शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

बैलगाडीतील कापूस खरेदीस सीसीआयचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : चार दिवसांंनंतर सीसीआयकडून कापूस खरेदीस सोमवारपासून पुन्हा सुरुवात करण्यात आली. मात्र, गेल्या आठवड्यात अचानक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : चार दिवसांंनंतर सीसीआयकडून कापूस खरेदीस सोमवारपासून पुन्हा सुरुवात करण्यात आली. मात्र, गेल्या आठवड्यात अचानक ग्रेड कमी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सोमवारी केवळ ट्रॅक्टर व ट्रकमधून माल घेण्याचा नवीन तुघलकी निर्णय सीसीआय व जिनिंगमालकांनी घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर चांगलाच गोंधळ केला. तसेच शेतकऱ्यांना रांगेतच थांबवून खोटे उतारे देऊन व्यापाऱ्यांच्याच मालाला जिनिंगमालक व सीसीआयने नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्यांकडून प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.

सोमवारी आव्हाणे परिसरातील सीसीआयच्या दोन्ही केंद्रांवर सीसीआयने घेतलेल्या तुघलकी निर्णयाविरोधात शेतकऱ्यांचा संतापाचा बांध फुटलेला पाहायला मिळाला. सीसीआयने बंद केलेली खरेदी चार दिवसांनंतर पुन्हा सुरू करण्यात आली. मात्र, केवळ ट्रक व ट्रॅक्टरमध्ये माल आणलेल्याच शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्याचा निर्णय जिनिंगमालकांनी घेतला. त्याच वेळेस बैलगाडीतून माल आणलेले १०० हून अधिक शेतकरी रांगेत उभे होते.

व्यापाऱ्यांना पायघड्या, शेतकरी मात्र रांगेत

गेल्या काही वर्षांपासून सीसीआयच्या केंद्रांवरदेखील व्यापारी व दलाल सक्रिय झाले आहेत. यामुळे दिवाळीपूर्वी गावागावांत जाऊन कमी भावात माल खरेदी करणारे व्यापारीच आता सीसीआयच्या केंद्रावर मालविक्री करताना दिसून येत आहेत. व्यापाऱ्यांनी ४७०० ते ४९०० भावात घेतलेला माल सीसीआयच्या केंद्रावर ५५९० ते ५६१५ या दरात विक्री केला जात आहे. विशेष म्हणजे व्यापाऱ्यांच्या गाड्यांना कोणतीही अडवणूक न करता थेट प्रवेश मिळत आहे. तर, शेतकऱ्यांना विक्रीसाठी एकदोन दिवस रांगेत थांबावे लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा संताप वाढत असून, सीसीआयच्या केंद्रावर दररोज गोंधळ होत आहे.

ग्रेडरच गैरहजर

सीसीआयच्या केंद्रांवर मुख्य ग्रेडरच गैरहजर राहत आहे. त्याठिकाणी नियुक्त केलेले ठरावीक कर्मचारीच ग्रेड लावत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. ग्रेडर कार्यालयातून बाहेरदेखील येत नसून, स्थानिक कर्मचारी मनमानी पद्धतीने ग्रेड लावत आहेत. यासह आपल्याच पद्धतीने कटतीदेखील लावत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. मनमानी पद्धतीने निर्णय घेतले जात असून, शेतकऱ्यांची लूट सुरू असल्याचा आरोप रमेश रामसिंग पाटील या शेतकऱ्याने केला.

शेतकऱ्यांचा वाद

सोमवारी खरेदी सुरू करण्यात येणार असल्याने रविवारी दुपारपासून शेतकऱ्यांनी बैलगाडी व ट्रॅक्टरमधून आपला माल आणून रांगा लावल्या होत्या. कडाक्याचा थंडीत रात्र काढून माल विक्रीसाठी थांबले. मात्र, सकाळी बैलगाडीतला माल खरेदी करण्यास नकार दिल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. तसेच माल खरेदी न झाल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारादेखील शेतकऱ्यांनी दिला. वाद वाढत असल्याने सीसीआयच्या केंद्रप्रमुखांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. दोन तासांच्या वादानंतर माल खरेदीस परवानगी दिली. मात्र, माल खरेदी करतानाही शेतकऱ्यांच्या मालाला ग्रेड लावत, कटती लावत एकप्रकारे शेतकऱ्यांची लुटच करण्याचे काम सुरू होते.

कोट..

चार दिवसांनंतर खरेदी बंद होती. सोमवारपासून खरेदी सुरू होणार असल्याने रविवारी दुपारपासून बैलगाड्यांतून माल आणून रांगेत लागलो होतो. मात्र, केंद्र सुरू झाल्यानंतर बैलगाडीतून आणलेला माल खरेदी केला जाणार नाही, असा मनमानी निर्णय सीसीआयने घेतला. ज्यांच्याकडे ट्रॅक्टर नाही, त्यांनी माल आणावा तरी कशात? आधीच भाव कमी केला, आता मालदेखील खरेदी करत नाहीत.

- स्वप्नील जाधव, शेतकरी, फुफनगरी