शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

आराखडा न देताच केबल जोडणीचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात एकीकडे अमृत अंतर्गत सुरु असलेल्या पाणी पुरवठा व भुयारी गटार योजनेच्या खोदकामामुळे रस्त्यांची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरात एकीकडे अमृत अंतर्गत सुरु असलेल्या पाणी पुरवठा व भुयारी गटार योजनेच्या खोदकामामुळे रस्त्यांची वाट लागली आहे. त्यातच दुसरीकडे शासकीय कार्यालयांना फायबर ऑप्टीकल केबलने जोडण्याचे ‘महानेट’ चे काम एका खासगी कंपनीकडून सुरु आहे. मात्र, यासाठी संबधित कंपनीने मनपाकडे कोणताही आराखडा सादर केला नसून, परवानगी देखील घेतलेली नाही. त्यातच केबलसाठी खोदकाम करून, खांब उभे केले जात आहेत, याबाबतच्या तक्रारी मनपा प्रशासनाकडे प्राप्त झाल्यानंतर मनपाने संबधित कंपनीला नोटीस बजावून शहरात सुरु असलेले काम थांबविले आहे.

शहरात ‘महानेट प्रकल्पा’चे काम गेल्या काही महिन्यांपुर्वी हे सुरु झाले होते. याबाबत चार महिन्यांपुर्वी तत्कालीन स्थायी समिती सभापती ॲड.शुचिता हाडा यांनी देखील हा प्रकार मनपा प्रशानाच्या लक्षात आणून दिला होता. फायबर ऑप्टीकल केबलसाठी अनेक भागात रस्त्यांचे खोदकाम देखील करण्यात आले. तसेच या रस्त्यांची दुरुस्ती देखील महानेट ने केली नाही. पदाधिकाऱ्यांचा सूचनेनंतर देखील मनपाने या प्रकरणी कोणतेही लक्ष घातले नव्हते. मात्र, याबाबत आता नागरिकांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मनपाने या प्रकरणी लक्ष घालून हे काम थांबविले आहे.

रस्त्यांचीही रुंदी झाली कमी

शहरात महानेट अंतर्गत आतापर्यंत ४३५ खांब उभारले आहेत. हे खांब उभारण्यासाठी मनपा प्रशासनाला देखील विश्वासात घेतले गेलेले नाही. हे खांब उभे केल्यामुळे अनेक कॉलनी भागातील रस्त्यांची रुंदी देखील कमी झाली आहे. तसेच खोदकामामुळे चांगले रस्ते देखील खराब होत आहेत. अमृतमुळे आधीच रस्त्यांची समस्या बिकट झाली आहे. त्यात या कामामुळे अधिकच अडचणींमध्य भर पडत आहे.

मनपाने थांबविले महानेटचे काम

राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांसह त्यांच्या नियंत्रणातील अन्य कार्यालयांचा कारभार जलद व्हावा, म्हणून या कार्यालयांमध्ये उच्च क्षमेतची इंटनेट जोडणी करण्यासाठी महानेट प्रकल्प सुरु केला आहे. यासाठी शासनाने रिलायन्स कंपनीकडून हे काम करून घेतले जात आहे. शासनाचे काम असल्याने तशी परवानगी दिली आहे. मात्र, ज्या भागात हे काम सुरु केले जाते. त्या भागात काम सुरु होण्यापुर्वी मनपाकडे परवानगी घ्यावी लागते. तसेच कामाचा आराखडा मनपाकडे सादर करणे गरजेचे असते. मात्र, कंपनीने मनपाकडे आराखडा सादर केलेला नाही. त्यामुळे मनपा प्रशासनाने नोटीस बजावून हे काम थांबविले असल्याची माहिती मनपा प्रशासनाने दिली आहे.