शहरं
Join us  
Trending Stories
1
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
2
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
3
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
4
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
5
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
6
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
7
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
8
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
9
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
10
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
11
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
12
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
13
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
14
"सर्व प्रॉपर्टी देऊन टाका…!" निर्दयी सुनेची वृद्ध सासूला अमानुष मारहाण, केस ओढत केली शिवीगाळ; VIDEO पाहून तुमचाही संताप उडेल
15
Chaitanyananda Saraswati : डर्टी गेम! चैतन्यनंद सरस्वतीच्या मठात सेक्स टॉय, अश्लील CD; दिल्ली ते दुबईपर्यंत नेटवर्क
16
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
17
VIDEO: बापरे... अगदी सहज उंच बिल्डिंगवरून तरूणाने स्विमिंग पूलमध्ये मारली उडी अन् मग...
18
Mohammed Siraj Record : मियाँ मॅजिक! सिराजनं साधला नंबर वन होण्याचा डाव; मिचेल स्टार्कला टाकले मागे
19
‘संघाला १०० वर्ष झाली तरी त्यांची ‘मुंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम, काँग्रेसची टीका    
20
बिल्सेरी, किनले, अक्वाफिनाला आता टक्कर देणार मुकेश अंबानी; ₹३०००० कोटींच्या व्यवसायात एन्ट्रीच्या तयारीत 

आपल्या हृदयाचे स्क्वेअर फूट वाढवता येतील?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 01:39 IST

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत लिहिताहेत साहित्यिक विश्वास देशपांडे...

परवाच्या दिवशी चाळीसगावात रंगगंध या संस्थेने आयोजित केलेला साहित्य अभिवाचनाचा कार्यक्रम झाला. हा कार्यक्रम तीन दिवस होता. यानिमित्ताने महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राबाहेरील काही ठिकाणाहून स्पर्धक आले होते. काही स्पर्धकांची राहण्याची व्यवस्था आम्ही त्यांच्या इच्छेनुसार हॉटेलमध्ये केली. आणि बाकी मंडळी मग आमच्यासारख्या वेगवेगळ्या कार्यकर्त्यांकडे घरी पाहुणे म्हणून राहिली.माझ्याकडे मुंबईहून आलेले पाच पाहुणे उतरले होते. त्यांचे आदरातिथ्य आम्ही केले. ती मंडळी फार खुश झाली. जाताना म्हणाली, ‘अहो, आमच्याकडे मुंबई-पुण्यात कोणी एक दिवस जरी एखादा पाहुणा आला तरी आम्हाला संकट पडते.’ त्यांचे म्हणणे खरे होते. कारण प्रत्येकाची घरे लहान. त्यातून घरातील दोघे कामावर जाणारे. मग आलेल्या पाहुण्यांची सरबराई कोण करेल?मला लहानपणीचे दिवस आठवले. तेव्हा आम्ही अगदी एका छोट्या खेड्यात राहात असू. तेव्हा आमच्याकडे जे पाहुणे येत ते कमीत कमी ८-१५ दिवस तरी रहात. ज्यांची आमच्या गावाला शेती होती, असे आमचे शहरातील नातेवाईक हंगामाच्या वेळी कधी कधी महिनाभरदेखील येऊन राहत. माझी आई त्यांचे आदरातिथ्य आनंदाने करायची. तिच्या चेहऱ्यावर कधीही आठ्या पडल्या नाहीत. कधी लग्नकार्य असले तर ८-१५ दिवस आधी एकमेकांच्या घरी जाऊन राहणे ही नेहमीचीच गोष्ट होती. पण आता मात्र काळ बदलला आहे.पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. नोकरीनिमित्ताने कुटुंबे लहान झाली आहेत. पण फक्त कुटुंबेच लहान झाली असे नाही. आमची मनेपण लहान झाली. पूर्वी घर लहान असले आणि त्या घरात चार माणसे राहत असली तरी पाचवा माणूस आला तर त्याच्यासाठी आनंदाने जागा असायची. कारण मनाची श्रीमंती मोठी होती. आता मात्र कदाचित घरांचे स्क्वेअर फूट वाढले असतील पण हृदयाचे स्क्वेअर फूट कमी होत चालले आहेत. एकमेकांवरचे प्रेम कमी होत चालले. माझे घर, माझी मुले, माझी बायको, माझा परिवार असा संकुचित परीघ होतो आहे. मी माझे पाहीन. बाकीच्या गोष्टींशी मला काही देणेघेणे नाही, अशी वृत्ती वाढीस लागली आहे. एकमेकांच्या सुखदु:खात धावून जाण्याची वृत्ती कमी होत चालली आहे. घराभोवती जसे कंपाऊंड आम्ही घालतो तसेच मनाभोवती पण घालायला लागलो काय असे वाटायला लागले आहे. निरपेक्ष वृत्तीने इतरांसाठी काही करावे असे आमच्यातील फार थोड्यांना वाटते.पूर्वी आमची शास्त्रे, उपनिषदे, तत्वज्ञान आम्हाला सांगत असत की इतरांसाठी जगा. फक्त स्वत:साठी जगू नका. आपली मने, हृदये विशाल करा. ‘सहनाववतु सहनौभुनक्तु...’ यात तेच सांगितले आहे. पण आम्ही काळानुसार बदललो. स्वत:ला मर्यादा घालून घेतल्या. आपल्या विचारांच्या, भावनांच्या कक्षा रुंदावण्याऐवजी संकुचित केल्या. त्यातून एकलकोंडेपणा वाढला. आजार वाढले. मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम झाला. हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह आदी आजार बळावले. आता विज्ञान आपल्याला सांगते आहे की, तुम्हाला जास्त जगायचे असेल तर तुम्हाला संकुचित मनोवृत्ती ठेवून चालणार नाही.प्रेम द्यावे लागेल आणि प्रेम घ्यावे लागेल. निरपेक्षपणे इतरांसाठी काहीतरी करावे लागेल. इतरांना आनंद देणे, त्यांच्या आनंदाने आनंदी होणे, दु:खाने दु:खी होणे यासारख्या शुद्ध भावनांनी आमचे जीवन निर्मळ आणि सुखी होईल. राग, लोभ, द्वेष, असूया , तृष्णा हे विकार आमच्या आरोग्याचे शत्रू आहेत. भगवद गीतेत श्रीकृष्णाने निष्काम कर्मयोग सांगितला आहे. त्याचे मर्म कदाचित हेच असावे. फळाची अपेक्षा न ठेवता काही चांगले काम करा.-विश्वास देशपांडे, चाळीसगाव

टॅग्स :literatureसाहित्यChalisgaonचाळीसगाव