शहरं
Join us  
Trending Stories
1
संरक्षण करारानंतर सौदी अरेबियाची पाकिस्तानला आणखी एक मोठी भेट; ३० लाख लोकांना रोजगार मिळणार
2
‘कोस्टल’वर थेट १४० चा हायस्पीड: ...तर मग गुन्हाच होईल दाखल; वाहतूक पोलिसांकडून दिवसाला ५०० ई-चालानची कारवाई
3
१५३ रुपयांवर लिस्ट झाला हा स्वस्त IPO; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना ९०%चा फायदा, झाले मालामाल
4
भारतीय नौदलाची ताकद वाढणार! आज अँड्रोथ युद्धनौका मिळणार, जाणून काय आहे खास?
5
"मी माझ्या भावाचा मृतदेह स्वतःच्या हाताने बाहेर काढला", प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती
6
हरमनप्रीत कौरचे तेवर! नजरेने धाक दाखवणारी पाकिस्तानी खेळाडू खाली मान घालून पळाली (VIDEO)
7
Mumbai Accident: दादरमध्ये अपघात, 'बेस्ट बस'ला टेम्पो ट्रॅव्हलरची धडक; एक ठार, चार जखमी
8
'या' माशांना वाचवण्यासाठी बांगलादेशनं उतरवलं सैन्य दल; बंगालच्या खाडीत पाठवल्या १७ युद्धनौका
9
Indian shot dead: "मित्रा, तू बरा आहेस ना?" मदतीसाठी आलेल्या भारतीय व्यक्तीचीच गोळी घालून हत्या
10
VIRAL : 'सर डोकं दुखतंय...', कर्मचारी आजारी तरीही मॅनेजर सुट्टी देईना! संतापलेल्या तरुणानं काय केलं बघाच  
11
FD करुन तुम्ही कधीही श्रीमंत होणार नाही? CA ने दिला इशारा, म्हणाले खऱ्या कमाईसाठी गुंतवणूक धोरण बदला
12
Video - अरे बापरे! ऑर्डर केला iPhone 16; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत अजब भानगड
13
Tata Capital IPO: प्रतीक्षा संपली! तुमच्या खिशात आहेत का १४,९९६ रुपये? तर बनू शकता टाटांच्या कंपनीचे प्रॉफिट पार्टनर
14
इवलीशी मुंबई झाली महाकाय ! त्या त्या भागानुसार प्रति स्क्वेअर फुटाचा दर काय... पहाल तर...
15
"प्यार मे सौदेबाजी...", अरबाज खान दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर मलायका अरोराची क्रिप्टिक पोस्ट
16
सोनम वांगचुक यांच्या अटकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, पत्नीने दाखल केली याचिका
17
Kantara Chapter 1: साऊथने पुन्हा एकदा करून दाखवलं! फक्त ४ दिवसांत 'कांतारा'ने कमावले ३०० कोटी
18
पतीच्या मृत्यूनंतर पुन्हा जोडीदाराची इच्छा पडली महागात; मॅट्रिमोनियल साइटवरून शिक्षिकेला कोट्यवधींचा गंडा!
19
Post Office Scheme: दर महिन्याला होईल ₹६१,००० ची कमाई; जबरदस्त आहे ही सरकारी स्कीम, कोट्यधीशही बनवेल
20
Jaipur Hospital Fire: जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक

केंद्रीय समितीने केला हिरमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 21:22 IST

सहा पैकी एकाच ठिकाणी भेट : ठरल्याप्रमाणे पाहणी झालीच नाही

एरंडोल/ पारोळा: अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दोन सदस्यीय केंद्रीय समिती २२ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत धुळे जिल्ह्यातील पाहणी आटोपून जळगाव जिल्ह्यात दाखल होणार होणार होती मात्र मालेगाव येथेच विलंब लागल्याने समितीचा दौरा लांबला. पारोळा येथे पोहचता पोहचता सायंकाळ झाल्याने मोंढाळे येथील पाहणी नावापुरता अंधारातच झाली तर इतर सर्व ठिकाणी पाहणी न करताच अधिकारी रवाना झाले. यामुळे प्रतीक्षा करीत असलेल्या शेतकऱ्यांचा हिरमोड झाला.पारोळा तालुक्यातील मोंढाळे, करंजी बुद्रुक, सावखेडे मराठे तसेच एरंडोल तालुक्यातील भालगाव, एरंडोल, पिंपळकोठा या गावांना समिती शुक्रवारी भेट देणार होती. पैकी मोंढाळे येथेच एका शेतात पाहणी केली.या केंद्रीय पथकात केंद्रीय अर्थमंत्रालयातील खर्च विभागाचे सल्लागार दिनानाथ व जयपुर येथील कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे संचालक डॉ. सुभाष चंद्रा, नाश्किा विभागीय आयुक्त राजाराम माने, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, जिल्हा कृषी अधिकारी संभाजी ठाकुर, उपविभागीय कृषी अधिकारी दादाराव जाधवर, प्रांतअधिकारी विनय गोसावी, तहसिलदार अनिल गवांदे, प्रभारी कृषी अधिकारी सुरेश खेताडे व कृषीसहाय्यक व मंडळ कृषी अधिकारी उपस्थित होते.यावेळी मोंढाळे प्र अ.येथील शेतकरी भाऊलाल विठ्ठल पाटील यांचे कपाशी शेताताचे नुकसान न पाहता केंद्रीय समितीने हिरमोड केला.केंद्रीय पथक हे आपल्या आठ ते दहा गाड्यांचा ताफा घेऊन आले. सुटाबुटात आलेले अधिकारी यांनी नावाला एकच प्रातिनिधीक स्वरुपात म्हणणे ऐकुन महामार्गावर काढता पाय घेतला. अनेक शेतऱ्यांना आपल्या व्यथा मांडायच्या होत्या परंतु या पथकाने लक्ष दिले नाही.यावेळी मोंढाळे प्र अ सरपंच महारु पाटोळे , नंदलाल पाटील, सुधाकर पाटील, बळीराम पाटील, सतीश पाटील, किशोर पाटील, नंदू पाटील, विठ्ठल पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.दरम्यान भेटच न दिल्याने करंजी येथील नुकसान ग्रस्त शेतकरी रविंद्र रामचंद्र पाटील,गोरख माळी व सावरखेड मराठ येथील शेतकरी राधेश्याम तोताराम नारायणी यांच्या पदरी घोर निराशा पडली.एरंडोल तालुक्यातील भालगाव फाट्यावर तसेच एरंडोल नजीक अंजनी धरण फाट्यावर व पिंपळकोठा या तीन ठिकाणी केंद्रीय पथक पिकांच्या नुकसानीची पाहणी करणार होते परंतु पथक या तिन्ही ठिकाणी न थांबता सरळ राष्ट्रीय महामार्गाने निघून गेल्यामुळे शेतकºयांची मोठी निराशा झाली. संध्याकाळी सव्वासात वाजता पथकाच्या वाहनांचा ताफा भालगाव फाट्यावरुन सरळ निघून गेला त्यावेळी त्याठिकाणी तहसीलदार अर्चना खेतमाळीस, पोलीस निरीक्षक अरुण हजारे, तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी, माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर, मंडळ कृषी अधिकारी एस.टी. पाटील व शेळगावकर, महसूल मंडळ अधिकारी एस. आर. महाले कृषी सहाय्यक महाजन, तलाठी ठोंबरे व सुमारे ५० शेतकरी केंद्रीय पथकाची प्रतीक्षा करीत थांबले होते. तसेच भालगाव येथील घनश्याम बिर्ला यांच्या कपाशीच्या शेतावर पथक येणार असल्यामुळे तेथेही अनेक शेतकरी थांबले होते. पथक आमच्याशी संवाद साधेल व आमची व्यथा ऐकून घेईल या आशेवर थांबलेले शेतकरी निराश झाले. एरंडोल येथे गोदावरीबाई परदेशी यांच्या शेतात ज्वारी पिकाचे व पिंपळकोठा येथे नलिनी रघुवंशी यांच्या शेतात ज्वारी पिकाची केंद्रीय पथक पाहणी करणार होते.पाहणी न करता अहवला देणार कसा ?मोंढाळे येथे सायंकाळी साडेसहा वाजता पथक आले. यावेळी पथकाने शेतात प्रत्यक्ष पाहणी न करता रस्त्यावरच शेतकºयांची विचारपूस करीत अवघ्या तीन तीन -चार मिनिटांची धावती भेट घेतल्याने केंद्रीय पथक नेमका तालुक्याचा बाबतीत कसा अहवाल देणार हा याबाबत शेतकरी चिंतातुर अवस्थेत दिसुन आले.