शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

शहरातील बाजारपेठ, रस्ते पडले ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात मागील महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यातच होळी व धुलिवंदनच्या दिवशी नागरिकांची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरात मागील महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यातच होळी व धुलिवंदनच्या दिवशी नागरिकांची गर्दी होऊ शकते, यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात ३ दिवस कडक निर्बंधाची घोषणा केली. रविवारी पहिल्याच दिवशी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील मुख्य बाजारपेठेसह मुख्य रस्ते सकाळपासूनच ओस पडले होते. चौकाचौकांत तैनात असलेल्या पोलिसांकडून तुरळक येणाऱ्या वाहनधारकांची चौकशी केली जात होती. काम नसताना फिरणाऱ्यांना समज देवून परत पाठविण्यात येत होते.

शहरात वाढत्या कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने २८ ते ३० मार्चदरम्यान लॉकडाऊन जाहीर केला आहे. रविवारी होळी तर सोमवारी धुलिवंदन साजरा केले जाणार आहे. हे दोन्ही सण आपल्याकडे मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. मात्र, यंदा कोरोनाचे संकट असल्याने हे सण साजरे न करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. तसेच खबरदारी म्हणून प्रशासनाने २८ ते ३० या दरम्यान कडक निर्बंध जाहीर केले आहे. अत्यावश्यक सेवेत दवाखाने व मेडिकल्स, शासकीय कार्यालये ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसह, दूधविक्री केंद्र तसेच कृषी क्षेत्रातील आस्थापना, अशा बाबींना यामध्ये सूट देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारच्या बाबींना प्रशासनाकडून सूट नसून कडक निर्बंध आहेत.

चौकाचौकांत पोलिसांचा तगडा बंदोबस्त

लॉकडाऊनची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून शहरात पेट्रोलिंग सुरू आहे. ठिकठिकाणी फिक्स पॉईंट उभारण्यात आले आहेत. मुख्य चौकांमध्ये तपासणी सुरू होती. पेट्रोलिंग दरम्यान, विनाकारण पायी फिरणारे नागरिक आढळून आले, तर त्यांना समज देऊन घरी पाठवण्यात येत आहे. दुसरीकडे महापालिकेची सहा पथकेदेखील जनता कर्फ्यूच्या अंमलबजावणीसाठी तैनात करण्यात आली आहेत.

मुख्य रस्ते पडले ओस, बाजारपेठेतही शुकशुकाट

शहरातील सर्व मुख्य बाजारपेठा बंद असल्याने सकाळपासून गजबज असणाऱ्या भागांमध्ये रविवारी सन्नाटा होता. महामार्गावर वाहतूक सुरू असली तरी शहरातील मुख्य रस्ते मात्र ओस पडले होते. महापालिकेसह शासकीय कार्यालयांमधील कर्मचारी, मेडिकल व रुग्णालयासंदर्भातील काम असणारे नागरिक वगळता रस्त्यावर कुणीही नव्हते. सकाळी काही तरुण मंडळी मोटारसायकलवर फिरत होती. त्यांना चौकांमधील पोलिसांनी अडवून घरी परत जाण्याची समज दिली. पुन्हा कामानिमित्त रस्त्यावर दिसल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला.

वाढलेल्या तापमानामुळे झाली पोलिसांना मदत

तीन दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये नागरिकांना घरातच थांबण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मात्र, दुपारी उन्हाचा पारा वाढल्यानंतर शहरातील प्रमुख रस्त्यांवर पूर्णपणे शुकशुकाट पाहायला मिळाला. शहरात वाढलेल्या तापमानाने देखील लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी प्रशासनाला मदतच केल्याचे पहावयास मिळाले. मात्र, संध्याकाळी काही उपनगरांमध्ये नागरिकांची काही प्रमाणात गर्दी झाल्याचेही दिसून आले. तसेच दादा वाडी, खोटेनगर, निमखेडी परिसर, रामानंदनगर परिसर या भागात काही भाजीपाला विक्रेत्यांनी दुकाने थाटल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी यंदा होळी आपल्या घरातच साजरी केली.