शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

चीनला धडा शिकवण्यासाठी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 18:42 IST

सतीशकुमार: स्वदेशी जागरण मंचचे राष्ट्रीय स्वदेशी व सुरक्षा अभियान

ठळक मुद्देजनजागृती अभियान सुरूचीनला धडा शिकवण्यासाठी चिनी वस्तूंचा वापर बंद कराआवाहनाला मिळतोय प्रतिसाद

लोकमत ऑनलाईन जळगाव, दि.13- एकीकडे पाक पुरस्कृत दहशतवादाला पाठबळ देणारा, अरूणाचल प्रदेशवर सातत्याने दावा सांगणार चीन जागतिकस्तरावरही सातत्याने भारताला विरोध करीत आहे. दुसरीकडे भारताच्या अर्थव्यवस्थेवर आघात करण्यासाठी व्यापार युद्धही करतो आहे. त्या चीनला धडा शिकविण्यासाठी चीनी वस्तूंवर संपूर्ण बहिष्कार टाकण्याचे आवाहन स्वदेश सुरक्षा अभियानाचे अखिल भारतीय प्रमुख सतीशकुमार यांनी रविवारी दुपारी पत्रकार भवनात आयोजित पत्रपरिषदेत केले. तर स्वदेशी जागरण मंच व समविचारी संघटनांतर्फे सुरू केलेले राष्ट्रीय स्वदेशी व सुरक्षा अभियानात जिलत 7 ते 21 ऑगस्ट या दरम्यान राबविण्यात येत असल्याची माहिती मंचचे महाराष्ट्र व गोवा प्रदेश संघटक राजीव क्षीरसागर यांनी दिली. यावेळी मंचचे जिल्हा संयोजक विशाल चोरडिया, जिल्हा कार्यवाहक किशोर चौधरी देखील उपस्थित होते. सतीशकुमार यांनी सांगितले की, 1962च्या युद्धात आपला 37 हजार 500 चौ.किमी भूभाग चीनने बळकावला आहे. तसेच पाकव्याप्त काश्मिरातील 5180 चौ.किमी भूभाग पाकिस्तानकडून परस्पर चीनला मिळाला आहे. अरूणाचल व लडाखमधील 90 हजार चौ.किमी भूभागावर चीन दावा सांगत आहे. वर्षातून 400 ते 500 वेळा चीन आपल्या प्रदेशात घुसखोरी करतो. भारताला राष्ट्रीय सुरक्षा परिषद तसेच न्यूक्लिअर सप्लाय ग्रुपचा सदस्य बनण्यात चीनच अडथळे आणत आहे. दुसरीकडे चीनने भारताशी व्यापार युद्ध सुरू केले आहे. भारतीय बाजारपेठेवर कब्जा करून कमी किंमतीत वस्तू विकत असल्याने लाखो रोजगार भारतातून चीनकडे गेले आहेत. चीनमधून भारतात दरवर्षी सुमारे 6 लाख कोटीच्या मालाची आयात होते. तर भारतातून त्या तुलनेत अल्प निर्यात होते. यात तब्बल 52 टक्कय़ांची तफावत आहे. चीनमधील 60 टक्के उद्योग निर्यातीवर अवलंबून आहे. त्यामुळे चीनला धडा शिकवण्यासाठी चिनी वस्तूंचा वापर बंद करून त्या मालावर पूर्णपणे बहिष्कार टाकणे हाच सवरेत्तम उपाय आहे. त्यासाठीच राष्ट्रीय स्वदेशी व सुरक्षा अभियान राबविले जात असल्याचे सांगितले. जनजागृती अभियान सुरू स्वदेशी जागरण मंचचे महाराष्ट्र व गोवा प्रदेश संघटक राजीव क्षीरसागर यांनी सांगितले की, जिल्ह्यात 7 ते 21 ऑगस्ट दरम्यान हे अभियान राबविले जात आहे. त्यात स्वाक्षरी अभियान, व्याख्यान, कोपरा सभा, प्रतिज्ञा घेणे, पत्रक वाटप असे विविध उपक्रम राबवून स्वदेशी वापरा, चिनी वस्तूंवर बहिष्कार टाका असे आवाहन केले जात आहे. महिलाच प्रामुख्याने खरेदी करतात.त्यामुळे महिलांमध्येही जनजागृती करण्यावर भर दिला असल्याचे सांगितले.