शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
2
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
3
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
4
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
5
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
6
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
7
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा...", राम गोपाल वर्मा यांचं वादग्रस्त ट्वीट, म्हणाले- "गेल्या ५० वर्षांत..."
8
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
9
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
10
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
11
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
12
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
13
Malegaon Municipal Corporation Election : दोन्ही ठाकरे बंधूंची झाली युती; मालेगाव पालिकेत प्रभाव किती? मनोमिलनानंतर शांतता
14
"ते माझं भवितव्य बरबाद करतील...", 'इंडियन आयडल' जिंकल्यानंतर अभिजीत सावंतने केलेला मोठा गौप्यस्फोट
15
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
16
पुन्हा राज्यसभेवर संधी मिळेल का? मोदी सरकारमधील सहा मंत्र्यांची 2026 मध्ये ‘अग्निपरीक्षा’
17
अरे हे काय! मुंबईच्या संघात दोन-दोन रोहित; व्हायरल फोटो पाहून चाहते थक्क, हिटमॅनचा 'ड्युप्लिकेट' कोण?
18
सरकारी कर्मचारी दांपत्यांना दिलासा! पती-पत्नीची एकाच शहरात नियुक्ती करण्याचे केंद्राचे निर्देश
19
Malegaon Municipal Corporation Election : मालेगावमध्ये एमआयएम-काँग्रेस युतीचा प्रयोग; वरिष्ठांच्या हालचाली, जागा वाटपाचीही चर्चा
20
Accident : भाड्याने थार घेतली, गर्लफ्रेंडला भेटायला निघाला; समोर कुटुंब दिसताच गाडी पळवू लागला अन्... 
Daily Top 2Weekly Top 5

कोकणातील पूरस्थितीने काजू हजार रुपयांच्या उंबरठ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोकणामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे काजूच्या झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्याची आवक घटली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोकणामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे काजूच्या झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्याची आवक घटली आहे. त्यामुळे काजूचे भाव वाढून ९३० ते ९८० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. एकीकडे काजूचे भाव वाढत असताना विदेशातून आयात होणाऱ्या बदामाच्याही भावात वाढ होऊन ते एक हजार रुपये प्रति किलोवर पोहोचले आहे.

काजू-बदामाचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर असले तरी कोरोनाकाळात सुकामेवा सेवनाकडे कल वाढल्याने मध्यम वर्गीयांकडूनदेखील काजू-बदामाची मागणी वाढली. त्यामुळे त्यांचे भाव काही प्रमाणात वाढले.

काजूच्या माहेरघरात मोठे नुकसान

जळगावात काजूची प्रमुख आवक ही कोकणासह ओडिशामधूनही होत असते. त्यात कोकणातील काजूला अधिक पसंती दिली जाते. मात्र, काजूचे मोठे उत्पादन असलेल्या कोकणातच गेल्या महिन्यात अतिवृष्टी होऊन प्रचंड नुकसान झाले. यात काजूच्याही उत्पादनावर परिणाम झाल्याचे सांगितले जात असून यामुळे थेट आवकवरच परिणाम होऊन ती २५ ते ३० टक्क्यांनी घटली आहे. जळगावात दररोज तीन टन काजूची आवक होते. त्यात ७५ ते ८० क्विंटलने घट झाली आहे.

२०० रुपये प्रति किलोने वाढ

दोन ते तीन आठवड्यांपूर्वी काजूचे भाव ७६० ते ७८० रुपये प्रति किलो होते. मात्र आवक कमी झाल्याने काजूचे भाव वाढण्यास सुरुवात झाली. त्यात अगोदर ते ८८० ते ९३० रुपयांवर पोहोचले व आता पुन्हा आणखी वाढ होऊन ९३० ते ९८० (दर्जानुसार) रुपये प्रति किलोवर काजू पोहोचले आहेत. नुकसानीमुळे थेट २०० रुपयांनी काजूच्या भावात वाढ झाली आहे.

बदामांचीही आवक घटली

काजूसोबतच बदामाच्याही भावात वाढ होऊन ते थेट एक हजार रुपये प्रति किलोवर पोहोचले आहे. ऑस्ट्रेलिया, कॅलिफोर्निया येथून बदामाची आवक होत असते. मात्र, ऑस्ट्रेलियात पीक कमी आल्याने बदामाची आवक कमी झाली, तर कॅलिफोर्नियातील आयातच थांबली आहे. या देशातून आयात सुरू होण्यास साधारण दीड महिना लागणार असल्याने तोपर्यंत बदामाचे भाव चढेच राहणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. तीन आठवड्यांपूर्वी ६०० रुपये प्रति किलो असलेल्या बदामाच्या भावात जवळपास ४०० रुपयांची वाढ होऊन ते सध्या एक हजार रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत.

कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे काजूची आवक कमी झाल्याने त्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. तसेच विदेशातून आयात होणारी बदामाची आवकही कमी झाल्याने त्याचेही भाव वाढले आहेत. साधारण दीड ते दोन महिने हे भाव असेच राहू शकतात.

- सुरेश बरडिया, सुकामेवा विक्रेते.