शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

आव्हाणे ग्रा.पं. निवडणुकीत पॅनलची जुळवाजुळव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्यास काही दिवस शिल्लक असतानादेखील आव्हाणे येथे कोणत्याही अधिकृत पॅनलची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्यास काही दिवस शिल्लक असतानादेखील आव्हाणे येथे कोणत्याही अधिकृत पॅनलची घोषणा झालेली नाही. यंदाच्या निवडणुकीत आव्हाण्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता असून, तिन्ही पॅनलकडून उमेदवारांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. एकीकडे पॅनलप्रमुख उमेदवारांची जुळवाजुळव सुरू असताना दुसरीकडे उमेदवार कागदपत्रांच्या जुळवा-जुळव मध्ये व्यस्त आहेत. अर्ज दाखल होण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच निवडणुकीच्या धामधुमीला वेग येणार आहे.

आव्हाणे ग्रामपंचायतमध्ये शिवसेनेचे विलास पाटील (कीटू नाना), पंचायत समिती सदस्य ॲड. हर्षल चौधरी, माजी सरपंच विजय दत्तात्रय

पाटील, भगवान नामदेव पाटील, राष्ट्रवादीचे तालुका संघटक ईश्वर पाटील यांचे उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, यापैकी कोणत्याही नेत्यांचे

पॅनल पूर्णपणे तयार झालेले नाही. दरम्यान, भाऊबंदकीच्या बैठका सुरू झाल्या आहेत. गावातील प्रगतिशील शेतकरी रवींद्र योगराज चौधरी

यांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ग्रामस्थांची बैठक बोलाविली होती. मात्र, उमेदवारांबाबत एकवाक्यता न झाल्याने बिनविरोध

होण्याची शक्यता आता मावळल्याने आता सर्व उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब आजमावणार आहेत. आव्हाणे येथे एकूण

१३ जागांसाठी निवडणूक होणार आहे.

फुपनगरीत युवक एकत्र

फुपनगरीमध्ये यंदा बदलाचे वारे वाहत असून, जितेंद्र अत्रे यांनी पॅनलची तयारी केली असून, बैठकांचे सत्रदेखील सुरू झाले आहे. तर गणेश जाधव यांनी यंदा युवकवर्गाला संधी देण्याची मागणी करत, युवकांना एकत्रित करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. अत्रे यांनीही युवकांचा भरणा करून पॅनल तयार करण्याची घोषणा केली आहे. तर ज्येष्ठ नेत्यांनीही यंदाच्या निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे.

कठोऱ्यात बिनविरोधसाठी प्रयत्न

कठोरा ग्रामपंचायतीत गेल्या तीन पंचवार्षिपासून बिनविरोधची परंपरा सुरू असून, यंदाही युवकवर्गाकडून बिनविरोधसाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी प्राथमिक बैठकदेखील घेण्यात आली असून, त्यात सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती डॉ. सत्त्वशील जाधव यांनी दिली.