शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

कोरोनासह शहरातील समस्या सोडवण्याचे महापौरांना समोर आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:16 IST

महापालिकेत ऐतिहासिक बहुमताने नंतर देखील अवघ्या अडीच वर्षात भाजपने सत्ता गमावली आहे. शहरवासीयांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता सत्ताधाऱ्यांना करता न ...

महापालिकेत ऐतिहासिक बहुमताने नंतर देखील अवघ्या अडीच वर्षात भाजपने सत्ता गमावली आहे. शहरवासीयांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता सत्ताधाऱ्यांना करता न आल्याने भाजपामध्ये अंतर्गत बंडाळी उठून अवघ्या अडीच वर्षातच भाजपला सत्ता गमवावी लागली आहे. त्यात बंडखोर नगरसेवकांच्या जोरावर कमी जागा असतानाही शिवसेनेचा महापौर महापालिकेत झाला आहे. नवीन महापौर जयश्री महाजन यांच्या समोर शहरातील समस्यांचा मोठा डोंगर उभा आहे. त्यात कोरोनाचे संकट देखील प्रचंड वेगाने वाढत आहे. अशा परिस्थितीत शहरातील समस्या सोबत कोरोनाचे संकट देखील महापौरांना पार पाडावे लागणार आहे. राज्यात शिवसेनेची सत्ता असल्याने शहरातील समस्या सोडविण्यासाठी लागणारा निधी जळगाव महापालिकेला मिळण्याची शक्यता आहे. तसेच मागील शासनाने महापालिकेला दिलेल्या १०० कोटींचा निधीवर विद्यमान शासनाने लावलेली स्थगिती देखील उठू शकते. ही बाब नूतन महापौरांसाठी जमेची ठरू शकते. मात्र शहरातील वाढते कोरोना चे संकट थोपविण्यासाठी महापौरांना महापालिका प्रशासनाने सोबत चांगले काम करण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. माजी महापौर भारती सोनवणे यांनी कोरोना काळात मनपाच्या कोरोना सेंटर वर जाऊन स्वतः कटाक्षाने लक्ष घालून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. यासह प्रशासनासोबत राहून कोरोना काळात शहरातील नियमित फवारणी, कोरोना सेंटरमधील रुग्णांना मिळणार्या जेवणाची गुणवत्ता कायम ठेवणे यासह महापालिका वैद्यकीय विभागाद्वारे होणारा कामांचा नियमित आढावा घेऊन कोरोना काळात चांगले काम केले होते. नूतन महापौर जयश्री महाजन या उच्चशिक्षित असून, त्यांच्याकडे विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्या रूपाने चांगला अनुभव देखील आहे. अशा परिस्थितीत कोरोनाचे संकट थोपविण्यासाठी राज्य शासनाची मदत घेऊन मनपा प्रशासनाला एक प्रकारे बळकटी देण्याचे काम महापौरांकडून होऊ शकते. महापालिकेतील वैद्यकीय विभागात मोठ्या प्रमाणात रिक्त जागा असून या जागा शासनाच्या मदतीने जर भरण्यात आल्या तर वैद्यकिय विभागाच्या कर्मचाऱ्यांवर पडणारा अतिरिक्त भार कमी होऊन रुग्णांना चांगल्या सुविधा मिळू शकतात. यासह शहरातील नागरिकांना अनेक वर्षांपासून रस्त्यांच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नूतन महापौर जयश्री महाजन यांच्याकडे शहरातील समस्या सोडविण्यासाठी जादूची कांडी नसली तरी राज्यात शिवसेनेचे असलेले सरकार महापालिकेतील सत्ताधारी साठी एक प्रकारे जादूच्या कांडी सारखेच आहे. मागच्या सत्ताधाऱ्यांना राज्यात सत्ता असताना देखील त्या सत्तेचा वापर महापालिकेसाठी किंवा शहरातील विकासासाठी चांगल्या प्रकारे करता आला नव्हता. आता राज्यात शिवसेनेची सत्ता असल्याने त्यातच नगर विकास मंत्री पद हे शिवसेनेकडेच असल्याने शहरातील अनेक प्रश्‍नांसाठी आवश्यक निधी या विभागाकडून प्राप्त होऊ शकतो. शहरात अनेक समस्या असल्या तरी सर्वात प्राधान्याने रस्त्याची समस्या सोडवण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने होत आहे. मात्र, नूतन महापौरांना देखील हे आव्हान पेलण्यासाठी नागरिकांनी काही दिवस वेळ देण्याची गरज आहे. मात्र नागरिकांचा संयम सुटेल एवढा वेळ देखील न घेता सत्ताधाऱ्यांनी शहरातील रस्ता प्रश्न प्रधानाने सोडवण्याची गरज आहे.