शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
“रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
3
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हण्याल्या...
4
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
5
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
6
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
7
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
8
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
9
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
10
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
11
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
12
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
13
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
14
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
15
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
16
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
17
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
18
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
19
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
20
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
Daily Top 2Weekly Top 5

शहरात उष्णतेचा कहर...

By admin | Updated: March 30, 2017 00:01 IST

शहराचा पारा ४२ अंशावर : सात वर्षातील सर्वाधिक तापमान

जळगाव : गेल्या आठवड्याभरापासून जळगाव शहरात उष्णतेची लाट पसरली असून, मार्च महिन्यात पारा ४२.८ अंशावर पोहचला असल्याने तापमानाने गेल्या सात वर्षाचा विक्रम मोडला आहे. जळगाव शहराचे तापमानाने मार्च महिन्यातच चाळीशी पार केल्याने जळगावकरांना असह्य उकाड्याचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जळगाव शहरात दिवसभर अघोषित संचारबंदी असल्याचा भास जाणवत आहे. महाराष्टÑात सध्या कोरड्या व उष्ण वाºयांचा म्हणजेच ‘लू’ वाºयांचा प्र्रकोप वाढला असल्याने उष्णतेची लाट कायम राहणार आहे. जळगाव शहराच्या तापमानाने ४२ अंशाचा पारा गाठला आहे. मार्र्च महिन्यात जळगाव पाºयाने ७ वर्षानंतर पहिल्यांदाच ४० अंशाचा पारा ओलांडला आहे. याआधी  २०१० मध्ये जळगावचा पारा ४१ अंशावर पोहचला होता. त्यानंतर पहिल्यांदाच शहराच्या तापमानाने मार्च महिन्यात ४२.८ अंशाचा पारा गाठला आहे. तापमान वाढीमुळे सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणारे जळगाव शहर ‘हॉटसीटी’ म्हणून ओळखले जात आहे. तापमान वाढीमुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. सकाळी ११ वाजेनंतर शहरातील मुख्य रस्त्यांप्रमाणे उपनगरातील रस्तेदेखील ओस पडलेले पहायला मिळत आहे. तसेच रात्री उशिरापर्यंत उष्णतेचा झळा नागरिकांना बसत आहेत. त्यामुळे रुग्णांच्या संख्येतदेखील वाढ होत आहे.आठवडाभर राहणार कहर कायम  उत्तर भारत व राजस्थान कडून येत असलेल्या उष्ण वाºयांमुळे तापमानात वाढ होत असल्याची माहिती पुणे हवामान खात्याकडून देण्यात आली आली आहे. ‘लू’ वाºयाचा जोर कायम राहण्याचा अंदाज असल्याने अजून आठवडाभर तरी जळगावकरांना उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. शहराचा पारा ४२ अंशावर गेला आहे. यामुळे नागरिकांसोबतच पशुपक्ष्यांचेदेखील हाल होत आहे. अशा परिस्थितीत महावितरणकडून भारनियमन सुरू करण्यात आले आहे. उकाड्यापासून त्रस्त असलेल्या नागरिकांच्या त्रासात वाढ होत आहे. दुपारी ३ तास भारनियमन होत असल्याने जबरदस्त उकाड्यामुळे घरात राहणेदेखील शक्य होत नाही.जिल्हा सामान्य रुग्णालयात उष्माघात कक्ष सुरू उन्हाचा प्रकोप वाढल्याने जिल्हा सामान्य  रुग्णालयात उष्माघात कक्ष सुरू करण्यात आला आहे. तसेच येत्या आठवड्यात १३ क्रमांक वार्ड मध्येदेखील उष्माघात कक्ष सुरू केला जाणार असल्याची माहिती डॉ.दत्तात्रय बिराजदार यांनी दिली. दरवर्षी एप्रिल महिन्याचा पहिल्या आठवड्यात उष्माघात कक्ष सुरू केला जातो. मात्र यंदा मार्च महिन्यातच उष्माघात कक्ष सुरूझाला.