शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

माझी वसुंधरा अभियानात राज्यात चिनावल तृतीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:13 IST

चिनावल, ता. रावेर : येथील ग्राम पंचायतीने सन २०२०-२१ अंतर्गत महाराष्ट्र राज्य शासनाने पर्यावरण विभाग व वातावरणातील ...

चिनावल, ता. रावेर : येथील ग्राम पंचायतीने सन २०२०-२१ अंतर्गत महाराष्ट्र राज्य शासनाने पर्यावरण विभाग व वातावरणातील बदल विभागामार्फत राबविलेल्या ‘माझी वसुंधरा अभियानात’ राज्यातून तृतीय क्रमांक मिळवला आहे. यामुळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

५ जून रोजी मुंबई येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री संजय बनसोडे विभागाच्या आयुक्त मनीषा म्हैसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत निकाल जाहीर करून हा पुरस्कार ऑनलाइन देण्यात आला.

या अभियानात जळगाव जिल्ह्यातून चिनावल तालुका रावेर या ग्राम पंचायतीने शासनाने व पर्यावरण विभागाने ठरवून दिलेल्या सर्व त्या निकषांचे पालन करत गाव प्रदूषणमुक्त केले तसेच प्लास्टिकमुक्त गाव, घनकचरा व्यवस्थापन, गांडूळखत प्रकल्प, सोलर ऊर्जास्रोत, ई-लर्निंग शाळा आदींकडे लक्ष पुरविले. कोरोना काळ असूनही ही मोहीम चिनावल ग्राम पंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच भावना योगेश बोरोले, उपसरपंच, ग्राम विकास २९१ ग्राम पंचायतींमधून ही निवड करण्यात आली आहे. यात जळगाव जिल्ह्यातून राज्यात चिनावल सर्वोत्कृष्ट ग्राम पंचायत व राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आल्याने उपस्थित मंत्र्यांनी सरपंच भावना बोरोले, ग्राम विकास अधिकारी संतोष सपकाळे यांचे ऑनलाइन पद्धतीने अभिनंदन करून पुरस्कार ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला चिनावल ग्राम पंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच भावना बोरोले, रावेर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल सर्व सदस्य ऑनलाइन पद्धतीने या कार्यक्रमाशी जुळले होते. चिनावल ग्राम पंचायत कार्यालयातून या सोहळ्यात सर्व सहभागी झाले होते. या आधीही ग्रामपंचायतीने वेळोवेळी राबविलेल्या अभियान असो वा पुरस्कार तसेच तंटामुक्ती अभियान असो यात नेहमीच अव्वल नंबर पटकावला आहे. सरपंच भावना बोरोले यांच्या उत्कृष्ट कार्याने त्यांना स्वतः मानवाधिकार संघटनेचा खानदेश रणरागिणी राज्यस्तरीय नारीरत्न पुरस्कारही मिळाला आहे.

सदर कार्यक्रम हा ऑनलाइन असला तरी चिनावल ग्राम पंचायत कार्यालयात पोलीस पाटील नीलेश नेमाडे, तंटामुक्ती अध्यक्ष व माजी सरपंच योगेश बोरोले. ग्राम पंचायत सदस्य सागर भारंबे, कविता किरंगे, धनश्री नेमाडे व सर्व सदस्य हजर होते.