शहरं
Join us  
Trending Stories
1
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
2
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
3
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
4
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
5
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
6
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
7
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
8
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
9
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
10
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
11
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
12
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
13
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
14
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
15
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
16
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
17
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
18
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
19
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
20
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 

मिरचीचे दर एकदमच गडगडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:20 IST

मुक्ताईनगर : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी मिरची लागवड केली खरी परंतु भाव एकदम घसरल्याने या मिरची उत्पादक ...

मुक्ताईनगर : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी मिरची लागवड केली खरी परंतु भाव एकदम घसरल्याने या मिरची उत्पादक शेतकऱ्यांना खूपच नुकसान पोहोचल्याची स्थिती आहे.

सुरुवातीला चार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटल दराने विकल्या जाणाऱ्या मिरचीचे दर गडगडल्याने सध्या बाजारात केवळ सातशे ते आठशे रुपये भाव मिळत असल्याने या भावात शेतकऱ्यांच्या तोडणीचा खर्चही भागत नसल्याची स्थिती आहे.

तालुक्यात पारंपरिक पिकांना फाटा देत अनेक शेतकऱ्यांनी मिरची पिकाची लागवड केली होती. गेल्या काळात मिरची पिकाने शेतकऱ्यांना तारले होते. शेतकऱ्यांना चांगला भाव मिळतो म्हणून मे महिन्यात अनेकांनी उपलब्ध पाण्याचे नियोजन करून मिरची लागवड केली आहे तर काही शेतकऱ्यांनी जून महिन्यात पाऊस पडल्यावर मिरची लागवड केली होती; परंतु सध्याच्या स्थितीला औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील घाटावरील भागात मिरचीचे उत्पन्न कमालीचे वाढले आणि तिकडे मिरचीचे दर पडल्याने त्याचा फटका जिल्ह्यातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. बाजारात दररोज कमालीचे दर पडत आहेत. परिणामी केलेला खर्चही निघत नसल्याने मिरची उत्पादक शेतकरी पुरता हवालदिल झालाय. प्रारंभी ५ ते ६ हजार रुपये प्रतिक्विंटल पोहोचलेले दर पंधरवड्यात ७०० ते ९०० रुपयांपर्यंत गडगडले आहेत.

मिरची रोप लागवडीपासून ते तोडणीपर्यंत शेतकऱ्याला २० ते २२ रुपये प्रतिकिलोपर्यंत अंदाजित खर्च येतो. यात तोडणी मजूर मिळत नाही आणि मिळालेच तर सध्या एक किलो मिरची तोडण्यासाठी सहा रुपये मजुरी खर्च येतो. बाजारात मिरचीला ७ ते ९ रुपये किलो भाव आहे. फक्त तोडणी आणि वाहतूक खर्चापुरताच इतका भाव मिळत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

कुऱ्हा बाजारात काल १० रुपये किलो हिरवी मिरची मिळत होती. मिरची उत्पादक शेतकऱ्यांना सरासरी २० रुपये किलो उत्पादन खर्च लागतो अशात मिरचीची शेतीतून उत्पादन खर्च ही निघणे कठीण झाले आहे.

- अनिल पाटील, मिरची उत्पादक शेतकरी पारंबी, ता. मुक्ताईनगर