शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

डाळ तिखट, चपाती भात चांगला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:15 IST

जळगाव : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात सुरू असलेल्या कोविड केअर सेंटर मधून जेवणाची गुणवत्ता निकृष्ट असल्याच्या तक्रारी गेल्या आठवडाभरापासून ...

जळगाव : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात सुरू असलेल्या कोविड केअर सेंटर मधून जेवणाची गुणवत्ता निकृष्ट असल्याच्या तक्रारी गेल्या आठवडाभरापासून समोर येत आहेत. ‘लोकमत’ प्रतिनिधीने शनिवारी थेट कोविड केअर सेंटरमध्ये जाऊन या जेवणाची चव घेऊन हे वास्तव तपासले. यात ३ चपात्या डाळ आणि भात आणि दोन केळी असे जेवण दुपारी बाराच्या सुमारास रुग्णांना प्राप्त झाले होते. यातील डाळ थोडी तिखट होती, चपाती भाताची गुणवत्ता बरी होती. मात्र यात थोडी सुधारणा आवश्यक असल्याचे चित्र आहे. पौष्टिकतेच्या दृष्टीनेही विचार होणे आवश्यक आहे.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील केंद्र ४ वर सकाळी ११ पासून पाहणी केली असता. डिस्चार्ज होणाऱ्या रुग्णांसोबत दाखल होणाऱ्या रुग्णांची रांग लागलेली होती. तासाभरात ही इमारत फुल्ल झाली होती. बाहेर एक परिचरिका रुग्णांची नोंदणी करीत होत्या. ११.३० वाजेच्या सुमारास एका मालवाहू रिक्षात जेवणाची पाकीट आले. सर्वात मागच्या इमारतीत तेथे जेवणाचे पाकीट वाटप केल्यानंतर टप्प्याटप्प्याने ते केंद्र क्रमांक चारवर पोहोचले. या ठिकाणी काही मुलांनी जेवण्याचे पाकीट खाली उतरवले. रूग्णांना हाका मारण्यात आल्या. त्यानुसार रुग्ण खाली आले. रुग्णांना गर्दीत उभे करून ताट तयार करून त्यात एक वाटी ठेवून जेवणाचे पाकीट ठेवण्यात आले. हे ताट घेऊन रूग्ण आपापल्या खोलीत गेले. काही दिवसांपूर्वी प्रचंड प्रमाणात तक्रारी वाढल्याने अखेर यात बदल करण्यात आल्याची माहिती आहे.

काय होते जेवण

मसाले, तूर डाळ, भात आणि ३ चपात्या यासोबत दोन केळी यात चपात्या या बऱ्यापैकी नरम होत्या. याची चव चांगली होती मात्र नेहमीच्या मानाने थोडी तिखट डाळ होती. कोविडमध्ये रुग्णांची चव जात असल्याने त्यांना अन्नाची चव लागत नसल्याचे जेवण वाटप करणाऱ्यांनी यावेळी सांगितले.

प्रमाण कमी

सकाळचे जेवण व रात्रीचे जेवण यात साधारण सात ते साडेसात तासाचे अंतर असते, मात्र यात तीन पोळ्या, थोडा भात आणि डाळ आणि दोन केळी हे प्रमाण थोडे कमी असल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे. तरुणांसाठी हे जेवण कमीच असल्याचे काही तरुणांनी सांगितले.

थेट सीसीतील अनुभव

सकाळी नाष्टा, दुपारी ११.३० ते बाराच्या दरम्यान जेवण, ४ वाजता चहा, सायंकाळी ७ ते ७.३० वाजता जेवण असा आहाराचा क्रम असतो. स्वछता ठेवली जाते, पाण्याची समस्या क्वचित उद्भवते, कर्मचाऱ्यांची वागणूक चांगली आहे.

फक्त गोळ्या घ्या

या ठिकाणी केवळ सौम्य किंवा लक्षणे नसलेल्या रुग्णांनाच दाखल करण्यात येते त्यामुळे पाच दिवसांच्या गोळ्या देण्यात येतात. नंतर काही त्रास झाल्यास ती औषधी देण्यात येते, डॉक्टर मात्र तपासणीला जात नाही. सगळ्यांना एकत्रित खाली बोलवून विचारणा होते.