शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

जळगाव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती पाहून केंद्रीय समितीही हळहळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 16:22 IST

विश्लेषण

-सुशील देवकर

जळगाव: दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय समितीने दुष्काळी भागात जाऊन पाहणी करताना स्थानिक शेतकºयांशीही मनमोकळा संवाद साधला. दुष्काळी परिस्थिती पाहून समिती सदस्यही हळहळले. दुष्काळी परिस्थिती गंभीर असल्याबाबत त्यांचे मत दिसून आल्याने मदतीबाबत समिती सदस्य सकारात्मक दिसून आल्याचे समजते.बुधवारी सायंकाळी औरंगाबादहून जळगाव जिल्ह्यात आगमन करतानाच समितीने जामनेर तालुक्यातील पिंपळगाव गोलाईत या गावाला भेट देऊन दुष्काळाची पाहणी केली. तर गुरूवारी सकाळी पारोळा तालुक्यातील  दगडी गावाकडे रवाना झाली. तेथे कपाशीच्या शेताची पाहणी केली. तसेच शेतकºयांशी संवाद साधला. चाºयाअभावी गुरेढोरे विकावी लागल्याचे शेतकºयांनी या समितीला सांगितले. तर अमळनेर तालुक्यातील जुनोने गावाला भेट दिली. तेथे शेतातील तुरीच्या शेंगा फोडून पाहिल्या. त्यावेळी त्यात कीड आढळून आले. समितीच्या सदस्यांनी शेतकºयांना पाणी कुठून आणता? किती दिवस चारा पुरेल? कर्ज कुठून घेतले? आदी बाबत विचारणा केली. अमळनेर तालुक्याची परिस्थिती जिल्ह्यात सर्वात बिकट आहे. त्यामुळे ही परिस्थिती पाहून समितीचे सदस्यही हेलावले. परिस्थिती गंभीर असल्याबाबतच्या मताशी सहमत असल्याचे दिसून आले. त्यामुळे केंद्राकडे मदतीसाठी समितीकडून शिफारस होण्याची शक्यता वाढली आहे.  दुष्काळ पाहणीसाठी यापूर्वी राज्यातील दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी व त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दौरा केला होता. मात्र हा दौरा खूपच धावता व सोयीचा होता. महामार्गालगतच्या गावांमध्येच जाऊन पाहणीची औपचारीकता उरकण्यात आली होती. त्याउलट अनेक जिल्ह्यांची जबाबदारी असलेल्या केंद्रीय समितीनेही धावता दौराच केला. मात्र समितीने जेथे भेट दिली, तेथे आवश्यक त्या मुद्यांची योग्यरितीने चौकशी केली व पाहणी केली. जिल्हा प्रशासनानेही या समितीसाठी योग्यरितीने गावांची निवड केली. गुरूवारी दुपारी ही समिती धुळ्याहून नाशिककडे समिती रवाना झाली. मात्र जिल्ह्यात परिस्थिती गंभीर असल्याचे चित्र निश्चितपणे ही समिती केंद्राकडे मांडेल, अशी आशा जनतेला निर्माण झाली आहे.