शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

माझी वसुंधरा अभियानात राज्यात चिनावल तृतीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:13 IST

चिनावल, ता. रावेर : येथील ग्राम पंचायतीने सन २०२०-२१ अंतर्गत महाराष्ट्र राज्य शासनाने पर्यावरण विभाग व वातावरणातील ...

चिनावल, ता. रावेर : येथील ग्राम पंचायतीने सन २०२०-२१ अंतर्गत महाराष्ट्र राज्य शासनाने पर्यावरण विभाग व वातावरणातील बदल विभागामार्फत राबविलेल्या ‘माझी वसुंधरा अभियानात’ राज्यातून तृतीय क्रमांक मिळवला आहे. यामुळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

५ जून रोजी मुंबई येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री संजय बनसोडे विभागाच्या आयुक्त मनीषा म्हैसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत निकाल जाहीर करून हा पुरस्कार ऑनलाइन देण्यात आला.

या अभियानात जळगाव जिल्ह्यातून चिनावल तालुका रावेर या ग्राम पंचायतीने शासनाने व पर्यावरण विभागाने ठरवून दिलेल्या सर्व त्या निकषांचे पालन करत गाव प्रदूषणमुक्त केले तसेच प्लास्टिकमुक्त गाव, घनकचरा व्यवस्थापन, गांडूळखत प्रकल्प, सोलर ऊर्जास्रोत, ई-लर्निंग शाळा आदींकडे लक्ष पुरविले. कोरोना काळ असूनही ही मोहीम चिनावल ग्राम पंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच भावना योगेश बोरोले, उपसरपंच, ग्राम विकास २९१ ग्राम पंचायतींमधून ही निवड करण्यात आली आहे. यात जळगाव जिल्ह्यातून राज्यात चिनावल सर्वोत्कृष्ट ग्राम पंचायत व राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आल्याने उपस्थित मंत्र्यांनी सरपंच भावना बोरोले, ग्राम विकास अधिकारी संतोष सपकाळे यांचे ऑनलाइन पद्धतीने अभिनंदन करून पुरस्कार ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला चिनावल ग्राम पंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच भावना बोरोले, रावेर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल सर्व सदस्य ऑनलाइन पद्धतीने या कार्यक्रमाशी जुळले होते. चिनावल ग्राम पंचायत कार्यालयातून या सोहळ्यात सर्व सहभागी झाले होते. या आधीही ग्रामपंचायतीने वेळोवेळी राबविलेल्या अभियान असो वा पुरस्कार तसेच तंटामुक्ती अभियान असो यात नेहमीच अव्वल नंबर पटकावला आहे. सरपंच भावना बोरोले यांच्या उत्कृष्ट कार्याने त्यांना स्वतः मानवाधिकार संघटनेचा खानदेश रणरागिणी राज्यस्तरीय नारीरत्न पुरस्कारही मिळाला आहे.

सदर कार्यक्रम हा ऑनलाइन असला तरी चिनावल ग्राम पंचायत कार्यालयात पोलीस पाटील नीलेश नेमाडे, तंटामुक्ती अध्यक्ष व माजी सरपंच योगेश बोरोले. ग्राम पंचायत सदस्य सागर भारंबे, कविता किरंगे, धनश्री नेमाडे व सर्व सदस्य हजर होते.