शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना नोबेल मिळण्यासाठी मोर्चेंबांधणी? काँग्रेसने केली मारिया मचाडो यांच्याशी तुलना
2
"बोलायचं स्वदेशीचं आणि घडी वापरायची विदेशी"; CM योगी आदित्यनाथांनी खासदार रवि किशन यांना भरसभेत सुनावले
3
E20 पेट्रोलबाबतचा संभ्रम संपला! बाजारात कोणत्या पेट्रोलमध्ये इथेनॉल आहे आणि कोणत्या नाही...
4
झाड नाही, 'काळजाचा तुकडा' तोडला! २० वर्षे जपलेल्या वृक्षासाठी आजींचा आक्रोश; व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल
5
राज ठाकरेंचा वरदहस्त दूर अन् वैभव खेडेकरांचे ग्रहच फिरले? भाजप प्रवेश रखडला, आता दुसरीकडे...
6
“हंबरडा मोर्चापूर्वी उद्धव ठाकरेंनी एकदा आरशात पाहावे”; CM देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका
7
अनिल अंबानी ग्रुपच्या CFO ला अटक; बनावट बँक हमी प्रकरणात ED ची मोठी कारवाई
8
ग्रामीण भारताचा विकास करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथि; त्यांच्या कार्याचा आढावा!
9
Premanand Maharaj: प्रेमानंद महाराजांची प्रकृती स्थिर, पण दुसऱ्यांची किडनी घेण्यासाठी नकार; कारण... 
10
मित्रासोबत बाहेर फिरायला मेडिकलची विद्यार्थीनी गेली, लैंगिक अत्याचाराचा आरोप; रुग्णालयात उपचार सुरू
11
तिसऱ्या भिडूमुळे आघाडीत धुसफुस? काँग्रेसचा ‘त्या’ मतांवर डोळा, तर उद्धवसेनेची मोठी पंचाईत!
12
तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकीच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना No Entry; विरोधक आक्रमक, प्रियांका गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
मंत्री बाबासाहेब पाटलांनी केलेल्या विधानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; थेट फटकारले, म्हणाले,..
14
अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेश नाही; परराष्ट्र मंत्रालयाची पहिली प्रतिक्रिया
15
"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या
16
चेन्नई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली; इंडिगो विमानाच्या कॉकपीटच्या काचेला तडा, सर्व ७६ प्रवासी सुखरूप
17
नोबेल पुरस्कार हुकला, ट्रम्प यांनी चीनवर राग काढला? चिनी वस्तूंवर १०० टक्के अतिरिक्त टॅरिफ
18
“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?
19
IND vs WI : अंपायरनं विकेट किपरची चूक झाकली? RUN OUT झाल्यामुळं यशस्वी जैस्वालचं द्विशतक हुकलं (VIDEO)
20
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”

चाळीसगाव बाजार समिती 'लॉक ओपन'नंतरच धान्य खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 19:12 IST

चाळीसगाव बाजार समितीमधील खरेदीदार संघटनेनेदेखील 'लॉक ओपन'नंतरच माल खरेदी करण्याची भूमिका घेतली आहे.

ठळक मुद्देचाळीसगावात आडत व्यापाऱ्यांची भूमिका१४ नंतर निर्णय घेणारशेतकऱ्यांनी विक्रीसाठी माल न आणण्याची सूचना

जिजाबराव वाघचाळीसगाव, जि.जळगाव : अवकाळी मार सहन करूनही हाती लागलेल्या रब्बी हंगामाचे पाऊल बाजार समित्यांच्या प्रवेशव्दारावर थांबणार आहे. कारण स्पष्ट 'लॉकडाऊन...' चाळीसगावबाजार समितीमधील खरेदीदार संघटनेनेदेखील 'लॉक ओपन'नंतरच माल खरेदी करण्याची भूमिका घेतली आहे. बाजार समिती व्यवस्थापनाने विक्रीसाठी शेतमाल न आणण्याची सूचना केली असली तरी दोघीही बाजूने 'कोंडी' शेतकºयांचीच होणार आहे.'कोरोना' संसर्गजन्य टाळण्यासाठी देशात २१ दिवसांची संचारबंदी आहे. यामुळे बाजार समितीही लॉकडाऊन असल्याने यावर्षी उत्पादीत झालेला रब्बी हंगामातील शेतमाल विक्रीसाठी कुठे घेऊन जायचा, असा कळीचा प्रश्न शेतकºयांसमोर उभा ठाकला आहे.यावर्षी पावसाचे वेळापत्रक चांगले राहिल्याने सर्वत्र 'पाणी आबादानी' आहे. यामुळे यावर्षी रब्बी हंगाम चांगलाच बहरला. सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यमान झाल्याने गहू, हरभरा, ज्वारी, कांदा आदी पिकांचे जोमदार उत्पन्न हाती येत आहे. शेतकºयांना लॉकडाऊनच्या काळात हाती पैसा येण्यासाठी शेतमाल विकणे गरजेचे आहे. एकीकडे हाती आलेले उत्पन्न आणि दुसरीकडे बाजार समितीचे दरवाजे बंद. अशा विचित्र कात्रीत शेतकरी अडकला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी लोकप्रतिनिधींनी ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे. अन्यथा शेतकºयांमध्ये उद्रेकाची स्थिती उदभवणाचे चित्र आहे.आडत व्यापारी म्हणतात, आमची भूमिका शेतकरी हिताची३१ रोजी चाळीसगाव बाजार समिती खरेदीदार संघटनेचे अध्यक्ष बन्सीलाल छोरिया यांच्यासह ५० आडत व्यापा-यांची सभापती सरदारसिंग राजपूत, उपसभापती किशोर पाटील यांच्यासह संचालक मंडळाच्या उपस्थित बैठक पार पडली.बाजार समिती व्यवस्थापनाने आडत व्यापाºयांना शेतमाल खरेदी करण्याची विनंती केली. मात्र कोरोना आजाराची पार्श्वभूमी, शेतकºयांची होणारी गर्दी, पेमेंट करण्यासाठी पैशांची उपलब्धता, सोशल डिस्टींगचा उद्भवणारा प्रश्न आदी कारणे पुढे करीत १४ नंतरच शेतमाल खरेदी करण्याचा निर्णय घेतला. आमची भूमिका शेतकरी हिताची आहे, असे खरेदीदार संघटनेचे अध्यक्ष बन्सीलाल छोरिया यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.शेतकºयांची कोंडीखरीप हंगामात अति पावसाचा फटका बसलेल्या शेतकºयांची दारोमदार रब्बी हंगामावर आहे. यावर्षी रब्बीचे उत्पन्न चांगले आले असून शेतमालाची विक्री करुन शेतकºयांना तोंडावर आलेल्या खरीपासाठी कंबर कसायची आहे. मात्र लॉकडाऊनमुळे त्याची पुरती कोंडी झाली आहे. बाजार समितीत सध्या धान्य लिलाव बंद आहे. गत आठवड्यात कांद्याचे लिलावही थांबविण्यात आले आहे. भाजीपाल्याचे लिलाव मात्र नियमितपणे सुरू आहे. 

टॅग्स :MarketबाजारChalisgaonचाळीसगाव