शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
3
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
4
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
5
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
6
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
7
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
8
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
9
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
10
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
11
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
12
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
13
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
14
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
15
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
16
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
17
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
18
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
19
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
20
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”

अकरावी प्रवेशासाठी सीईटीचा विचार; अनेक प्रश्न अनुत्तरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:14 IST

- स्टार : ७१३ लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना विषाणूचा कहर वाढल्यामुळे यंदा दहावीची परीक्षा रद्द करण्‍यात आली. ...

- स्टार : ७१३

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोना विषाणूचा कहर वाढल्यामुळे यंदा दहावीची परीक्षा रद्द करण्‍यात आली. पण, विद्यार्थ्यांना अकरावीत कोणत्या आधारावर प्रवेश द्यावा याबाबत वरिष्ठ स्तरावर मंथन सुरू आहे. अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्याचा विचार शासनस्तरावर सुरू असला तरी परीक्षा नेमकी कशी व केव्हा घ्यायची याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही.

कोरोनामुळे गतवर्षी पहिली ते नववीच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. यावेळीदेखील पहिली ते नववीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सीबीएसई बोर्डासह राज्याच्या शालेय शिक्षण विभागानेदेखील दहावीच्या परीक्षा रद्द केल्या. दहावीच्या परीक्षेसाठी जळगाव जिल्ह्यातून सुमारे ५८ हजारांवर विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. जळगाव जिल्ह्यात अकरावीच्या ४९ हजार ८० जागा असल्याने प्रवेशासाठी ओढाताण होत नसली तरी शहरातील काही नामांकित महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी पालकांची धडपड असते. अकरावीच्या प्रवेशासाठी दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित १०० गुणांची ऑफलाईन सीईटी परीक्षा घेण्याविषयी शिक्षण विभाग चाचपणी करीत आहे. यातील गुणावरच अकरावीचे प्रवेश निश्चित होण्याची शक्यता आहे. मात्र, मोठ्या संख्येने असणाऱ्या विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षा कोरोनाकाळात कशी घ्यायची याचे आव्हान शिक्षण विभागासमोर राहील.

---------

तंत्रनिकेतन, आयटीआय प्रवेशाचे काय?

दहावी परीक्षेत मिळालेल्या गुणांवरच तंत्रनिकेतन, आयटीआयमध्ये प्रवेश मिळतो. अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटीचा पर्याय निवडण्यात येणार असला तरी तंत्रनिकेतत, आयटीआय प्रवेशासाठी कोणते निकष लावले जाणार? याबाबत पालकांसह विद्यार्थीदेखील संभ्रमात आहेत.

००००००००००००

ऑफलाईन झाली तर कोरोनाचे काय?

कोरोनाकाळात ऑफलाईन सीईटी परीक्षा घेतली तर कोरोना संसर्ग रोखावा कसा? असा प्रश्न प्रशासनासमोर राहील. कोरोना संसर्ग रोखण्यासाठीच दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या, त्यात पुन्हा ऑफलाईन परीक्षा घेतली तर कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

-------

ऑनलाईन झाली तर ग्रामीण भागाचे काय?

कोरोनामुळे ऑनलाईन सीईटी घेण्याचा विचार केला तर याचा फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसण्याची सर्वाधिक शक्यता आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी नेटवर्क अभाव, तसेच अँड्रॉईड मोबाईल अनेक विद्यार्थ्यांकडे नाहीत. यातून परीक्षेला मुकावे लागण्याची भीतीही आहे़

----------

अंतर्गत मूल्यमापन कसे होणार?

दहावीतील विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन बहुतांश शाळांत झाले नाही. ऑनलाईन शिक्षण सुरू असले असले तरी विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन कसे करायचे. याबाबत अद्याप मार्गदर्शक सूचना आलेल्या नाहीत. मार्गदर्शक सूचना मिळाल्यानंतरच विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे शक्य होणार आहे, असे प्राध्यापकांचे म्हणणे आहे.

--------=-=

काय म्हणतात प्राचार्य....

अकरावीचे प्रवेश हे गुणवत्तेनुसार केले जाते. कारण, व्होकेशनल अभ्यासक्रमांना खूप स्पर्धा असते. त्यामुळे मेरीट आवश्यक असते. मेरीट कोणत्या आधारे लावावे हे शासनाने ठरवून द्यावे. आधी आपण दहावीच्या गुणांवर प्रवेश देत होतो. त्यामुळे लवकरात लवकर काही तरी निर्णय जाहीर करावा.

- राजेंद्र वाघुळदे, प्राचार्य, धनाजी नाना महाविद्यालय

-----------------

दहावीनंतर पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता, सक्षम अधिकारी म्हणून तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. अभय वाघ यांचे अद्यापपर्यंत कुठल्याही सूचना प्राप्त झालेल्या नाही. मार्गदर्शन सूचना प्राप्त होताच, त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल. त्यांनी ११ मे रोजी प्रवेशाकरिता, कुठल्या-कुठल्या कागदपत्रांची आवश्यक आहे, त्याची सूची पाठविलेली आहे. विद्यार्थ्यांनी ही प्रमाणपत्र काढण्याकरिता तयारीत राहावे. जशा सूचना प्राप्त होतील, तशा पालक विद्यार्थ्यांना कळविल्या जातील. स्कूल कनेक्ट उपक्रमातंर्गत साडेसहा हजार विद्यार्थ्यांना डाटा शासकीय तंत्रनिकेतनकडे आहे.

- डॉ. महेंद्र इंगळे, प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, जळगाव

-------------------

अकरावी प्रवेशाचे नियोजन हे शासनाच्या धोरणानुसार अवलंबून आहे. मार्गदर्शन सूचना प्राप्त झाल्यानंतर प्रवेशासंबंधी पुढील कार्यवाही होईल. अजूनही प्रवेशाबाबत संभ्रमावस्था आहे. मागील वर्षी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने सुरळीत प्रवेश प्रक्रिया पार पडली. विद्यार्थिनींच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यात आली. यंदा शासनाचा जो निर्णय होईल, त्याप्रमाणे आमची तयारी असेल.

- गौरी राणे, प्राचार्य, अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय

-------------------------------------------

- अकरावी प्रवेशासाठी जिल्ह्यातील जागा : ४९,०८०

- एकूण महाविद्यालय - २१८