शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

चाळीसगाव तालुक्यात शेतक-यांचा एल्गार, वाहतूक रोखली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 15:04 IST

आडगाव येथे सोमवारी सकाळी आठ वाजता शेतक-यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन केले.

ठळक मुद्देआडगावला सरकारविरोधी घोषणांनी दणाणला परिसरएक तास वाहतूक रोखून धरलीचाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर वाहनांच्या रांगा

चाळीसगाव: 'अरे कोण म्हणतो देणार नाही...घेतल्याशिवाय राहणार नाही, दुधाला योग्य भाव मिळालाच पाहिजे, सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे...' अशी जोरदार घोषणाबाजी करीत आडगाव येथे सोमवारी सकाळी आठ वाजता शेतक-यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन केले. तालुकाध्यक्ष आर.के.पाटील यांनी नेतृत्व करतांना एक तास वाहतूक रोखून धरली. यामुळे चाळीसगाव - मालेगाव रस्त्यावर वाहनांची लांब रांग लागली होती.दुधाचे दर पडल्याने शेतकरी आणि पशुपालक कमालीचे धास्तावले आहे. खर्च अधिक आणि उत्पादन कमी अशी दुध व्यवसायाची स्थिती असल्याने सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरले. जोरदार घोषणाबाजी करुन आंदोलक शेतक-यांनी परिसर दणाणून टाकला.सद्यस्थितीत शेतांमध्ये खरीप हंगामाची लगबग सुरु असतांनाही सकाळी सात वाजेपासून शेतक-यांनी आडगाव बसस्थानकावर गर्दी केली होती. तीनशेहून अधिक शेतकरी, पशुपालकांनी आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी मागण्या मान्य झाल्याशिवाय शांत बसणार नसल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

सरकार शेतक-यांच्या मागण्यांबाबत पुर्णपणे उदासिन आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. शेतक-यांना न्याय मिळवून देण्याचा आम्ही निर्धार केला आहे.- आर.के.पाटीलतालुकाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :ChalisgaonचाळीसगावFarmer strikeशेतकरी संप