शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

बैलगाडीतील कापूस खरेदीस सीसीआयचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : चार दिवसांंनंतर सीसीआयकडून कापूस खरेदीस सोमवारपासून पुन्हा सुरुवात करण्यात आली. मात्र, गेल्या आठवड्यात अचानक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : चार दिवसांंनंतर सीसीआयकडून कापूस खरेदीस सोमवारपासून पुन्हा सुरुवात करण्यात आली. मात्र, गेल्या आठवड्यात अचानक ग्रेड कमी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सोमवारी केवळ ट्रॅक्टर व ट्रकमधून माल घेण्याचा नवीन तुघलकी निर्णय सीसीआय व जिनिंगमालकांनी घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर चांगलाच गोंधळ केला. तसेच शेतकऱ्यांना रांगेतच थांबवून खोटे उतारे देऊन व्यापाऱ्यांच्याच मालाला जिनिंगमालक व सीसीआयने नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्यांकडून प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.

सोमवारी आव्हाणे परिसरातील सीसीआयच्या दोन्ही केंद्रांवर सीसीआयने घेतलेल्या तुघलकी निर्णयाविरोधात शेतकऱ्यांचा संतापाचा बांध फुटलेला पाहायला मिळाला. सीसीआयने बंद केलेली खरेदी चार दिवसांनंतर पुन्हा सुरू करण्यात आली. मात्र, केवळ ट्रक व ट्रॅक्टरमध्ये माल आणलेल्याच शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्याचा निर्णय जिनिंगमालकांनी घेतला. त्याच वेळेस बैलगाडीतून माल आणलेले १०० हून अधिक शेतकरी रांगेत उभे होते.

व्यापाऱ्यांना पायघड्या, शेतकरी मात्र रांगेत

गेल्या काही वर्षांपासून सीसीआयच्या केंद्रांवरदेखील व्यापारी व दलाल सक्रिय झाले आहेत. यामुळे दिवाळीपूर्वी गावागावांत जाऊन कमी भावात माल खरेदी करणारे व्यापारीच आता सीसीआयच्या केंद्रावर मालविक्री करताना दिसून येत आहेत. व्यापाऱ्यांनी ४७०० ते ४९०० भावात घेतलेला माल सीसीआयच्या केंद्रावर ५५९० ते ५६१५ या दरात विक्री केला जात आहे. विशेष म्हणजे व्यापाऱ्यांच्या गाड्यांना कोणतीही अडवणूक न करता थेट प्रवेश मिळत आहे. तर, शेतकऱ्यांना विक्रीसाठी एकदोन दिवस रांगेत थांबावे लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा संताप वाढत असून, सीसीआयच्या केंद्रावर दररोज गोंधळ होत आहे.

ग्रेडरच गैरहजर

सीसीआयच्या केंद्रांवर मुख्य ग्रेडरच गैरहजर राहत आहे. त्याठिकाणी नियुक्त केलेले ठरावीक कर्मचारीच ग्रेड लावत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. ग्रेडर कार्यालयातून बाहेरदेखील येत नसून, स्थानिक कर्मचारी मनमानी पद्धतीने ग्रेड लावत आहेत. यासह आपल्याच पद्धतीने कटतीदेखील लावत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. मनमानी पद्धतीने निर्णय घेतले जात असून, शेतकऱ्यांची लूट सुरू असल्याचा आरोप रमेश रामसिंग पाटील या शेतकऱ्याने केला.

शेतकऱ्यांचा वाद

सोमवारी खरेदी सुरू करण्यात येणार असल्याने रविवारी दुपारपासून शेतकऱ्यांनी बैलगाडी व ट्रॅक्टरमधून आपला माल आणून रांगा लावल्या होत्या. कडाक्याचा थंडीत रात्र काढून माल विक्रीसाठी थांबले. मात्र, सकाळी बैलगाडीतला माल खरेदी करण्यास नकार दिल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. तसेच माल खरेदी न झाल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारादेखील शेतकऱ्यांनी दिला. वाद वाढत असल्याने सीसीआयच्या केंद्रप्रमुखांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. दोन तासांच्या वादानंतर माल खरेदीस परवानगी दिली. मात्र, माल खरेदी करतानाही शेतकऱ्यांच्या मालाला ग्रेड लावत, कटती लावत एकप्रकारे शेतकऱ्यांची लुटच करण्याचे काम सुरू होते.

कोट..

चार दिवसांनंतर खरेदी बंद होती. सोमवारपासून खरेदी सुरू होणार असल्याने रविवारी दुपारपासून बैलगाड्यांतून माल आणून रांगेत लागलो होतो. मात्र, केंद्र सुरू झाल्यानंतर बैलगाडीतून आणलेला माल खरेदी केला जाणार नाही, असा मनमानी निर्णय सीसीआयने घेतला. ज्यांच्याकडे ट्रॅक्टर नाही, त्यांनी माल आणावा तरी कशात? आधीच भाव कमी केला, आता मालदेखील खरेदी करत नाहीत.

- स्वप्नील जाधव, शेतकरी, फुफनगरी