शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खासदार करायचं म्हटल्यावर करतो अन् पाडायचं म्हटलं तर पाडतोच' अजित पवारांची टोलेबाजी
2
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
3
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
4
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न
5
आम्ही भारतात गुंतवणूक करतच राहू; भारत सरकारला.., Apple चा ट्रम्पना मोठा झटका
6
सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकारने तिजोरी उघडली
7
Sankashthi Chaturthi 2025: मन अस्थिर, अशांत असेल त्याक्षणी म्हणा किंवा ऐका 'हे' गणेशस्तोत्र!
8
मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतर मेहता नरमले; गेल्या दोन वर्षांपासून बंद पडलेले काशिगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्याचे काम सुरु झाले
9
घर आणि गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! RBI रेपो रेट ०.७५% ने कमी करू शकते; किती येईल EMI
10
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार... 
11
आता ५९५ कोटींचा घोटाळा? Indusind Bank समोरील समस्या संपेनात; काय आहे प्रकरण?
12
म्हणे, व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतारमध्ये काश्मिरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हणाला...
13
भाजीपाल्यावरून वाद, तलवार चालवली,आगही लावली; मंदिरासमोरच दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी
14
अमेरिकेचा दुटप्पीपणा; पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कीला अत्याधुनिक क्षेपणास्त्रे पुरवणार...
15
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
16
पत्नी पतीच्या आत्महत्येचा लाईव्ह व्हिडीओ बनवत राहिली, मृत्यूचे धक्कादायक कारण आले समोर
17
शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात, निफ्टी २५,००० च्या लेव्हलवर; Bharti Airtel, IndusInd, Infosys टॉप लूझर्स
18
शेअर बाजारात यंदाची पहिलीच बंपर लॉटरी लागणार; या IPO ला मिळतोय दणकून GMP
19
चिदंबरम थरूर यांच्या मार्गावर! आधी युद्धविरामवर मोदी सरकारला पाठिंबा; आता इंडिया आघाडीबाबत सवाल उपस्थित
20
बिहार दौऱ्यादरम्यान आयनॉक्स मॉलमध्ये पोहचले राहुल गांधी, पाहिला 'हा' चित्रपट, म्हणाले...

कोरोना काळात बालविवाहांचे प्रमाण वाढले ; विद्यार्थींनींच्या गळ्यात मंगळसुत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात कोरोनाच्या काळात अनेक मुलींचे कमी वयातच किंवा शिक्षण अर्धवट सोडून विवाह केले जात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाच्या काळात अनेक मुलींचे कमी वयातच किंवा शिक्षण अर्धवट सोडून विवाह केले जात आहेत. मुली दहावी किंवा बारावी झाल्या की लगेच त्यांच्या विवाहाची तयारी केली जाते. त्यामुळे अनेक मुलींच्या गळ्यात शाळेनंतर लगेचच मंगळसुत्र पडत आहे. ग्रामीण भागात हे प्रमाण जास्त आहे. चोपडा, यावल तालुक्यातील आदिवासी भागात तर याबाबतचे कसलेच नियम पाळले जात नाहीत.

जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाने गेल्या काही काळात सहा तक्रारींच्या दृष्टीने बालविवाह रोखले आहेत. मात्र ज्या तक्रारी आलेल्या नाहीत. ते बालविवाह कुणीही रोखु शकले नाहीत. कोरोनाच्या काळात शाळा बंद झाल्या. मुलींचे शिक्षण थांबले. त्यांना घर सांभाळावे लागते. किंवा बाहेर कामाला जावे लागते. त्यात अनेक कुटुंबांमध्ये कमावणारी व्यक्ती एकच असते. त्या आर्थिक विवंचनेतून देखील अल्प उत्पन्न गटात मुलींचे लग्न लवकर केले जात आहे. प्रशासनाने पोलीस पाटील, आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांच्या मदतीने मोहीम राबवुन हे विवाह रोखण्याची गरज आहे.

पटसंख्या कमी झालेल्या मुली गेल्या कुठे?

जिल्ह्यात बहुतांश शाळा गेल्या वर्षभरापासून बंद आहे. मधला काही काळ आठवी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या होत्या. आता पुन्हा या वर्गांच्या शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र त्यातही मुलींची शाळेतील उपस्थिती कमी आहे. त्यामुळे या मुली गेल्या कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

विद्यार्थींनींच्या गळ्यात मंगळसुत्र

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांनी सांगितले की, जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण फारसे नाही, असे असले तरी प्रशासनाकडे आलेल्या तक्रारीव्यतिरिक्त अनेक बालविवाह होत असल्याचे निरीक्षण लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनी नोंदविले आहे. शाळा बंद झाल्यानंतर बहुतांश मुलींची लग्ने लावुन दिली गेली आहेत.

आर्थिक विवंचनेचे मोठे कारण

कोरोनाच्या काळात अनेकांचे रोजगार गेले. त्यामुळे भविष्यात मुलीचे लग्न कसे होईल, याचा विचार करून अनेकांनी लवकरात लवकर वयात न आलेल्या मुलींचे लग्न लावुन दिले आहे. ग्रामीण भागापेक्षा आदिवासी भागात याचे प्रमाण जास्त आहे.

कोट -

जिल्ह्यात बालविवाहाचे फारसे प्रमाण वाढलेले नाही. मागील काळात सहा विवाह रोखण्यात आले होते. कोरोना काळात देखील अशा घटना फारशा समोर आलेल्या नाहीत. - विजयसिंग परदेशी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी

----

रोजगार नसल्याने तसेच कमवणारी व्यक्ती एकच असल्याने मुलींची लग्न लवकर करून दिले जात आहे. त्यातच शाळा बंद असल्याने बालविवाहांचे प्रमाण वाढले. ज्यांच्या तक्रारी आल्या ते कमी असले तरी तक्रारी न येता विवाह झालेले असंख्य आहेत. या मुलींना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यासाठी प्रशासन आणि सर्वांनी सामुदायिक प्रयत्न करावे - प्रतिभा शिंदे, समाजसेविका

जिल्ह्यातील एकुण शाळा ७०८

शाळा सुरू- ३०६

एकुण विद्यार्थी १,६८,६७०

एकुण हजेरी - २५०००