शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

खड्डे, धुळ, चिखलाने त्रस्त नागरिकांनी केली 'अमृत'च्या अधिकाऱ्यांची आरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:12 IST

जळगाव : अमृत योजना तसेच भुयारी गटारीचे अर्धवट काम करून सोडून दिल्यामुळे प्रभाग क्रमांक १६ मधील नागरिकांचे खराब रस्ते, ...

जळगाव : अमृत योजना तसेच भुयारी गटारीचे अर्धवट काम करून सोडून दिल्यामुळे प्रभाग क्रमांक १६ मधील नागरिकांचे खराब रस्ते, खड्डे तसेच धुळीमुळे अतोनात हाल होत आहे. त्यासंदर्भात नागरिकांनी शनिवारी सकाळी अमृत योजनेच्या अधिकाऱ्यांना समस्या मांडण्यासाठी बोलविले असता, त्यावेळी नागरिकांनी संताप व्यक्त करीत अक्षरक्ष: अमृतच्या अधिकाऱ्यांची आरती करीत शिव्यांची लाखोली वाहिली.

शहरातील प्रभाग समिती १६ मधील लक्ष्मीनगर, सम्राट कॉलनी, देवीदास कॉलनी आदी भागांमध्ये गेल्या एक ते दीड वर्षांपासून अमृत योजनेचे काम सुरू आहे. यासाठी रस्त्यावर जागोजागी खड्डे करण्यात आली होती़ त्यातच भुयारी गटारींची कामे या भागात हाती घेण्यात आली. परिणामी, रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. काही दिवसानंतर या खड्ड्यांची थातूरमातूर दुरुस्ती करण्यात आली. मात्र, पुन्हा रस्त्यावर खड्डे पडले. त्यामुळे वर्षभरापासून या भागातील नागरिक खड्डे, खराब रस्ते तसेच धुळीमुळे हैराण होते. आता पावसामुळे जागोजागी चिखल झाल्यामुळे समस्यांमध्ये भर पडली आहे. चालणेसुध्दा कठीण झाले असून वाहने घसरून अपघात होत आहे. एवढेच नव्हे तर खड्ड्यांमध्ये पडून रहिवासी जखमी होत आहेत. याबाबत वारंवार तक्रार केल्यानंतरही दुर्लक्ष होत असल्यामुळे अखेर प्रभाग समिती १६ मधील रहिवाशांनी शनिवारी सकाळी ९ वाजता संबंधित नगरसेवक व अमृतच्या अधिकाऱ्यांना समस्या मांडण्यासाठी बोलवून घेतले. त्यानंतर संतप्त रहिवाशांनी संपूर्ण समस्या मांडल्यानंतर अमृत योजनेच्या निकृष्ट दर्जाचे काम केले म्हणून चार अधिकाऱ्यांची चक्क आरती केली व नाराजी व्यक्त केली.

शिव्यांची लाखोली वाहिली

खराब कामांमुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासामुळे रहिवाशांनी नगरसेवक तसेच संबंधित अधिकाऱ्यांना अक्षरश: शिव्यांची लाखोली वाहिली. तसेच नगसेवक वॉर्डातील कामे पूर्ण करून घेण्यासाठी अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करीत नसल्याचा आरोप रहिवाशानी केला. त्यानंतर तात्काळ रस्त्यांची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

पाऊस झाला की रस्त्यावरून पायी चालणे सुध्दा कठीण झाले आहे़ अनेक जण खड्ड्यांमध्ये पडून जखमी झाल्याच्याही घटना घडत आहेत. धुळ, खड्डे आणि चिखलाच्या समस्यांनी त्रस्त होऊन रहिवाशांनी अधिकाऱ्यांची आरती केली व तात्काळ रस्त्यांची दुरूस्ती करावी, अशी मागणी केली. प्रभाग समिती १६ मधील कामांकडे नेहमी दुर्लक्ष केले जाते. त्याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

- स्वप्निल जगताप, रहिवासी

अमृतच्या कामांमुळे जागोजागी खड्डे झाले आहेत. थातूर-मातूर दुरूस्ती केली असल्यामुळे आता पुन्हा ते खड्डे जैसे थे झाले आहेत. एक वर्षापासून विविध समस्यांना रहिवाश्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे आता तरी लक्ष देवून समस्या सोडविण्यात याव्यात.

- गणेश सपके, रहिवासी