शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

चाळीसगाव बाजार समिती 'लॉक ओपन'नंतरच धान्य खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 19:12 IST

चाळीसगाव बाजार समितीमधील खरेदीदार संघटनेनेदेखील 'लॉक ओपन'नंतरच माल खरेदी करण्याची भूमिका घेतली आहे.

ठळक मुद्देचाळीसगावात आडत व्यापाऱ्यांची भूमिका१४ नंतर निर्णय घेणारशेतकऱ्यांनी विक्रीसाठी माल न आणण्याची सूचना

जिजाबराव वाघचाळीसगाव, जि.जळगाव : अवकाळी मार सहन करूनही हाती लागलेल्या रब्बी हंगामाचे पाऊल बाजार समित्यांच्या प्रवेशव्दारावर थांबणार आहे. कारण स्पष्ट 'लॉकडाऊन...' चाळीसगावबाजार समितीमधील खरेदीदार संघटनेनेदेखील 'लॉक ओपन'नंतरच माल खरेदी करण्याची भूमिका घेतली आहे. बाजार समिती व्यवस्थापनाने विक्रीसाठी शेतमाल न आणण्याची सूचना केली असली तरी दोघीही बाजूने 'कोंडी' शेतकºयांचीच होणार आहे.'कोरोना' संसर्गजन्य टाळण्यासाठी देशात २१ दिवसांची संचारबंदी आहे. यामुळे बाजार समितीही लॉकडाऊन असल्याने यावर्षी उत्पादीत झालेला रब्बी हंगामातील शेतमाल विक्रीसाठी कुठे घेऊन जायचा, असा कळीचा प्रश्न शेतकºयांसमोर उभा ठाकला आहे.यावर्षी पावसाचे वेळापत्रक चांगले राहिल्याने सर्वत्र 'पाणी आबादानी' आहे. यामुळे यावर्षी रब्बी हंगाम चांगलाच बहरला. सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यमान झाल्याने गहू, हरभरा, ज्वारी, कांदा आदी पिकांचे जोमदार उत्पन्न हाती येत आहे. शेतकºयांना लॉकडाऊनच्या काळात हाती पैसा येण्यासाठी शेतमाल विकणे गरजेचे आहे. एकीकडे हाती आलेले उत्पन्न आणि दुसरीकडे बाजार समितीचे दरवाजे बंद. अशा विचित्र कात्रीत शेतकरी अडकला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी लोकप्रतिनिधींनी ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे. अन्यथा शेतकºयांमध्ये उद्रेकाची स्थिती उदभवणाचे चित्र आहे.आडत व्यापारी म्हणतात, आमची भूमिका शेतकरी हिताची३१ रोजी चाळीसगाव बाजार समिती खरेदीदार संघटनेचे अध्यक्ष बन्सीलाल छोरिया यांच्यासह ५० आडत व्यापा-यांची सभापती सरदारसिंग राजपूत, उपसभापती किशोर पाटील यांच्यासह संचालक मंडळाच्या उपस्थित बैठक पार पडली.बाजार समिती व्यवस्थापनाने आडत व्यापाºयांना शेतमाल खरेदी करण्याची विनंती केली. मात्र कोरोना आजाराची पार्श्वभूमी, शेतकºयांची होणारी गर्दी, पेमेंट करण्यासाठी पैशांची उपलब्धता, सोशल डिस्टींगचा उद्भवणारा प्रश्न आदी कारणे पुढे करीत १४ नंतरच शेतमाल खरेदी करण्याचा निर्णय घेतला. आमची भूमिका शेतकरी हिताची आहे, असे खरेदीदार संघटनेचे अध्यक्ष बन्सीलाल छोरिया यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.शेतकºयांची कोंडीखरीप हंगामात अति पावसाचा फटका बसलेल्या शेतकºयांची दारोमदार रब्बी हंगामावर आहे. यावर्षी रब्बीचे उत्पन्न चांगले आले असून शेतमालाची विक्री करुन शेतकºयांना तोंडावर आलेल्या खरीपासाठी कंबर कसायची आहे. मात्र लॉकडाऊनमुळे त्याची पुरती कोंडी झाली आहे. बाजार समितीत सध्या धान्य लिलाव बंद आहे. गत आठवड्यात कांद्याचे लिलावही थांबविण्यात आले आहे. भाजीपाल्याचे लिलाव मात्र नियमितपणे सुरू आहे. 

टॅग्स :MarketबाजारChalisgaonचाळीसगाव