शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

रावेर तालुक्यातील केळी उत्पादक ७५ शेतकऱ्यांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:19 IST

रावेर जि. जळगाव : सन २०१९-२० मध्ये झालेल्या वादळाचे पंचनामे करूनही विमा कंपनीने ७० शेतकऱ्यांना अद्यापही ...

रावेर जि. जळगाव : सन २०१९-२० मध्ये झालेल्या वादळाचे पंचनामे करूनही विमा कंपनीने ७० शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई रक्कम त्यांच्या खात्यात जमा केलेली नाही. त्यामुळे ही एक प्रकारे फसवणूक असल्याने न्याय मिळण्याची मागणी या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

तांदलवाडी परिसरातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी २०१९-२० मध्ये ॲग्रीकल्चर इन्शुरन्स या विमा कंपनीकडून विमा काढला होता. तसेच विमा कंपनीच्या प्रतिनिधीने या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी वेगळी रक्कम घेतल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र केळी पिकाचे नुकसान होऊनदेखील रक्कम न मिळाल्याने आमची फसवणूक झाल्याचे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

यासंदर्भात विमा कंपनी प्रतिनिधी कुंदन बारी व मयूर पाटील यांच्याशी या संपर्क साधला असता त्यांनी टाळाटाळ केल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. विमा कंपनी आणि ज्यांनी पंचनामे केले ते कंपनी प्रतिनिधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.

भूषण चौधरी, कन्हैया महाजन, अमोल महाजन, निखिल महाजन, किरण पाटील, श्रीकांत चौधरी (सर्व रा. तांदलवाडी, ता. रावेर) यांच्यासह ७५ शेतकऱ्यांनी निवासी जिल्हाधिकारी, रावेर कृषी अधिकारी, तहसीलदार रावेर यांना निवेदने देण्यात आले. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही फॅक्स करून आपल्या व्यथा मांडल्या आहेत. कृषिमंत्री दादा भुसे पाटील, राज्यमंत्री बच्चू कडू, गुलाबराव पाटील, आदींनाही निवेदन दिले आहे.