शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

दररोज नियमांमध्ये बदल, व्यापारी वर्ग त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधादरम्यान अत्यावश्यक सेवेची दुकाने सकाळी सात ते अकरा या वेळेत सुरू ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधादरम्यान अत्यावश्यक सेवेची दुकाने सकाळी सात ते अकरा या वेळेत सुरू असली तरी गेल्या पाच ते सहा दिवसांपासून महापालिका व पोलीस कर्मचाऱ्यांकडून सकाळी दहा वाजतापासून दुकाने बंद करण्यासाठी आग्रह केला जात असल्याचा आरोप व्यापारी वर्गाकडून केला जात आहे. इतकेच नव्हे, कधी महापालिका तर कधी पोलीस कर्मचारी दररोज वेगवेगळे नियम आणून व्यापाऱ्यांना वेठीस धरत असल्याचा आरोपदेखील केला जात आहे. इतकेच नव्हे, दुकानांसमोर ग्राहक नसले; मात्र इतर नागरिक उभे असले तरीही दुकानदारांना दंड केला जात असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. याविषयी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी व्यापारी वर्गातून केली जात आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढल्याने लागू करण्यात आलेल्या निर्बंधादरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. यातही अत्यावश्यक सेवेची दुकाने सकाळी सात ते अकरा याच वेळेत सुरू ठेवावी, असे बंधन करण्यात आले. त्यात आता गेल्या सोमवारपासून जळगावात कडक नियम लागू करण्यात आले असून, महापालिका व पोलीस कर्मचारी अधिकच वेठीस धरत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

सकाळी दहापासून दुकाने बंदचा आग्रह

अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी अकरा वाजतापर्यंत सुरू ठेवण्याची मुभा आहे; मात्र यामध्ये गेल्या चार ते पाच दिवसांपासून महापालिका तर कधी पोलीस कर्मचारी येऊन सकाळी दहा वाजतापासून दुकाने बंद करण्यासाठी व्यापाऱ्यांच्या मागे लागत आहे. मुळात सकाळी सात वाजता दुकान उघडले तरी त्यावेळी ग्राहकी नसते. साडेनऊ वाजतापासून ग्राहक येण्यास अधिक प्रमाण वाढते. त्यात एकाच वेळी जास्त ग्राहक आल्याने साडेनऊ ते ११ या काळात एवढी ग्राहकी करणे व्यापाऱ्यांनादेखील अवघड होत आहे. यात अकरा वाजता एखाद्या ग्राहकाचे अर्धे सामान वाहनात टाकायचे राहिल्यास तेदेखील ग्राहकाला नेऊ दिले जात नाही, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

गर्दीमुळे दुकानदारांना दंड

अकरा वाजतानंतर दुकान बंद केले व समोर येणारे-जाणारे नागरिक असले तरी त्यामुळे संबंधित दुकानदाराला जाब विचारला जाऊन एक तर दुकान सील करणे किंवा दंड करण्यात येत आहे. यामध्ये पुढील त्रास टाळण्यासाठी अनेक व्यापारी दंडाची रक्कम देऊन मोकळे होतात; मात्र हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने समोर उभे राहणाऱ्या नागरिकांना व्यापाऱ्यांनी कसे थांबवावे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

यामध्ये महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आले असता ते वेगळे नियम सांगतात व पोलीस कर्मचारी आले असता ते वेगळे नियम सांगतात‌. यामुळे काय करावे, असा प्रश्न व्यापाऱ्यांकडे उभा राहिला आहे.

माल उतरविण्यास अडथळे

जळगावात देशाच्या विविध भागातून वेगवेगळ्या प्रकारचा माल येत असतो. सध्या सकाळी अकरा वाजतानंतर दोन तास माल उतरण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये एखादे वाहन आले व दोन तासात त्यातील माल उतरविताना थोडाफार माल उतरावयाचा राहिला तरी तो उतरविण्यास मज्जाव केला जातो. त्यामुळे बाहेरगावाहून आलेले वाहन उर्वरित माल घेऊन दुसऱ्या दिवसापर्यंत कसे थांबू शकेल, असा प्रश्न दाणाबाजार असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारिया यांनी उपस्थित केला आहे. शासन, प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन व्यापारीवर्ग करीत असून, त्यांनाही सहकार्य करावे, अशी मागणी पगारिया यांनी केली आहे.