पारा ४१ अंशावर पोहचला होता. त्यानंतर पहिल्यांदाच शहराच्या तापमानाने मार्च महिन्यात ४२.८ अंशाचा पारा गाठला आहे. तापमान वाढीमुळे सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणारे जळगाव शहर ‘हॉटसीटी’ म्हणून ओळखले जात आहे. तापमान वाढीमुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. सकाळी ११ वाजेनंतर शहरातील मुख्य रस्त्यांप्रमाणे उपनगरातील रस्तेदेखील ओस पडलेले पहायला मिळत आहे. तसेच रात्री उशिरापर्यंत उष्णतेचा झळा नागरिकांना बसत आहेत. त्यामुळे रुग्णांच्या संख्येतदेखील वाढ होत आहे.आठवडाभर राहणार कहर कायम  उत्तर भारत व राजस्थान कडून येत असलेल्या उष्ण वाºयांमुळे तापमानात वाढ होत असल्याची माहिती पुणे हवामान खात्याकडून देण्यात आली आली आहे. ‘लू’ वाºयाचा जोर कायम राहण्याचा अंदाज असल्याने अजून आठवडाभर तरी जळगावकरांना उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. शहराचा पारा ४२ अंशावर गेला आहे. यामुळे नागरिकांसोबतच पशुपक्ष्यांचेदेखील हाल होत आहे. अशा परिस्थितीत महावितरणकडून भारनियमन सुरू करण्यात आले आहे. उकाड्यापासून त्रस्त असलेल्या नागरिकांच्या त्रासात वाढ होत आहे. दुपारी ३ तास भारनियमन होत असल्याने जबरदस्त उकाड्यामुळे घरात राहणेदेखील शक्य होत नाही.जिल्हा सामान्य रुग्णालयात उष्माघात कक्ष सुरू उन्हाचा प्रकोप वाढल्याने जिल्हा सामान्य  रुग्णालयात उष्माघात कक्ष सुरू करण्यात आला आहे. तसेच येत्या आठवड्यात १३ क्रमांक वार्ड मध्येदेखील उष्माघात कक्ष सुरू केला जाणार असल्याची माहिती डॉ.दत्तात्रय बिराजदार यांनी दिली. दरवर्षी एप्रिल महिन्याचा पहिल्या आठवड्यात उष्माघात कक्ष सुरू केला जातो. मात्र यंदा मार्च महिन्यातच उष्माघात कक्ष सुरूझाला.