शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

‘हमी’ पेक्षाही कमी दरात कापूस खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 11:15 IST

खासगीसह, शासकीय कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लूट

ठळक मुद्दे भावात सातत्याने घट

अजय पाटील ।जळगाव : भाव वाढेल या अपेक्षेने शेतकºयांनी चार महिने वाट पाहिल्यानंतर फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून शेतकºयांकडून कापूस विक्रीसाठी काढण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, शेतकºयांकडून माल विक्रीसाठी आणल्यानंतर शासकीय व खासगी जिनींगवर शेतकºयांकडून नियम व अटीं दाखवून हमीभावापेक्षाही कमी दराने कापूस खरेदी केला जात असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. तसेच फरदड नसतानाही फरदड असल्याचे सांगत शेतकºयांचा मालामध्ये दोष शोधले जात आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.यावर्षी जरी पाऊस चांगला झाला नसला तरी कापसाची गुणवत्ता गेल्यावर्षापेक्षाही चांगली आहे. बोंडअळीचा प्रादुर्भाव देखील कमी असल्याने कापसाचा दर्जा चांगला असल्याने यंदा कापसाचे भाव वाढतील अशी अपेक्षा शेतकºयांची होती. तसेच शासनाकडून ५४५० प्रतीक्विंटल इतका हमीभाव निश्चित करण्यात आल्यानंतर खासगी बाजारात कापसाचे दर वाढतील अशी अपेक्षा शेतकºयांची होती. मात्र, सप्टेंबर महिन्यात ६ हजार प्रतीक्विंटलचा दर मिळाल्यानंतर दिवाळीनंतर कापसाच्या दरात सारखी घट झालेली पहायला मिळाली. त्यात मकरसंक्रांतीनंतर देखील कापसाला उठाव आला नसल्याने शेतकºयांची निराशाच झाली आहे.वाट पाहिल्यानंतर शेतकºयांकडून कापूस विक्रीचार महिने भाव वाढीची अपेक्षा फोल झाल्यानंतर आता शेतकºयांकडून बाजारात कापूस आणला जात असताना,आता सीसीआय व व्यापाºयांकडून आता मनमानी पध्दतीने भाव निश्चित केले जात आहेत. यंदा कापसाची गुणवत्ता चांगली असतानाही व्यापारी व सीसीआयच्या केंद्रावर कापसाचा उतारा कमी दाखवला जात आहे. त्यामुळे शेतकºयांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.फरदड नसतानाही परत केला जातोय कापूसयंदा शेतकºयांनी आपल्याकडील कापूस जानेवारी महिन्यापर्यंत विक्रीसाठी आणलाच नव्हता. आता शेतकºयांकडून विक्रीसाठी आणला जाणारा कापूस हा सप्टेंबर ते डिसेंबरदरम्यानचा आहे. मात्र, कापूस खरेदी केंद्रावर शेतकºयांचा हाच माल फरदड असल्याचे सांगत परत केला जात आहे. किंवा कमी दराने खरेदी केला जात आहे. हमीभाव ५४५० इतका निश्चित केला असताना शासकीय खरेदी केंद्रावर ५ हजार ते ५३०० रुपयांप्रमाणे कापूस खरेदी केली जात आहे.गुन्हे दाखल करण्याची मागणीकापसासाठी हमीभाव निश्चित केला असतानाही हमीभावापेक्षा कमी दराने कापूस खरेदी केला जात असल्याने शेतकºयांकडून सीसीआयच्या केंद्रप्रमुखांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी शेतकºयांकडून होत आहे. जिल्ह्यात सीसीआयचे आव्हाणे, वºहाड व जामनेर या तीनच ठिकाणी कें द्र सुरु आहेत. खरेदी केंद्रावरच हमीभावापेक्षा कमी दराने कापूस केला जात असल्याने खासगी व्यापारी देखील सीसीआयच्या भावापेक्षा केवळ १०० ते २०० रुपयांची वाढ देवून माल खरेदी करत आहेत.संशोधन करणाºया विद्यार्थ्यांना फेलोशिप द्याजळगाव - पूर्णवेळ संशोधन करणाºया विद्यार्थ्यांसाठी मासिक नऊ हजार रूपये फेलोशिप सुरू करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा़ पी़पी़पाटील यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली.निवेदन देऊन केले़ यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ा्रदेश सहमंत्री सिद्धेश्वर लटपटे, जिल्हा प्रमुख प्रा.डॉ. सुनील कुलकर्णी, नगरमंत्री योगेश पाटील, महेश कचरे, अतुल तेली, हर्षल तांबट, श्रुती शर्मा व भावना शंकोपाळ उपस्थित होते.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाव वाढीची अपेक्षालोकसभा निवडणुकीसाठी लवकरच आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर कापसाचे भाव वाढतील अशी एकमेव आशा शेतकºयांना लागली आहे. तसेच मार्च एण्डमध्ये देखील कापसाचे भाव वाढण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. मात्र, कापूस बाजारातील जाणकारांच्या मते कापसाचे भाव जरी वाढले तरी ते भावात मोठा फरक राहणार नाही.