शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

जळगाव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती पाहून केंद्रीय समितीही हळहळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 16:22 IST

विश्लेषण

-सुशील देवकर

जळगाव: दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय समितीने दुष्काळी भागात जाऊन पाहणी करताना स्थानिक शेतकºयांशीही मनमोकळा संवाद साधला. दुष्काळी परिस्थिती पाहून समिती सदस्यही हळहळले. दुष्काळी परिस्थिती गंभीर असल्याबाबत त्यांचे मत दिसून आल्याने मदतीबाबत समिती सदस्य सकारात्मक दिसून आल्याचे समजते.बुधवारी सायंकाळी औरंगाबादहून जळगाव जिल्ह्यात आगमन करतानाच समितीने जामनेर तालुक्यातील पिंपळगाव गोलाईत या गावाला भेट देऊन दुष्काळाची पाहणी केली. तर गुरूवारी सकाळी पारोळा तालुक्यातील  दगडी गावाकडे रवाना झाली. तेथे कपाशीच्या शेताची पाहणी केली. तसेच शेतकºयांशी संवाद साधला. चाºयाअभावी गुरेढोरे विकावी लागल्याचे शेतकºयांनी या समितीला सांगितले. तर अमळनेर तालुक्यातील जुनोने गावाला भेट दिली. तेथे शेतातील तुरीच्या शेंगा फोडून पाहिल्या. त्यावेळी त्यात कीड आढळून आले. समितीच्या सदस्यांनी शेतकºयांना पाणी कुठून आणता? किती दिवस चारा पुरेल? कर्ज कुठून घेतले? आदी बाबत विचारणा केली. अमळनेर तालुक्याची परिस्थिती जिल्ह्यात सर्वात बिकट आहे. त्यामुळे ही परिस्थिती पाहून समितीचे सदस्यही हेलावले. परिस्थिती गंभीर असल्याबाबतच्या मताशी सहमत असल्याचे दिसून आले. त्यामुळे केंद्राकडे मदतीसाठी समितीकडून शिफारस होण्याची शक्यता वाढली आहे.  दुष्काळ पाहणीसाठी यापूर्वी राज्यातील दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी व त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दौरा केला होता. मात्र हा दौरा खूपच धावता व सोयीचा होता. महामार्गालगतच्या गावांमध्येच जाऊन पाहणीची औपचारीकता उरकण्यात आली होती. त्याउलट अनेक जिल्ह्यांची जबाबदारी असलेल्या केंद्रीय समितीनेही धावता दौराच केला. मात्र समितीने जेथे भेट दिली, तेथे आवश्यक त्या मुद्यांची योग्यरितीने चौकशी केली व पाहणी केली. जिल्हा प्रशासनानेही या समितीसाठी योग्यरितीने गावांची निवड केली. गुरूवारी दुपारी ही समिती धुळ्याहून नाशिककडे समिती रवाना झाली. मात्र जिल्ह्यात परिस्थिती गंभीर असल्याचे चित्र निश्चितपणे ही समिती केंद्राकडे मांडेल, अशी आशा जनतेला निर्माण झाली आहे.