शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
झालं... युपीआय बॅलन्स चेकवर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
3
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
4
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
5
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
6
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
7
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
8
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
9
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
10
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
11
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
12
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
13
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
14
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
15
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
16
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
17
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
18
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
19
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय

चाळीसगाव महाविद्यालयाने साकारला सौरऊर्जा प्रकल्प मॉडेल प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 20:16 IST

बी.पी.आर्टस, एस.एम.ए.सायन्स, के.के.सी.कॉमर्स कॉलेज आणि के.आर. कोतकर ज्युनियर कॉलेजमध्ये १० केव्हीए क्षमतेच्या सोलर ऊर्जा प्रकल्पाचा उद्घाटन समारंभ नुकताच खासदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते झाले.

ठळक मुद्देखासदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते झाले उद्घाटनचाळीसगाव पंचक्रोशीत महाविद्यालय स्तरावर पहिला प्रकल्प१० केव्हीए क्षमतामान्यवरांकडून कौतुक

चाळीसगाव, जि.जळगाव :- बी.पी.आर्टस, एस.एम.ए.सायन्स, के.के.सी.कॉमर्स कॉलेज आणि के.आर. कोतकर ज्युनियर कॉलेजमध्ये १० केव्हीए क्षमतेच्या सोलर ऊर्जा प्रकल्पाचा उद्घाटन समारंभ नुकताच खासदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी संस्थेच्या मॅनेजिंंग बोर्डाचे चेअरमन नारायणदास अग्रवाल होते.उमंग समाज शिल्पी परीवाराच्या अध्यक्षा संपदा पाटील, उपाध्यक्ष मिलिंद देशमुख, डॉ. एम. बी.पाटील, श्यामलाल कुमावत, क. मा. राजपूत, मु. रा. अमृतकार, डॉ. सुनील राजपूत, भाजपा तालुकाध्यक्ष के. बी. साळुंखे, ज.मो. अग्रवाल, योगेश अग्रवाल, अशोक बाबूलाल वाणी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रास्तविक प्राचार्य डॉ मिलिंद बिल्दीकर यांनी केले.चाळीसगाव महाविद्यालयाने अपारंपरिक ऊर्जा श्रोताचा वापर करण्यासाठी सौर प्रकल्पची उभारणी केली. ही बाब खरोखर समाजापुढे आदर्श निर्माण करणारी आहे. अपारंपरिक ऊर्जा श्रोतांच्या माध्यमातून घरोघरी उर्जा निमीर्ती केली जाऊ शकते व त्यातून अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध होऊ शकतात. ग्रामीण भागातील विद्यार्थां नोकरीच्या मागे न जाता रोजगार निर्माती करू शकतो. तसेच महाविद्यालयाने व्यावसायिक अभ्यासक्रमांवर भर देऊन तरुणांना रोजगाराभिमुख करावे. तालुक्यातील इतर शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना हा प्रकल्प आवर्जून दाखवावा. त्यांना या संदर्भात समजून सांगावे. जेणेकरून ग्रामीण भागात सौर ऊर्जेचे महत्व समजेल. महाविद्यालयास डॉ.मिलिंद बिल्दीकर यांच्या रूपाने संगणक , माहीती व तंत्रज्ञाना क्षेत्राशी निगडीत व अभ्यासू प्राचार्य मिळाले. त्यामुळे नारायणदास अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयाची व पर्यायाने संस्थेची प्रगती होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाविद्यालयाच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्वतोपरी मदतीचे आश्वासनही पाटील यांनी यावेळी दिले. उन्मेष पाटील हे जळगाव लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला.संपदा पाटील, के. बी. साळुंखे संचालक योगेश अग्रवाल यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगतात नारायणदास अग्रवाल म्हणाले की, गेल्या काही वर्षांमध्ये, विजेचे दर कमालीचे वाढले आहेत. सौरऊर्जा निर्माण केल्यास आपल्या विजेच्या बिलात बचत होईल. आपल्या संस्थेचा माजी विद्यार्थी खासदार झाल्याचा खूप आनंद झाला. सूत्रसंचालन प्रा. रवींद्र पाटील यांनी, तर आभार उपप्राचार्य अजय काटे यांनी मानले.