शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

चाळीसगाव पालिकेच्या मुख्याधिका-यांची बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 17:12 IST

चाळीसगाव पालिकेत पुन्हा सहा महिन्यातच ‘प्रभारीराज’ आले आहे. 

ठळक मुद्देसहा महिन्यातच पुन्हा ‘प्रभारीराज’दीड वर्षानंतर मिळाले होते पूर्णवेळ मुख्याधिकारी

चाळीसगाव : येथील पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांची अहमदनगर येथे महानगरपालिकेच्या आयुक्तपदी पदोन्नत्तीवर बदली झाली असून, ते शुक्रवारी रुजूही झाले आहे. पालिकेत पुन्हा सहा महिन्यातच ‘प्रभारीराज’ आले आहे. अनिकेत मानोरकर यांची पंढरपूर पालिकेत बदली झाल्यानंतर चाळीसगाव पालिकेला दीड वर्ष पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळाले नाही. कधी भडगाव पालिकेचे मुख्याधिकारी विकास नव्हाळे, तर कधी चाळीसगावचे तहसीलदार अमोल मोरे यांनी प्रभारी म्हणून पालिकेचा गाडा हाकला.सहा महिन्यापूर्वी १३ अॉगस्ट रोजी शंकर गोरे हे मुख्याधिकारी म्हणून चाळीसगाव पालिकेत रुजू झाले होते. त्यांनी यापूर्वीही येथे सेवा बजावलेली होती. सद्य:स्थितीत शहरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहे. पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्याने पालिकेच्या दैनंदिन कामकाजावरही परिणाम होतो. प्रशासकीयदृष्ट्यादेखील अनेक कामांना ब्रेक लागतो. सहाच महिन्यात मुख्याधिका-यांना बदलीचा खो मिळाल्याने पालिकेच्या वर्तुळात नाराजीचा सूर उमटला आहे. सद्य:स्थितीत पालिकेच्या राजकीय वर्तुळात नाट्यमय घडामोडी घडत असून विरोधक आणि सत्ताधा-यांमध्ये शह-काटशह सुरू होत आहे. शहरातील सुविधांबाबत नाराजीची तक्रार असतानाच मुख्याधिका-यांचीही बदली झाली आहे. भडगाव पालिकेचे मुख्याधिकारी विकास नव्हाळे यांच्याकडे प्रभारी पदभार सोपविण्यात आला आहे. विद्यमान सदस्यांच्या सत्ताकाळाचे काही महिने शिल्लक राहिले आहेत. वर्षअखेरीस पालिकेची निवडणूकही असल्याने विकासाची कामे त्वरीत मार्गी लागावीत, अशी शहरवासियांची अपेक्षा आहे. लवकरच शासनस्तरावर पूर्णवेळ मुख्याधिकारी द्यावे. याची मागणी करणार असल्याचे नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांनी 'लोकमत'ला सांगितले.

टॅग्स :GovernmentसरकारChalisgaonचाळीसगाव