शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

प्रमोद रायसोनीसह १४ संचालकांवर दोषारोप निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:12 IST

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटी अर्थात बीएचआरमधील घोटाळा प्रकरणात संस्थेचे प्रमोद भाईचंद रायसोनी (५५,रा.बळीराम पेठ, जळगाव) ...

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटी अर्थात बीएचआरमधील घोटाळा प्रकरणात संस्थेचे प्रमोद भाईचंद रायसोनी (५५,रा.बळीराम पेठ, जळगाव) यांच्यासह १४ संचालकांवर मंगळवारी न्यायालयाने अपहार, फसवणूक, कट रचणे, पुरावा नष्ट करणे आदी दोषारोप ठेवले. रायसोनी याच्यासह सर्वच संचालकांनी आम्हाला गुन्हा कबुल नसल्याचे सांगत आरोप फेटाळले. सर्व संशयितांना कारागृहातून व्हिडीओकॉन्फरन्सद्वारे केले हजर करण्यात आले. पहिले सदर्थ सत्र न्यायाधीश आर.एन.हिवसे यांच्या न्यायालयात मंगळवारपासून राज्यातील सात गुन्ह्यांच्या खटल्याच्या सुनावणीला सुरुवात झाली. दोषारोप ठेवल्यानंतर आता पुढील कामकाज १५ डिसेंबर रोजी होणार आहे.

जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी थोडक्यात गुन्ह्याची पार्श्वभूमी, संचालकांवर असलेले आरोप न्यायालयास सांगितले. यावेळी आरोपींचे वकील अकिल इस्माईल हे देखील हजर होते.

या सात खटल्यांमध्ये ठेवले दोषारोप

बीएचआरमध्ये ठेवीदारांची फसवणूक, अपहार प्रकरणात राज्यात ८१ पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. त्यात सात ठिकाणी दाखल झालेल्या गुन्ह्यांचे एकत्रित खटले न्या.हिवसे यांच्या न्यायालयात चालविले जात आहेत. त्यात सेलु (जि.परभणी), नालन पेठ (परभणी), खोलापुरी गेट (अमरावती), राजापेठ (अमरावती), सांगली, उदगीर शहर (लातूर) व खडकी (पुणे) यांचा समावेश आहे. या पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्हे सुनावणीला सुरुवात झाली आहे. यापूर्वी रामानंद नगरसह पाच ठिकाणच्या खटल्यांमध्ये संचालक मंडळावर दोषारोप ठेवण्यात आले आहे. ८१ पैकी आतापर्यंत १२ ठिकाणच्या गुन्ह्यात दोषारोप केले आहे.

हे आहे अटकेतील संचालक

बीएचआरमध्ये झालेल्या अपहार व फसवणूक प्रकरणात शिवराम चावदस चौधरी (८०,रा.शिव कॉलनी) यांच्या फिर्यादीवरुन राज्यातील पहिला गुन्हा रामानंद नगर पोलीस ठाण्यात कलम ४०९,४२०,१२० ब व महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम सन १९९१ चे कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. यात संस्थेचे संस्थापक प्रमोद भाईचंद रायसोनी (६०,रा.बळीराम पेठ, जळगाव), दिलीप कांतीलाल चोरडीया (५६), सुरजमल भबुतमल जैन (५५), दादा रामचंद्र पाटील (७१), भागवत संपत माळी (६८), राजाराम काशिनाथ कोळी (५२), भगवान हिरामण वाघ (६५), यशवंत ओंकार जिरी (६५)शेख रमजान शेख अब्दुल नबी मन्यार (६०),सुकलाल शहादू माळी (५०)ललिताबाई उर्फ लता राजू सोनवणे (४४) सर्व रा.तळेगाव, ता.जामनेर, मोतीलाल ओंकार जीरी (५५,रा.शेळगाव, ता.जामनेर), डॉ.हितेंद्र यशवंत महाजन (५७,रा.बेंडाळे नगर, प्रेम नगर, जळगाव) व इंद्रकुमार आत्माराम ललवाणी (४५,रा.महाबळ, जळगाव) यांना ३ फेब्रुवारी २०१५ रोजी अटक केली आहे. सर्व आरोपी जळगाव कारागृहात आहेत.