शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

दररोज नियमांमध्ये बदल, व्यापारी वर्ग त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधादरम्यान अत्यावश्यक सेवेची दुकाने सकाळी सात ते अकरा या वेळेत सुरू ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधादरम्यान अत्यावश्यक सेवेची दुकाने सकाळी सात ते अकरा या वेळेत सुरू असली तरी गेल्या पाच ते सहा दिवसांपासून महापालिका व पोलीस कर्मचाऱ्यांकडून सकाळी दहा वाजतापासून दुकाने बंद करण्यासाठी आग्रह केला जात असल्याचा आरोप व्यापारी वर्गाकडून केला जात आहे. इतकेच नव्हे, कधी महापालिका तर कधी पोलीस कर्मचारी दररोज वेगवेगळे नियम आणून व्यापाऱ्यांना वेठीस धरत असल्याचा आरोपदेखील केला जात आहे. इतकेच नव्हे, दुकानांसमोर ग्राहक नसले; मात्र इतर नागरिक उभे असले तरीही दुकानदारांना दंड केला जात असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. याविषयी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी व्यापारी वर्गातून केली जात आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढल्याने लागू करण्यात आलेल्या निर्बंधादरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. यातही अत्यावश्यक सेवेची दुकाने सकाळी सात ते अकरा याच वेळेत सुरू ठेवावी, असे बंधन करण्यात आले. त्यात आता गेल्या सोमवारपासून जळगावात कडक नियम लागू करण्यात आले असून, महापालिका व पोलीस कर्मचारी अधिकच वेठीस धरत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

सकाळी दहापासून दुकाने बंदचा आग्रह

अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी अकरा वाजतापर्यंत सुरू ठेवण्याची मुभा आहे; मात्र यामध्ये गेल्या चार ते पाच दिवसांपासून महापालिका तर कधी पोलीस कर्मचारी येऊन सकाळी दहा वाजतापासून दुकाने बंद करण्यासाठी व्यापाऱ्यांच्या मागे लागत आहे. मुळात सकाळी सात वाजता दुकान उघडले तरी त्यावेळी ग्राहकी नसते. साडेनऊ वाजतापासून ग्राहक येण्यास अधिक प्रमाण वाढते. त्यात एकाच वेळी जास्त ग्राहक आल्याने साडेनऊ ते ११ या काळात एवढी ग्राहकी करणे व्यापाऱ्यांनादेखील अवघड होत आहे. यात अकरा वाजता एखाद्या ग्राहकाचे अर्धे सामान वाहनात टाकायचे राहिल्यास तेदेखील ग्राहकाला नेऊ दिले जात नाही, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

गर्दीमुळे दुकानदारांना दंड

अकरा वाजतानंतर दुकान बंद केले व समोर येणारे-जाणारे नागरिक असले तरी त्यामुळे संबंधित दुकानदाराला जाब विचारला जाऊन एक तर दुकान सील करणे किंवा दंड करण्यात येत आहे. यामध्ये पुढील त्रास टाळण्यासाठी अनेक व्यापारी दंडाची रक्कम देऊन मोकळे होतात; मात्र हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने समोर उभे राहणाऱ्या नागरिकांना व्यापाऱ्यांनी कसे थांबवावे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

यामध्ये महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आले असता ते वेगळे नियम सांगतात व पोलीस कर्मचारी आले असता ते वेगळे नियम सांगतात‌. यामुळे काय करावे, असा प्रश्न व्यापाऱ्यांकडे उभा राहिला आहे.

माल उतरविण्यास अडथळे

जळगावात देशाच्या विविध भागातून वेगवेगळ्या प्रकारचा माल येत असतो. सध्या सकाळी अकरा वाजतानंतर दोन तास माल उतरण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये एखादे वाहन आले व दोन तासात त्यातील माल उतरविताना थोडाफार माल उतरावयाचा राहिला तरी तो उतरविण्यास मज्जाव केला जातो. त्यामुळे बाहेरगावाहून आलेले वाहन उर्वरित माल घेऊन दुसऱ्या दिवसापर्यंत कसे थांबू शकेल, असा प्रश्न दाणाबाजार असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारिया यांनी उपस्थित केला आहे. शासन, प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन व्यापारीवर्ग करीत असून, त्यांनाही सहकार्य करावे, अशी मागणी पगारिया यांनी केली आहे.