शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

आगारात प्रवासी असल्यावरच सोडण्यात येणार बसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:15 IST

आगार व्यवस्थापकांची माहिती: मात्र, अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांठीही तात्काळ बस सुटणार जळगाव : शासनाने लागू केलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर आगार ...

आगार व्यवस्थापकांची माहिती: मात्र, अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांठीही तात्काळ बस सुटणार

जळगाव : शासनाने लागू केलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर आगार प्रशासनातर्फे वाहतुकीच्या नियमामध्ये गुरुवारपासून बदल करण्यात आले असून, दैनंदिन वेळापत्रकाप्रमाणे बसेस न सोडता, आगारात प्रवासी असल्यावरच बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक प्रज्ञेश बोरसे यांनी ‘लोकमत’ला दिली. मात्र, जवळच्या तालुक्यात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या नागरिकांसाठी तत्काळ बसेस सोडण्यात येणार असल्याचेही बोरसे यांनी सांगितले.

शासनाने संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या नागरिकांनाच घराबाहेर पडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बाहेरील गावाहून जळगावकडे येणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी राहण्याची शक्यता आहे. तर जळगावहून बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांचीही संख्या कमी राहणार आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करता जळगाव आगारातर्फे गुरुवारपासून वेळापत्रकाप्रमाणे बसेस न सोडता, प्रवासी उपलब्ध झाल्यावरच बसेस सोडण्यात येणार आहेत. जर पुरेसे प्रवासी उपलब्ध झाले नाही, तर बसेसही सुटणार नाही. त्यामुळे वेळापत्रकाप्रमाणे जळगाव आगारातून धुळे, औरंगाबाद, नाशिक, पुणे, विरार, चाळीसगाव या ठिकाणी एकही बस रवाना होणार नाही. मात्र, अत्यावश्यक सेवेतील ग्रामीण, तसेच जिल्ह्यातील इतर तालुक्याच्या ठिकाणी जाणारे नागरिक आले, तर त्यांच्यासाठी तत्काळ बसेस सोडण्यात येणार आहेत. शासनाच्या सूचनेनुसार ३० एप्रिलपर्यंत महामंडळाचे हे नियोजन कायम राहणार आहे.

इन्फो :

तर उत्पन्न अधिकच घटणार

संचारबंदीच्या या काळात महामंडळाची सेवा ८० टक्के बंदच राहण्याची शक्यता आहे. कारण, शासनाच्या सूचनेनुसार अत्यावश्यक सेवा देणाऱ्या नागरिकांच बाहेर फिरण्याची सक्ती असल्याने परिणामी प्रवासी संख्येवरही याचा मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे सध्या कोरोना काळात येत असलेले साडेतीन ते चार लाखांपर्यंतचे उत्पन्न आता संचारबंदीच्या काळात अधिकच घटणार असल्याचा अंदाज आगार प्रशासनातर्फे वर्तविण्यात आला.

इन्फो:

निर्जंतुक करूनच बाहेरगावी बस रवाना

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महामंडळातर्फे प्रत्येक बसचे निर्जंतुकीकरण करूनच बाहेरगावी सोडण्यात येत असल्याचे आगार प्रशासनातर्फे सांगण्यात सांगितले. तसेच चालक व वाहकांना मास्क असणाऱ्या प्रवाशांच बसेसमध्ये प्रवेश देण्याबाबत सूचना करण्यात आल्या असून, महामंडळातर्फे याची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. तसेच मनपाच्या पथकामार्फत विनामास्क प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले.

इन्फो :

शासनाने लागू केलेल्या संचारबंदीमुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर नागरिकांना बाहेर पडता येणार नाही. त्यामुळे याचा महामंडळाच्या प्रवासी संख्येवर परिणाम होणार असून, आगारात प्रवासी असल्यावरच बसेस सोडण्यात येतील. नेहमीप्रमाणे वेळापत्रकानुसार बसेस सोडण्यात येणार नाहीत.मात्र, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या नागरिकांसाठी तत्काळ बसेस सोडण्यात येतील.

प्रज्ञेश बोरसे, आगार व्यवस्थापक, जळगाव आगार