शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मिरचीचे दर एकदमच गडगडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:20 IST

मुक्ताईनगर : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी मिरची लागवड केली खरी परंतु भाव एकदम घसरल्याने या मिरची उत्पादक ...

मुक्ताईनगर : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी मिरची लागवड केली खरी परंतु भाव एकदम घसरल्याने या मिरची उत्पादक शेतकऱ्यांना खूपच नुकसान पोहोचल्याची स्थिती आहे.

सुरुवातीला चार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटल दराने विकल्या जाणाऱ्या मिरचीचे दर गडगडल्याने सध्या बाजारात केवळ सातशे ते आठशे रुपये भाव मिळत असल्याने या भावात शेतकऱ्यांच्या तोडणीचा खर्चही भागत नसल्याची स्थिती आहे.

तालुक्यात पारंपरिक पिकांना फाटा देत अनेक शेतकऱ्यांनी मिरची पिकाची लागवड केली होती. गेल्या काळात मिरची पिकाने शेतकऱ्यांना तारले होते. शेतकऱ्यांना चांगला भाव मिळतो म्हणून मे महिन्यात अनेकांनी उपलब्ध पाण्याचे नियोजन करून मिरची लागवड केली आहे तर काही शेतकऱ्यांनी जून महिन्यात पाऊस पडल्यावर मिरची लागवड केली होती; परंतु सध्याच्या स्थितीला औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील घाटावरील भागात मिरचीचे उत्पन्न कमालीचे वाढले आणि तिकडे मिरचीचे दर पडल्याने त्याचा फटका जिल्ह्यातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. बाजारात दररोज कमालीचे दर पडत आहेत. परिणामी केलेला खर्चही निघत नसल्याने मिरची उत्पादक शेतकरी पुरता हवालदिल झालाय. प्रारंभी ५ ते ६ हजार रुपये प्रतिक्विंटल पोहोचलेले दर पंधरवड्यात ७०० ते ९०० रुपयांपर्यंत गडगडले आहेत.

मिरची रोप लागवडीपासून ते तोडणीपर्यंत शेतकऱ्याला २० ते २२ रुपये प्रतिकिलोपर्यंत अंदाजित खर्च येतो. यात तोडणी मजूर मिळत नाही आणि मिळालेच तर सध्या एक किलो मिरची तोडण्यासाठी सहा रुपये मजुरी खर्च येतो. बाजारात मिरचीला ७ ते ९ रुपये किलो भाव आहे. फक्त तोडणी आणि वाहतूक खर्चापुरताच इतका भाव मिळत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

कुऱ्हा बाजारात काल १० रुपये किलो हिरवी मिरची मिळत होती. मिरची उत्पादक शेतकऱ्यांना सरासरी २० रुपये किलो उत्पादन खर्च लागतो अशात मिरचीची शेतीतून उत्पादन खर्च ही निघणे कठीण झाले आहे.

- अनिल पाटील, मिरची उत्पादक शेतकरी पारंबी, ता. मुक्ताईनगर