शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

रावेर तालुक्यातील केळी उत्पादक ७५ शेतकऱ्यांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:19 IST

रावेर जि. जळगाव : सन २०१९-२० मध्ये झालेल्या वादळाचे पंचनामे करूनही विमा कंपनीने ७० शेतकऱ्यांना अद्यापही ...

रावेर जि. जळगाव : सन २०१९-२० मध्ये झालेल्या वादळाचे पंचनामे करूनही विमा कंपनीने ७० शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई रक्कम त्यांच्या खात्यात जमा केलेली नाही. त्यामुळे ही एक प्रकारे फसवणूक असल्याने न्याय मिळण्याची मागणी या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

तांदलवाडी परिसरातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी २०१९-२० मध्ये ॲग्रीकल्चर इन्शुरन्स या विमा कंपनीकडून विमा काढला होता. तसेच विमा कंपनीच्या प्रतिनिधीने या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी वेगळी रक्कम घेतल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र केळी पिकाचे नुकसान होऊनदेखील रक्कम न मिळाल्याने आमची फसवणूक झाल्याचे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

यासंदर्भात विमा कंपनी प्रतिनिधी कुंदन बारी व मयूर पाटील यांच्याशी या संपर्क साधला असता त्यांनी टाळाटाळ केल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. विमा कंपनी आणि ज्यांनी पंचनामे केले ते कंपनी प्रतिनिधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.

भूषण चौधरी, कन्हैया महाजन, अमोल महाजन, निखिल महाजन, किरण पाटील, श्रीकांत चौधरी (सर्व रा. तांदलवाडी, ता. रावेर) यांच्यासह ७५ शेतकऱ्यांनी निवासी जिल्हाधिकारी, रावेर कृषी अधिकारी, तहसीलदार रावेर यांना निवेदने देण्यात आले. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही फॅक्स करून आपल्या व्यथा मांडल्या आहेत. कृषिमंत्री दादा भुसे पाटील, राज्यमंत्री बच्चू कडू, गुलाबराव पाटील, आदींनाही निवेदन दिले आहे.