शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

रावेर तालुक्यातील केळी उत्पादक ७५ शेतकऱ्यांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:19 IST

रावेर जि. जळगाव : सन २०१९-२० मध्ये झालेल्या वादळाचे पंचनामे करूनही विमा कंपनीने ७० शेतकऱ्यांना अद्यापही ...

रावेर जि. जळगाव : सन २०१९-२० मध्ये झालेल्या वादळाचे पंचनामे करूनही विमा कंपनीने ७० शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई रक्कम त्यांच्या खात्यात जमा केलेली नाही. त्यामुळे ही एक प्रकारे फसवणूक असल्याने न्याय मिळण्याची मागणी या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

तांदलवाडी परिसरातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी २०१९-२० मध्ये ॲग्रीकल्चर इन्शुरन्स या विमा कंपनीकडून विमा काढला होता. तसेच विमा कंपनीच्या प्रतिनिधीने या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी वेगळी रक्कम घेतल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र केळी पिकाचे नुकसान होऊनदेखील रक्कम न मिळाल्याने आमची फसवणूक झाल्याचे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

यासंदर्भात विमा कंपनी प्रतिनिधी कुंदन बारी व मयूर पाटील यांच्याशी या संपर्क साधला असता त्यांनी टाळाटाळ केल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. विमा कंपनी आणि ज्यांनी पंचनामे केले ते कंपनी प्रतिनिधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.

भूषण चौधरी, कन्हैया महाजन, अमोल महाजन, निखिल महाजन, किरण पाटील, श्रीकांत चौधरी (सर्व रा. तांदलवाडी, ता. रावेर) यांच्यासह ७५ शेतकऱ्यांनी निवासी जिल्हाधिकारी, रावेर कृषी अधिकारी, तहसीलदार रावेर यांना निवेदने देण्यात आले. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही फॅक्स करून आपल्या व्यथा मांडल्या आहेत. कृषिमंत्री दादा भुसे पाटील, राज्यमंत्री बच्चू कडू, गुलाबराव पाटील, आदींनाही निवेदन दिले आहे.