शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

‘हमी’ पेक्षाही कमी दरात कापूस खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 11:15 IST

खासगीसह, शासकीय कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लूट

ठळक मुद्दे भावात सातत्याने घट

अजय पाटील ।जळगाव : भाव वाढेल या अपेक्षेने शेतकºयांनी चार महिने वाट पाहिल्यानंतर फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून शेतकºयांकडून कापूस विक्रीसाठी काढण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, शेतकºयांकडून माल विक्रीसाठी आणल्यानंतर शासकीय व खासगी जिनींगवर शेतकºयांकडून नियम व अटीं दाखवून हमीभावापेक्षाही कमी दराने कापूस खरेदी केला जात असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. तसेच फरदड नसतानाही फरदड असल्याचे सांगत शेतकºयांचा मालामध्ये दोष शोधले जात आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.यावर्षी जरी पाऊस चांगला झाला नसला तरी कापसाची गुणवत्ता गेल्यावर्षापेक्षाही चांगली आहे. बोंडअळीचा प्रादुर्भाव देखील कमी असल्याने कापसाचा दर्जा चांगला असल्याने यंदा कापसाचे भाव वाढतील अशी अपेक्षा शेतकºयांची होती. तसेच शासनाकडून ५४५० प्रतीक्विंटल इतका हमीभाव निश्चित करण्यात आल्यानंतर खासगी बाजारात कापसाचे दर वाढतील अशी अपेक्षा शेतकºयांची होती. मात्र, सप्टेंबर महिन्यात ६ हजार प्रतीक्विंटलचा दर मिळाल्यानंतर दिवाळीनंतर कापसाच्या दरात सारखी घट झालेली पहायला मिळाली. त्यात मकरसंक्रांतीनंतर देखील कापसाला उठाव आला नसल्याने शेतकºयांची निराशाच झाली आहे.वाट पाहिल्यानंतर शेतकºयांकडून कापूस विक्रीचार महिने भाव वाढीची अपेक्षा फोल झाल्यानंतर आता शेतकºयांकडून बाजारात कापूस आणला जात असताना,आता सीसीआय व व्यापाºयांकडून आता मनमानी पध्दतीने भाव निश्चित केले जात आहेत. यंदा कापसाची गुणवत्ता चांगली असतानाही व्यापारी व सीसीआयच्या केंद्रावर कापसाचा उतारा कमी दाखवला जात आहे. त्यामुळे शेतकºयांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.फरदड नसतानाही परत केला जातोय कापूसयंदा शेतकºयांनी आपल्याकडील कापूस जानेवारी महिन्यापर्यंत विक्रीसाठी आणलाच नव्हता. आता शेतकºयांकडून विक्रीसाठी आणला जाणारा कापूस हा सप्टेंबर ते डिसेंबरदरम्यानचा आहे. मात्र, कापूस खरेदी केंद्रावर शेतकºयांचा हाच माल फरदड असल्याचे सांगत परत केला जात आहे. किंवा कमी दराने खरेदी केला जात आहे. हमीभाव ५४५० इतका निश्चित केला असताना शासकीय खरेदी केंद्रावर ५ हजार ते ५३०० रुपयांप्रमाणे कापूस खरेदी केली जात आहे.गुन्हे दाखल करण्याची मागणीकापसासाठी हमीभाव निश्चित केला असतानाही हमीभावापेक्षा कमी दराने कापूस खरेदी केला जात असल्याने शेतकºयांकडून सीसीआयच्या केंद्रप्रमुखांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी शेतकºयांकडून होत आहे. जिल्ह्यात सीसीआयचे आव्हाणे, वºहाड व जामनेर या तीनच ठिकाणी कें द्र सुरु आहेत. खरेदी केंद्रावरच हमीभावापेक्षा कमी दराने कापूस केला जात असल्याने खासगी व्यापारी देखील सीसीआयच्या भावापेक्षा केवळ १०० ते २०० रुपयांची वाढ देवून माल खरेदी करत आहेत.संशोधन करणाºया विद्यार्थ्यांना फेलोशिप द्याजळगाव - पूर्णवेळ संशोधन करणाºया विद्यार्थ्यांसाठी मासिक नऊ हजार रूपये फेलोशिप सुरू करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा़ पी़पी़पाटील यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली.निवेदन देऊन केले़ यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ा्रदेश सहमंत्री सिद्धेश्वर लटपटे, जिल्हा प्रमुख प्रा.डॉ. सुनील कुलकर्णी, नगरमंत्री योगेश पाटील, महेश कचरे, अतुल तेली, हर्षल तांबट, श्रुती शर्मा व भावना शंकोपाळ उपस्थित होते.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाव वाढीची अपेक्षालोकसभा निवडणुकीसाठी लवकरच आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर कापसाचे भाव वाढतील अशी एकमेव आशा शेतकºयांना लागली आहे. तसेच मार्च एण्डमध्ये देखील कापसाचे भाव वाढण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. मात्र, कापूस बाजारातील जाणकारांच्या मते कापसाचे भाव जरी वाढले तरी ते भावात मोठा फरक राहणार नाही.