शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पक्षात येणाऱ्यांची निष्ठा तपासा - एकनाथराव खडसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 23:01 IST

राजकारणाचे गणित दिवसागणिक बदलते

जळगाव : पक्षात प्रवेश देताना तो पक्षाशी निष्ठावान राहील की नाही याची चाचपणी करा व मगच कोणालाही पक्षात प्रवेश द्या. कारण लोकसभा निवडणुकीवेळी तब्बल १६ पोलिंग एजंट हे राष्ट्रवादी काँग्रेसचे निघाले होते. त्यामुळे त्यामुळे पक्षात येणाऱ्यांची निष्ठा तपासली पाहिजे, असा सल्ला एकनाथराव खडसे यांनी जळगाव लोकसभा मतदारसंघातील शक्तीकेंद्र प्रमुखांच्या संघटनात्मक बैठकीत मार्गदर्शन करताना दिला.या वेळी त्यांनी सुरुवातीलाच ‘शक्ती’ या नावाप्रमाणेच केंद्र प्रमुखात जोश असायला हवा, असा सांगत कार्यकर्ता, शक्तीकेंद्र प्रमुख हेच विजयात महत्त्वाचे असल्याचे खडसे म्हणाले. जे शक्तीप्रमुख निष्प्रभ आहे, त्यांच्यामुळे पक्षाचे नुकसान होते, अशांना काढून टाका, दुसºयांना संधी द्या, असाही सल्ला त्यांनी दिला.राजकारणाचे गणित दिवसागणिक बदलतेलोकसभेत यश मिळाले असले तरी दिवसागणिक राजकारणाचे गणित बदलते. याचे अनेक उदाहरणे आहे, असे सांगत खडसे यांनी स्वत:चे उदाहरण दिले. त्यात ते म्हणाले की, अगोदरच्या निवडणुकीत मला ३५ हजाराचे मताधिक्य होते. नंतर ते १० हजारावर आले. त्या वेळी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र आले होते. त्यामुळे गाफील राहू नका, असेही खडसे यांनी नमूद केले.विधानसभेचे गणित वेगळे, गाफिल राहू नकापंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वावर जनतेला विश्वास असल्याने लोकसभा निवडणुकीत पक्षाला घवघवीत यश मिळाले. त्या वेळी मोदी एके मोदी हाच मुद्दा होता.परंतु, आता ही राज्याची निवडणूक आहे. राज्यातील जनतेच्या प्रश्नांना यात प्राधान्य असणार आहे. त्यामुळे गाफील राहून चालणार नाही. लोकसभेच्या निवडणुकीत आपण कोठे कमी पडलो, याची चाचपणी करा. ज्याने आपल्याला मत दिले नाही, त्याचे मत पारड्यात पाडण्यासाठी काय करता येईल ते बघा, असा सल्ला एकनाथराव खडसे यांनी या वेळी दिला.जिल्ह्यात एका दिवसात ताकद वाढली नाहीजळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला आहे. ही ताकद एका दिवसात तयार झाली नाही तर ही पूर्वीच्या नेत्यांची मेहनत व अनेक वर्षांची निष्ठा याचे फलित असल्याचे खडसे यांनी नमूद केले.‘देश मे सिर्फ ३७० चल रहा है....’खडसे यांनी आपल्या भाषणात सध्या पक्षासाठी एकदम सकारात्मक वातावरण असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी काश्मीरातील ३७० कलम हटविल्याने सर्वत्र उत्साह आहे. ही हिंमत केवळ या दोघांनीच दाखविली आहे. त्यामुळे ‘देश मे सिर्फ ३७० चल रहा....’ असा उल्लेख खडसे यांनी आपल्या भाषणात केला. या सोबतच गिरीश महाजन, विजयराव पुराणिक यांनीही ३७० कलम हटविल्यानंतरच्या उत्साहाचा उल्लेख केला.दोन्ही नेत्यांचे विरोधाभास निर्माण करणारे वक्तव्यएककीडे एकनाथराव खडसे हे प्रवेश देताना निष्ठा तपासा असे सांगत असताना दुसरीकडे गिरीश महाजन यांनी तळागळातील प्रत्येक कार्यकर्त्याला पक्षात घ्या, हा कामाचा नाही, तो कामाचा नाही, असे म्हणून नका, असे सांगितले. त्यामुळे दोन्ही नेत्यांचे विरोधाभास निर्माण करणारे वक्तव्य कार्यकर्त्यांना संभ्रमात टाकणारे आहे.

टॅग्स :Politicsराजकारण