शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
3
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
4
"मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग
5
CID Recruitment: परीक्षा न देता सरकारी नोकरी, सीआयडीमध्ये 'या' पदासाठी भरती, 'इतका' पगार मिळणार!
6
पुन्हा सुरु होणार जीवघेणा खेळ! 'Squid Game 3' चा टीझर आऊट; रिलीज डेटही समोर
7
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
8
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
9
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
10
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
11
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 
12
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
13
नवऱ्यासोबत पहिल्यांदाच काम करणार मराठी अभिनेत्री; आनंद व्यक्त करत म्हणाली, "तो दिग्दर्शक..."
14
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
15
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
16
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
17
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
18
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
19
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
20
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...

कोकणातील पूरस्थितीने काजू हजार रुपयांच्या उंबरठ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोकणामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे काजूच्या झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्याची आवक घटली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोकणामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे काजूच्या झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्याची आवक घटली आहे. त्यामुळे काजूचे भाव वाढून ९३० ते ९८० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. एकीकडे काजूचे भाव वाढत असताना विदेशातून आयात होणाऱ्या बदामाच्याही भावात वाढ होऊन ते एक हजार रुपये प्रति किलोवर पोहोचले आहे.

काजू-बदामाचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर असले तरी कोरोनाकाळात सुकामेवा सेवनाकडे कल वाढल्याने मध्यम वर्गीयांकडूनदेखील काजू-बदामाची मागणी वाढली. त्यामुळे त्यांचे भाव काही प्रमाणात वाढले.

काजूच्या माहेरघरात मोठे नुकसान

जळगावात काजूची प्रमुख आवक ही कोकणासह ओडिशामधूनही होत असते. त्यात कोकणातील काजूला अधिक पसंती दिली जाते. मात्र, काजूचे मोठे उत्पादन असलेल्या कोकणातच गेल्या महिन्यात अतिवृष्टी होऊन प्रचंड नुकसान झाले. यात काजूच्याही उत्पादनावर परिणाम झाल्याचे सांगितले जात असून यामुळे थेट आवकवरच परिणाम होऊन ती २५ ते ३० टक्क्यांनी घटली आहे. जळगावात दररोज तीन टन काजूची आवक होते. त्यात ७५ ते ८० क्विंटलने घट झाली आहे.

२०० रुपये प्रति किलोने वाढ

दोन ते तीन आठवड्यांपूर्वी काजूचे भाव ७६० ते ७८० रुपये प्रति किलो होते. मात्र आवक कमी झाल्याने काजूचे भाव वाढण्यास सुरुवात झाली. त्यात अगोदर ते ८८० ते ९३० रुपयांवर पोहोचले व आता पुन्हा आणखी वाढ होऊन ९३० ते ९८० (दर्जानुसार) रुपये प्रति किलोवर काजू पोहोचले आहेत. नुकसानीमुळे थेट २०० रुपयांनी काजूच्या भावात वाढ झाली आहे.

बदामांचीही आवक घटली

काजूसोबतच बदामाच्याही भावात वाढ होऊन ते थेट एक हजार रुपये प्रति किलोवर पोहोचले आहे. ऑस्ट्रेलिया, कॅलिफोर्निया येथून बदामाची आवक होत असते. मात्र, ऑस्ट्रेलियात पीक कमी आल्याने बदामाची आवक कमी झाली, तर कॅलिफोर्नियातील आयातच थांबली आहे. या देशातून आयात सुरू होण्यास साधारण दीड महिना लागणार असल्याने तोपर्यंत बदामाचे भाव चढेच राहणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. तीन आठवड्यांपूर्वी ६०० रुपये प्रति किलो असलेल्या बदामाच्या भावात जवळपास ४०० रुपयांची वाढ होऊन ते सध्या एक हजार रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत.

कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे काजूची आवक कमी झाल्याने त्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. तसेच विदेशातून आयात होणारी बदामाची आवकही कमी झाल्याने त्याचेही भाव वाढले आहेत. साधारण दीड ते दोन महिने हे भाव असेच राहू शकतात.

- सुरेश बरडिया, सुकामेवा विक्रेते.