शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

आराखडा न देताच केबल जोडणीचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात एकीकडे अमृत अंतर्गत सुरु असलेल्या पाणी पुरवठा व भुयारी गटार योजनेच्या खोदकामामुळे रस्त्यांची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरात एकीकडे अमृत अंतर्गत सुरु असलेल्या पाणी पुरवठा व भुयारी गटार योजनेच्या खोदकामामुळे रस्त्यांची वाट लागली आहे. त्यातच दुसरीकडे शासकीय कार्यालयांना फायबर ऑप्टीकल केबलने जोडण्याचे ‘महानेट’ चे काम एका खासगी कंपनीकडून सुरु आहे. मात्र, यासाठी संबधित कंपनीने मनपाकडे कोणताही आराखडा सादर केला नसून, परवानगी देखील घेतलेली नाही. त्यातच केबलसाठी खोदकाम करून, खांब उभे केले जात आहेत, याबाबतच्या तक्रारी मनपा प्रशासनाकडे प्राप्त झाल्यानंतर मनपाने संबधित कंपनीला नोटीस बजावून शहरात सुरु असलेले काम थांबविले आहे.

शहरात ‘महानेट प्रकल्पा’चे काम गेल्या काही महिन्यांपुर्वी हे सुरु झाले होते. याबाबत चार महिन्यांपुर्वी तत्कालीन स्थायी समिती सभापती ॲड.शुचिता हाडा यांनी देखील हा प्रकार मनपा प्रशानाच्या लक्षात आणून दिला होता. फायबर ऑप्टीकल केबलसाठी अनेक भागात रस्त्यांचे खोदकाम देखील करण्यात आले. तसेच या रस्त्यांची दुरुस्ती देखील महानेट ने केली नाही. पदाधिकाऱ्यांचा सूचनेनंतर देखील मनपाने या प्रकरणी कोणतेही लक्ष घातले नव्हते. मात्र, याबाबत आता नागरिकांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मनपाने या प्रकरणी लक्ष घालून हे काम थांबविले आहे.

रस्त्यांचीही रुंदी झाली कमी

शहरात महानेट अंतर्गत आतापर्यंत ४३५ खांब उभारले आहेत. हे खांब उभारण्यासाठी मनपा प्रशासनाला देखील विश्वासात घेतले गेलेले नाही. हे खांब उभे केल्यामुळे अनेक कॉलनी भागातील रस्त्यांची रुंदी देखील कमी झाली आहे. तसेच खोदकामामुळे चांगले रस्ते देखील खराब होत आहेत. अमृतमुळे आधीच रस्त्यांची समस्या बिकट झाली आहे. त्यात या कामामुळे अधिकच अडचणींमध्य भर पडत आहे.

मनपाने थांबविले महानेटचे काम

राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांसह त्यांच्या नियंत्रणातील अन्य कार्यालयांचा कारभार जलद व्हावा, म्हणून या कार्यालयांमध्ये उच्च क्षमेतची इंटनेट जोडणी करण्यासाठी महानेट प्रकल्प सुरु केला आहे. यासाठी शासनाने रिलायन्स कंपनीकडून हे काम करून घेतले जात आहे. शासनाचे काम असल्याने तशी परवानगी दिली आहे. मात्र, ज्या भागात हे काम सुरु केले जाते. त्या भागात काम सुरु होण्यापुर्वी मनपाकडे परवानगी घ्यावी लागते. तसेच कामाचा आराखडा मनपाकडे सादर करणे गरजेचे असते. मात्र, कंपनीने मनपाकडे आराखडा सादर केलेला नाही. त्यामुळे मनपा प्रशासनाने नोटीस बजावून हे काम थांबविले असल्याची माहिती मनपा प्रशासनाने दिली आहे.