शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

खड्डे, धुळ, चिखलाने त्रस्त नागरिकांनी केली 'अमृत'च्या अधिकाऱ्यांची आरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:12 IST

जळगाव : अमृत योजना तसेच भुयारी गटारीचे अर्धवट काम करून सोडून दिल्यामुळे प्रभाग क्रमांक १६ मधील नागरिकांचे खराब रस्ते, ...

जळगाव : अमृत योजना तसेच भुयारी गटारीचे अर्धवट काम करून सोडून दिल्यामुळे प्रभाग क्रमांक १६ मधील नागरिकांचे खराब रस्ते, खड्डे तसेच धुळीमुळे अतोनात हाल होत आहे. त्यासंदर्भात नागरिकांनी शनिवारी सकाळी अमृत योजनेच्या अधिकाऱ्यांना समस्या मांडण्यासाठी बोलविले असता, त्यावेळी नागरिकांनी संताप व्यक्त करीत अक्षरक्ष: अमृतच्या अधिकाऱ्यांची आरती करीत शिव्यांची लाखोली वाहिली.

शहरातील प्रभाग समिती १६ मधील लक्ष्मीनगर, सम्राट कॉलनी, देवीदास कॉलनी आदी भागांमध्ये गेल्या एक ते दीड वर्षांपासून अमृत योजनेचे काम सुरू आहे. यासाठी रस्त्यावर जागोजागी खड्डे करण्यात आली होती़ त्यातच भुयारी गटारींची कामे या भागात हाती घेण्यात आली. परिणामी, रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. काही दिवसानंतर या खड्ड्यांची थातूरमातूर दुरुस्ती करण्यात आली. मात्र, पुन्हा रस्त्यावर खड्डे पडले. त्यामुळे वर्षभरापासून या भागातील नागरिक खड्डे, खराब रस्ते तसेच धुळीमुळे हैराण होते. आता पावसामुळे जागोजागी चिखल झाल्यामुळे समस्यांमध्ये भर पडली आहे. चालणेसुध्दा कठीण झाले असून वाहने घसरून अपघात होत आहे. एवढेच नव्हे तर खड्ड्यांमध्ये पडून रहिवासी जखमी होत आहेत. याबाबत वारंवार तक्रार केल्यानंतरही दुर्लक्ष होत असल्यामुळे अखेर प्रभाग समिती १६ मधील रहिवाशांनी शनिवारी सकाळी ९ वाजता संबंधित नगरसेवक व अमृतच्या अधिकाऱ्यांना समस्या मांडण्यासाठी बोलवून घेतले. त्यानंतर संतप्त रहिवाशांनी संपूर्ण समस्या मांडल्यानंतर अमृत योजनेच्या निकृष्ट दर्जाचे काम केले म्हणून चार अधिकाऱ्यांची चक्क आरती केली व नाराजी व्यक्त केली.

शिव्यांची लाखोली वाहिली

खराब कामांमुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासामुळे रहिवाशांनी नगरसेवक तसेच संबंधित अधिकाऱ्यांना अक्षरश: शिव्यांची लाखोली वाहिली. तसेच नगसेवक वॉर्डातील कामे पूर्ण करून घेण्यासाठी अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करीत नसल्याचा आरोप रहिवाशानी केला. त्यानंतर तात्काळ रस्त्यांची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

पाऊस झाला की रस्त्यावरून पायी चालणे सुध्दा कठीण झाले आहे़ अनेक जण खड्ड्यांमध्ये पडून जखमी झाल्याच्याही घटना घडत आहेत. धुळ, खड्डे आणि चिखलाच्या समस्यांनी त्रस्त होऊन रहिवाशांनी अधिकाऱ्यांची आरती केली व तात्काळ रस्त्यांची दुरूस्ती करावी, अशी मागणी केली. प्रभाग समिती १६ मधील कामांकडे नेहमी दुर्लक्ष केले जाते. त्याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

- स्वप्निल जगताप, रहिवासी

अमृतच्या कामांमुळे जागोजागी खड्डे झाले आहेत. थातूर-मातूर दुरूस्ती केली असल्यामुळे आता पुन्हा ते खड्डे जैसे थे झाले आहेत. एक वर्षापासून विविध समस्यांना रहिवाश्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे आता तरी लक्ष देवून समस्या सोडविण्यात याव्यात.

- गणेश सपके, रहिवासी