शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
3
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
4
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
5
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
6
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
7
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
8
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
9
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
10
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
11
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
12
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
13
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
14
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
15
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
16
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
17
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
18
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
19
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
20
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!

पक्षात येणाऱ्यांची निष्ठा तपासा - एकनाथराव खडसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 23:01 IST

राजकारणाचे गणित दिवसागणिक बदलते

जळगाव : पक्षात प्रवेश देताना तो पक्षाशी निष्ठावान राहील की नाही याची चाचपणी करा व मगच कोणालाही पक्षात प्रवेश द्या. कारण लोकसभा निवडणुकीवेळी तब्बल १६ पोलिंग एजंट हे राष्ट्रवादी काँग्रेसचे निघाले होते. त्यामुळे त्यामुळे पक्षात येणाऱ्यांची निष्ठा तपासली पाहिजे, असा सल्ला एकनाथराव खडसे यांनी जळगाव लोकसभा मतदारसंघातील शक्तीकेंद्र प्रमुखांच्या संघटनात्मक बैठकीत मार्गदर्शन करताना दिला.या वेळी त्यांनी सुरुवातीलाच ‘शक्ती’ या नावाप्रमाणेच केंद्र प्रमुखात जोश असायला हवा, असा सांगत कार्यकर्ता, शक्तीकेंद्र प्रमुख हेच विजयात महत्त्वाचे असल्याचे खडसे म्हणाले. जे शक्तीप्रमुख निष्प्रभ आहे, त्यांच्यामुळे पक्षाचे नुकसान होते, अशांना काढून टाका, दुसºयांना संधी द्या, असाही सल्ला त्यांनी दिला.राजकारणाचे गणित दिवसागणिक बदलतेलोकसभेत यश मिळाले असले तरी दिवसागणिक राजकारणाचे गणित बदलते. याचे अनेक उदाहरणे आहे, असे सांगत खडसे यांनी स्वत:चे उदाहरण दिले. त्यात ते म्हणाले की, अगोदरच्या निवडणुकीत मला ३५ हजाराचे मताधिक्य होते. नंतर ते १० हजारावर आले. त्या वेळी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र आले होते. त्यामुळे गाफील राहू नका, असेही खडसे यांनी नमूद केले.विधानसभेचे गणित वेगळे, गाफिल राहू नकापंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वावर जनतेला विश्वास असल्याने लोकसभा निवडणुकीत पक्षाला घवघवीत यश मिळाले. त्या वेळी मोदी एके मोदी हाच मुद्दा होता.परंतु, आता ही राज्याची निवडणूक आहे. राज्यातील जनतेच्या प्रश्नांना यात प्राधान्य असणार आहे. त्यामुळे गाफील राहून चालणार नाही. लोकसभेच्या निवडणुकीत आपण कोठे कमी पडलो, याची चाचपणी करा. ज्याने आपल्याला मत दिले नाही, त्याचे मत पारड्यात पाडण्यासाठी काय करता येईल ते बघा, असा सल्ला एकनाथराव खडसे यांनी या वेळी दिला.जिल्ह्यात एका दिवसात ताकद वाढली नाहीजळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला आहे. ही ताकद एका दिवसात तयार झाली नाही तर ही पूर्वीच्या नेत्यांची मेहनत व अनेक वर्षांची निष्ठा याचे फलित असल्याचे खडसे यांनी नमूद केले.‘देश मे सिर्फ ३७० चल रहा है....’खडसे यांनी आपल्या भाषणात सध्या पक्षासाठी एकदम सकारात्मक वातावरण असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी काश्मीरातील ३७० कलम हटविल्याने सर्वत्र उत्साह आहे. ही हिंमत केवळ या दोघांनीच दाखविली आहे. त्यामुळे ‘देश मे सिर्फ ३७० चल रहा....’ असा उल्लेख खडसे यांनी आपल्या भाषणात केला. या सोबतच गिरीश महाजन, विजयराव पुराणिक यांनीही ३७० कलम हटविल्यानंतरच्या उत्साहाचा उल्लेख केला.दोन्ही नेत्यांचे विरोधाभास निर्माण करणारे वक्तव्यएककीडे एकनाथराव खडसे हे प्रवेश देताना निष्ठा तपासा असे सांगत असताना दुसरीकडे गिरीश महाजन यांनी तळागळातील प्रत्येक कार्यकर्त्याला पक्षात घ्या, हा कामाचा नाही, तो कामाचा नाही, असे म्हणून नका, असे सांगितले. त्यामुळे दोन्ही नेत्यांचे विरोधाभास निर्माण करणारे वक्तव्य कार्यकर्त्यांना संभ्रमात टाकणारे आहे.

टॅग्स :Politicsराजकारण