शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
3
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
5
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
6
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
7
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
8
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
9
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
10
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
11
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
12
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
13
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
14
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
15
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
16
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
17
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
18
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
19
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
20
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात

कोरोना काळात बालविवाहांचे प्रमाण वाढले ; विद्यार्थींनींच्या गळ्यात मंगळसुत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात कोरोनाच्या काळात अनेक मुलींचे कमी वयातच किंवा शिक्षण अर्धवट सोडून विवाह केले जात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाच्या काळात अनेक मुलींचे कमी वयातच किंवा शिक्षण अर्धवट सोडून विवाह केले जात आहेत. मुली दहावी किंवा बारावी झाल्या की लगेच त्यांच्या विवाहाची तयारी केली जाते. त्यामुळे अनेक मुलींच्या गळ्यात शाळेनंतर लगेचच मंगळसुत्र पडत आहे. ग्रामीण भागात हे प्रमाण जास्त आहे. चोपडा, यावल तालुक्यातील आदिवासी भागात तर याबाबतचे कसलेच नियम पाळले जात नाहीत.

जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाने गेल्या काही काळात सहा तक्रारींच्या दृष्टीने बालविवाह रोखले आहेत. मात्र ज्या तक्रारी आलेल्या नाहीत. ते बालविवाह कुणीही रोखु शकले नाहीत. कोरोनाच्या काळात शाळा बंद झाल्या. मुलींचे शिक्षण थांबले. त्यांना घर सांभाळावे लागते. किंवा बाहेर कामाला जावे लागते. त्यात अनेक कुटुंबांमध्ये कमावणारी व्यक्ती एकच असते. त्या आर्थिक विवंचनेतून देखील अल्प उत्पन्न गटात मुलींचे लग्न लवकर केले जात आहे. प्रशासनाने पोलीस पाटील, आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांच्या मदतीने मोहीम राबवुन हे विवाह रोखण्याची गरज आहे.

पटसंख्या कमी झालेल्या मुली गेल्या कुठे?

जिल्ह्यात बहुतांश शाळा गेल्या वर्षभरापासून बंद आहे. मधला काही काळ आठवी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या होत्या. आता पुन्हा या वर्गांच्या शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र त्यातही मुलींची शाळेतील उपस्थिती कमी आहे. त्यामुळे या मुली गेल्या कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

विद्यार्थींनींच्या गळ्यात मंगळसुत्र

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांनी सांगितले की, जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण फारसे नाही, असे असले तरी प्रशासनाकडे आलेल्या तक्रारीव्यतिरिक्त अनेक बालविवाह होत असल्याचे निरीक्षण लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनी नोंदविले आहे. शाळा बंद झाल्यानंतर बहुतांश मुलींची लग्ने लावुन दिली गेली आहेत.

आर्थिक विवंचनेचे मोठे कारण

कोरोनाच्या काळात अनेकांचे रोजगार गेले. त्यामुळे भविष्यात मुलीचे लग्न कसे होईल, याचा विचार करून अनेकांनी लवकरात लवकर वयात न आलेल्या मुलींचे लग्न लावुन दिले आहे. ग्रामीण भागापेक्षा आदिवासी भागात याचे प्रमाण जास्त आहे.

कोट -

जिल्ह्यात बालविवाहाचे फारसे प्रमाण वाढलेले नाही. मागील काळात सहा विवाह रोखण्यात आले होते. कोरोना काळात देखील अशा घटना फारशा समोर आलेल्या नाहीत. - विजयसिंग परदेशी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी

----

रोजगार नसल्याने तसेच कमवणारी व्यक्ती एकच असल्याने मुलींची लग्न लवकर करून दिले जात आहे. त्यातच शाळा बंद असल्याने बालविवाहांचे प्रमाण वाढले. ज्यांच्या तक्रारी आल्या ते कमी असले तरी तक्रारी न येता विवाह झालेले असंख्य आहेत. या मुलींना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यासाठी प्रशासन आणि सर्वांनी सामुदायिक प्रयत्न करावे - प्रतिभा शिंदे, समाजसेविका

जिल्ह्यातील एकुण शाळा ७०८

शाळा सुरू- ३०६

एकुण विद्यार्थी १,६८,६७०

एकुण हजेरी - २५०००