शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

सीसीआयची कापूस खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:50 IST

शेतकऱ्यांना आवाहन : केंद्र प्रभारींचे बाजार समितीला पत्र लोकमत न्यूज नेटवर्क ममुराबाद : भारतीय कापूस निगम अर्थात 'सीसीआय'च्या माध्यमातून ...

शेतकऱ्यांना आवाहन : केंद्र प्रभारींचे बाजार समितीला पत्र

लोकमत न्यूज नेटवर्क

ममुराबाद : भारतीय कापूस निगम अर्थात 'सीसीआय'च्या माध्यमातून जळगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली कापसाची खरेदी येत्या शुक्रवारी थांबविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना त्यासंदर्भात आवाहन करून कृषी उत्पन्न बाजार समितीलाही केंद्र प्रभारींनी पत्र दिले आहे.

'सीसीआय'च्या माध्यमातून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला कापूस खरेदी करण्यासाठी जळगाव शहरातील शिवाजीनगरात तसेच तालुक्यातील आव्हाणे शिवारात आणि तुरखेडे शिवारात यंदा पाच केंद्रे कार्यान्वित करण्यात आली होती. कापूस मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत असतांना सर्व केंद्रांवर संबंधित प्रभारींकडून कापूस खरेदीचे नियोजनही करण्यात आले होते. त्यानुसार हजारो क्विंटल कापसाची खरेदी झाल्यानंतर आता शेतकऱ्यांकडील कापूस बऱ्याचअंशी विकला गेल्यानंतर 'सीसीआय'कडे जेमतेम २०० क्विंटलपर्यंत कापसाची दररोज आवक होत आहे. त्यामुळे केंद्र प्रभारींनी अन्य ठिकाणची कापूस खरेदी थांबवून सध्या फक्त तुरखेडे शिवारातील भगीरथ कॉटनस्पिनमध्ये कापसाची खरेदी सुरू ठेवली आहे. कापसाची मंदावलेली आवक लक्षात घेता २९ जानेवारीपर्यंत जेवढा काही कापूस केंद्रावर येईल, तो खरेदी केला जाईल. जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी स्वच्छ, कोरडा तसेच कवडीविरहीत कापूस तुरखेडे शिवारातील भगीरथ कॉटनस्पिनवर विक्रीसाठी आणावा. अन्य ठिकाणी कापूस खरेदी होणार नाही तसेच मुदतीनंतर आवक झालेला कापूस मोजला जाणार नाही, असेही संबंधित केंद्र प्रभारींनी स्पष्ट केले आहे. तशी सूचना जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांनासुद्धा एका पत्राद्वारे देण्यात आली आहे.

-----