शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; लेखक, कवी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार परत करणार
2
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
3
Iran Israel War: मोठ्या संकटात अडकलाय भारत; ३.६ लाख कोटींचा आकडा का घाबरवतोय?
4
नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...
5
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
6
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!
7
तुमचा पैसा 'रॉकेट' बनवणार! 'या' ५ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ? पाहा संपूर्ण यादी!
8
पुतण्याच्या प्रेमात काकी झाली वेडी, पती आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडलं, पुतण्यासोबत लग्न केलं
9
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
10
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
11
भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर
12
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
13
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
14
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
15
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
16
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
17
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
18
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
19
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
20
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 

धूळ अन‌् धुराने त्रस्त असलेले नागरिक अखेर उतरले रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - शहरातील खराब रस्त्यांमुळे उडणाऱ्या धुळीमुळे जळगावकर अक्षरश त्रस्त झाले आहेत. त्यातच अनेक वर्षांपासून बंद ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - शहरातील खराब रस्त्यांमुळे उडणाऱ्या धुळीमुळे जळगावकर अक्षरश त्रस्त झाले आहेत. त्यातच अनेक वर्षांपासून बंद असलेल्या घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणी कचऱ्याला लागलेल्या आगीमधून निघणाऱ्या धुरामुळेदेखील शहरातील अनेक भागात नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेक वर्षांपासून धूळ अन‌् धुरामुळे त्रस्त असलेल्या जळगावकरांचा अखेर संयम सुटला असून, शुक्रवारी सकाळी १० वाजता पवार पार्क, चंदू अण्णा नगरातील रहिवाश्यांनी घनकचरा प्रकल्पाकडे जाणाऱ्या मनपाच्या घंटागाड्या व इतर वाहने अडविली, तसेच जोपर्यंत धूळ व धुराचा त्रास कमी करण्याबाबत उपाययोजना होणार नाही, तोवर वाहने सोडण्यास रहिवाश्यांनी नकार दिला.

शहरातील पवार पार्क व चंदु अण्णा नगर भागाकडून दररोज घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणी जाणारी वाहने, बायपासच्या कामासाठी व वाळू उपसा करणारी शेकडो वाहने ये-जा करतात, त्यातच रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाल्याने वाहने गेल्यावर रस्त्यावरून उडणारी धूळ थेट घरात जाते. त्यातच घनकचरा प्रकल्पाकडे जाणारी अनेक वाहने रस्त्यालगत कचरा टाकत जातात. यामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेक वर्षांपासून या भागातील नागरिक हा त्रास सहन करीत आहेत. शुक्रवारी नागरिकांचा संयम सुटला व सकाळी १० वाजता घनकचरा प्रकल्पाकडे जाणारी सर्व वाहने या भागातील महिला व युवकांनी अडवून ठेवली.

२४ तास घराचा दरवाजा ठेवावा लागतो बंद

दिवसा असो वा रात्री २४ तास धूळ व धुरामुळे घराचा दरवाजा बंद ठेवावा लागत असल्याची तक्रार या भागातील महिलांनी केली. सकाळी रस्त्यावरची धूळ घरांमध्ये जाते, तर रात्रीच्या वेळेस घनकचरा प्रकल्पातील कचऱ्याला लागलेल्या आगीमुळे निघणारा धूर घरांमध्ये जातो. यामुळे घरात थांबणेही कठीण झाले आहे. मनपाकडून रस्त्याचीही दुरुस्ती केली जात नाही. दुसरीकडे धुराबाबतदेखील कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याची तक्रार या भागातील महिलांनी केली. स्थानिक नगरसेवक व मनपा प्रशासनाकडे तक्रार करूनदेखील दखल घेतली जात नसल्याचेही रहिवाश्यांनी सांगितले.

अन्यथा घरं विक्री करून गावाकडे परतावे लागेल

या भागात घर घेतल्यानंतर ही समस्या दररोज सहन करावी लागत आहे. आता ही समस्या जर कायम राहिली तर या भागातील सर्वांना घरं विक्री करून इतरत्र किंवा पुन्हा गावांमध्ये स्थायिक व्हावे लागेल, असा संताप नागरिकांनी व्यक्त केला.

वाहने न सोडल्यास गुन्हा दाखल करू, नगरसेविका पतीची धमकी

नागरिकांनी मनपाच्या वाहनांसह बायपासच्या कामासाठी जाणारी वाहनेदेखील रोखून धरली. रस्त्याचा दोन्ही बाजूस १० ते १५ वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. नागरिकांनी वाहने सोडण्यास नकार दिला. यामुळे भाजप नगरसेविका गायत्री राणे यांचे पती इंद्रजीत राणे यांनी स्थानिक नागरिकांना वाहने सोडा, अन्यथा गुन्हा दाखल करू, अशी धमकी दिली. स्थानिक रहिवाश्यांनी वाहने सोडण्याआधी रस्त्यावर पाणी तरी मारा, अशी मागणी केली. शाब्दीक वादानंतर अखेर राणे यांनी रस्त्यावर पाणी मारण्याचे आश्वासन दिल्यानंतर ती वाहने सोडण्यात आली.

सहायक आयुक्तांकडे मांडली गाऱ्हाणी

घंटागाड्या व मनपाची इतर वाहने नागरिकांनी अडवून घेतल्यामुळे सहायक आयुक्त पवन पाटील यांनी याठिकाणी जावून नागरिकांची बाजू ऐकून घेतली; मात्र संतप्त नागरिकांनी जोपर्यंत कचऱ्याच्या धुरावर बंदोबस्त करत नाही, तोपर्यंत वाहने सोडणार नाही, अशी भूमिका घेतली. स्वच्छ भारती सर्वेक्षण समन्वयक महेंद्र पवार यांनी मध्यस्थी करत नागरिकांची समजूत काढली, तसेच दोन दिवसात जर रस्त्याच्या धुळीपासून व कचऱ्याच्या धुराच्या समस्येवर तोडगा काढला नाही तर रस्त्यावरचा कचरा मनपासमोर पेटवून एकही वाहन कचरा प्रकल्पात जावू देणार नाही, असा इशारा रहिवाश्यांनी दिला. मनपा प्रशासनाने आश्वासन दिल्यानंतर सुमारे २ तासानंतर सर्व वाहने नागरिकांनी सोडली.