शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
6
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
7
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
8
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
9
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
10
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
11
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
12
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
13
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
14
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
15
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
16
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
17
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
18
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
19
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
20
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
Daily Top 2Weekly Top 5

आगारात प्रवासी असल्यावरच सोडण्यात येणार बसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:15 IST

आगार व्यवस्थापकांची माहिती: मात्र, अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांठीही तात्काळ बस सुटणार जळगाव : शासनाने लागू केलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर आगार ...

आगार व्यवस्थापकांची माहिती: मात्र, अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांठीही तात्काळ बस सुटणार

जळगाव : शासनाने लागू केलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर आगार प्रशासनातर्फे वाहतुकीच्या नियमामध्ये गुरुवारपासून बदल करण्यात आले असून, दैनंदिन वेळापत्रकाप्रमाणे बसेस न सोडता, आगारात प्रवासी असल्यावरच बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक प्रज्ञेश बोरसे यांनी ‘लोकमत’ला दिली. मात्र, जवळच्या तालुक्यात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या नागरिकांसाठी तत्काळ बसेस सोडण्यात येणार असल्याचेही बोरसे यांनी सांगितले.

शासनाने संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या नागरिकांनाच घराबाहेर पडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बाहेरील गावाहून जळगावकडे येणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी राहण्याची शक्यता आहे. तर जळगावहून बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांचीही संख्या कमी राहणार आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करता जळगाव आगारातर्फे गुरुवारपासून वेळापत्रकाप्रमाणे बसेस न सोडता, प्रवासी उपलब्ध झाल्यावरच बसेस सोडण्यात येणार आहेत. जर पुरेसे प्रवासी उपलब्ध झाले नाही, तर बसेसही सुटणार नाही. त्यामुळे वेळापत्रकाप्रमाणे जळगाव आगारातून धुळे, औरंगाबाद, नाशिक, पुणे, विरार, चाळीसगाव या ठिकाणी एकही बस रवाना होणार नाही. मात्र, अत्यावश्यक सेवेतील ग्रामीण, तसेच जिल्ह्यातील इतर तालुक्याच्या ठिकाणी जाणारे नागरिक आले, तर त्यांच्यासाठी तत्काळ बसेस सोडण्यात येणार आहेत. शासनाच्या सूचनेनुसार ३० एप्रिलपर्यंत महामंडळाचे हे नियोजन कायम राहणार आहे.

इन्फो :

तर उत्पन्न अधिकच घटणार

संचारबंदीच्या या काळात महामंडळाची सेवा ८० टक्के बंदच राहण्याची शक्यता आहे. कारण, शासनाच्या सूचनेनुसार अत्यावश्यक सेवा देणाऱ्या नागरिकांच बाहेर फिरण्याची सक्ती असल्याने परिणामी प्रवासी संख्येवरही याचा मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे सध्या कोरोना काळात येत असलेले साडेतीन ते चार लाखांपर्यंतचे उत्पन्न आता संचारबंदीच्या काळात अधिकच घटणार असल्याचा अंदाज आगार प्रशासनातर्फे वर्तविण्यात आला.

इन्फो:

निर्जंतुक करूनच बाहेरगावी बस रवाना

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महामंडळातर्फे प्रत्येक बसचे निर्जंतुकीकरण करूनच बाहेरगावी सोडण्यात येत असल्याचे आगार प्रशासनातर्फे सांगण्यात सांगितले. तसेच चालक व वाहकांना मास्क असणाऱ्या प्रवाशांच बसेसमध्ये प्रवेश देण्याबाबत सूचना करण्यात आल्या असून, महामंडळातर्फे याची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. तसेच मनपाच्या पथकामार्फत विनामास्क प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले.

इन्फो :

शासनाने लागू केलेल्या संचारबंदीमुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर नागरिकांना बाहेर पडता येणार नाही. त्यामुळे याचा महामंडळाच्या प्रवासी संख्येवर परिणाम होणार असून, आगारात प्रवासी असल्यावरच बसेस सोडण्यात येतील. नेहमीप्रमाणे वेळापत्रकानुसार बसेस सोडण्यात येणार नाहीत.मात्र, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या नागरिकांसाठी तत्काळ बसेस सोडण्यात येतील.

प्रज्ञेश बोरसे, आगार व्यवस्थापक, जळगाव आगार