शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

वसतिगृहे आणि शिष्यवृत्तीसाठी सुरू करणार मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राज्यात सध्या महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. मात्र त्याचसोबत विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे आणि शिष्यवृत्तींच्या प्रश्नावर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : राज्यात सध्या महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. मात्र त्याचसोबत विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे आणि शिष्यवृत्तींच्या प्रश्नावर मोहीम सुरू करणार आहोत. त्यात शासनाने लवकरात लवकर विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी वसतिगृहे सुरू करावी. आणि जी शिष्यवृत्तीची थकबाकी आहे. ती तातडीने विद्यार्थ्यांना देण्याची मागणी करणार असल्याचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश मंत्री सिद्धेश्वर लटपटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

अभाविपचे संघटन सचिव असलेले सिद्धेश्वर लटपटे यांची प्रदेश मंत्री म्हणून नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनात निवड करण्यात आली आहे. त्यानिमित्त ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला.

लटपटे यांनी सांगितले की, ‘अभाविपमध्ये प्रदेश मंत्री आणि प्रदेश अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया वेगळी असते. त्यासाठी निवडणूक अधिकारी असतात. यावेळी प्रा. गंगाधर खेडकर यांनी हे काम पाहिले होते. त्यावेळी सर्वच शाखांमधून प्रस्ताव पाठवले जातात. त्यावर चर्चा करण्यात आली होती. त्यातून प्रदेश मंत्री म्हणून निवड करण्यात आली.’

प्रदेश मंत्री म्हणून काम करत असताना विद्यार्थ्यांचे कोणते प्रश्न हाताळणार, यावर बोलताना लटपटे यांनी सांगितले की, १५ फेब्रुवारीला विद्यार्थी एवढ्या महिन्यांनंतर महाविद्यालयात आले. त्यावेळी त्यांचे आम्ही स्वागत केले. त्यानंतर महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी सक्रिय करणे गरजेचे झाले आहे. ऑनलाइन शिक्षणाच्या मर्यादा आता समोर आल्या आहेत. शिक्षणाचे कॅलेंडर सुरळीत होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सद्या महाविद्यालये सुरू झालेली असली तरी वसतिगृहे आणि मेस बंदच आहेत. वसतिगृहे सुरू करण्यासाठी येत्या काळात आंदोलन करणार आहोत.

लटपटे पुढे म्हणाले की, ‘ऑनलाइन शिक्षणाच्या मर्यादा समोर आल्या आहेत. त्यात प्राध्यापकांना अडचणी येत आहेत. हे शिक्षण प्रभावी ठरत नसल्याचेही समोर आले आहे.’

शिष्यवृत्तीच्या प्रश्नावर आंदोलन

लटपटे यांनी सांगितले की, ‘राज्यात २०१७ पासून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळालेली नाही. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेवर मिळावी, यासाठी सुरूवातीला सहायक शिक्षण संचालकांना निवेदन दिले जाणार आहे. त्यानंतर त्यावर कार्यवाही न झाल्यास या सर्व विषयांवर राज्यभर आंदोलन केले जाईल.