शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

मिरचीचे दर एकदमच गडगडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:20 IST

मुक्ताईनगर : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी मिरची लागवड केली खरी परंतु भाव एकदम घसरल्याने या मिरची उत्पादक ...

मुक्ताईनगर : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी मिरची लागवड केली खरी परंतु भाव एकदम घसरल्याने या मिरची उत्पादक शेतकऱ्यांना खूपच नुकसान पोहोचल्याची स्थिती आहे.

सुरुवातीला चार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटल दराने विकल्या जाणाऱ्या मिरचीचे दर गडगडल्याने सध्या बाजारात केवळ सातशे ते आठशे रुपये भाव मिळत असल्याने या भावात शेतकऱ्यांच्या तोडणीचा खर्चही भागत नसल्याची स्थिती आहे.

तालुक्यात पारंपरिक पिकांना फाटा देत अनेक शेतकऱ्यांनी मिरची पिकाची लागवड केली होती. गेल्या काळात मिरची पिकाने शेतकऱ्यांना तारले होते. शेतकऱ्यांना चांगला भाव मिळतो म्हणून मे महिन्यात अनेकांनी उपलब्ध पाण्याचे नियोजन करून मिरची लागवड केली आहे तर काही शेतकऱ्यांनी जून महिन्यात पाऊस पडल्यावर मिरची लागवड केली होती; परंतु सध्याच्या स्थितीला औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील घाटावरील भागात मिरचीचे उत्पन्न कमालीचे वाढले आणि तिकडे मिरचीचे दर पडल्याने त्याचा फटका जिल्ह्यातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. बाजारात दररोज कमालीचे दर पडत आहेत. परिणामी केलेला खर्चही निघत नसल्याने मिरची उत्पादक शेतकरी पुरता हवालदिल झालाय. प्रारंभी ५ ते ६ हजार रुपये प्रतिक्विंटल पोहोचलेले दर पंधरवड्यात ७०० ते ९०० रुपयांपर्यंत गडगडले आहेत.

मिरची रोप लागवडीपासून ते तोडणीपर्यंत शेतकऱ्याला २० ते २२ रुपये प्रतिकिलोपर्यंत अंदाजित खर्च येतो. यात तोडणी मजूर मिळत नाही आणि मिळालेच तर सध्या एक किलो मिरची तोडण्यासाठी सहा रुपये मजुरी खर्च येतो. बाजारात मिरचीला ७ ते ९ रुपये किलो भाव आहे. फक्त तोडणी आणि वाहतूक खर्चापुरताच इतका भाव मिळत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

कुऱ्हा बाजारात काल १० रुपये किलो हिरवी मिरची मिळत होती. मिरची उत्पादक शेतकऱ्यांना सरासरी २० रुपये किलो उत्पादन खर्च लागतो अशात मिरचीची शेतीतून उत्पादन खर्च ही निघणे कठीण झाले आहे.

- अनिल पाटील, मिरची उत्पादक शेतकरी पारंबी, ता. मुक्ताईनगर