शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

चीनला धडा शिकवण्यासाठी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 18:42 IST

सतीशकुमार: स्वदेशी जागरण मंचचे राष्ट्रीय स्वदेशी व सुरक्षा अभियान

ठळक मुद्देजनजागृती अभियान सुरूचीनला धडा शिकवण्यासाठी चिनी वस्तूंचा वापर बंद कराआवाहनाला मिळतोय प्रतिसाद

लोकमत ऑनलाईन जळगाव, दि.13- एकीकडे पाक पुरस्कृत दहशतवादाला पाठबळ देणारा, अरूणाचल प्रदेशवर सातत्याने दावा सांगणार चीन जागतिकस्तरावरही सातत्याने भारताला विरोध करीत आहे. दुसरीकडे भारताच्या अर्थव्यवस्थेवर आघात करण्यासाठी व्यापार युद्धही करतो आहे. त्या चीनला धडा शिकविण्यासाठी चीनी वस्तूंवर संपूर्ण बहिष्कार टाकण्याचे आवाहन स्वदेश सुरक्षा अभियानाचे अखिल भारतीय प्रमुख सतीशकुमार यांनी रविवारी दुपारी पत्रकार भवनात आयोजित पत्रपरिषदेत केले. तर स्वदेशी जागरण मंच व समविचारी संघटनांतर्फे सुरू केलेले राष्ट्रीय स्वदेशी व सुरक्षा अभियानात जिलत 7 ते 21 ऑगस्ट या दरम्यान राबविण्यात येत असल्याची माहिती मंचचे महाराष्ट्र व गोवा प्रदेश संघटक राजीव क्षीरसागर यांनी दिली. यावेळी मंचचे जिल्हा संयोजक विशाल चोरडिया, जिल्हा कार्यवाहक किशोर चौधरी देखील उपस्थित होते. सतीशकुमार यांनी सांगितले की, 1962च्या युद्धात आपला 37 हजार 500 चौ.किमी भूभाग चीनने बळकावला आहे. तसेच पाकव्याप्त काश्मिरातील 5180 चौ.किमी भूभाग पाकिस्तानकडून परस्पर चीनला मिळाला आहे. अरूणाचल व लडाखमधील 90 हजार चौ.किमी भूभागावर चीन दावा सांगत आहे. वर्षातून 400 ते 500 वेळा चीन आपल्या प्रदेशात घुसखोरी करतो. भारताला राष्ट्रीय सुरक्षा परिषद तसेच न्यूक्लिअर सप्लाय ग्रुपचा सदस्य बनण्यात चीनच अडथळे आणत आहे. दुसरीकडे चीनने भारताशी व्यापार युद्ध सुरू केले आहे. भारतीय बाजारपेठेवर कब्जा करून कमी किंमतीत वस्तू विकत असल्याने लाखो रोजगार भारतातून चीनकडे गेले आहेत. चीनमधून भारतात दरवर्षी सुमारे 6 लाख कोटीच्या मालाची आयात होते. तर भारतातून त्या तुलनेत अल्प निर्यात होते. यात तब्बल 52 टक्कय़ांची तफावत आहे. चीनमधील 60 टक्के उद्योग निर्यातीवर अवलंबून आहे. त्यामुळे चीनला धडा शिकवण्यासाठी चिनी वस्तूंचा वापर बंद करून त्या मालावर पूर्णपणे बहिष्कार टाकणे हाच सवरेत्तम उपाय आहे. त्यासाठीच राष्ट्रीय स्वदेशी व सुरक्षा अभियान राबविले जात असल्याचे सांगितले. जनजागृती अभियान सुरू स्वदेशी जागरण मंचचे महाराष्ट्र व गोवा प्रदेश संघटक राजीव क्षीरसागर यांनी सांगितले की, जिल्ह्यात 7 ते 21 ऑगस्ट दरम्यान हे अभियान राबविले जात आहे. त्यात स्वाक्षरी अभियान, व्याख्यान, कोपरा सभा, प्रतिज्ञा घेणे, पत्रक वाटप असे विविध उपक्रम राबवून स्वदेशी वापरा, चिनी वस्तूंवर बहिष्कार टाका असे आवाहन केले जात आहे. महिलाच प्रामुख्याने खरेदी करतात.त्यामुळे महिलांमध्येही जनजागृती करण्यावर भर दिला असल्याचे सांगितले.