शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
5
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
6
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
7
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
8
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
9
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
10
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
11
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
12
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
13
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
14
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
15
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
16
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
17
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
18
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
19
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
20
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?

आगारात प्रवासी असल्यावरच सोडण्यात येणार बसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:15 IST

आगार व्यवस्थापकांची माहिती: मात्र, अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांठीही तात्काळ बस सुटणार जळगाव : शासनाने लागू केलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर आगार ...

आगार व्यवस्थापकांची माहिती: मात्र, अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांठीही तात्काळ बस सुटणार

जळगाव : शासनाने लागू केलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर आगार प्रशासनातर्फे वाहतुकीच्या नियमामध्ये गुरुवारपासून बदल करण्यात आले असून, दैनंदिन वेळापत्रकाप्रमाणे बसेस न सोडता, आगारात प्रवासी असल्यावरच बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक प्रज्ञेश बोरसे यांनी ‘लोकमत’ला दिली. मात्र, जवळच्या तालुक्यात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या नागरिकांसाठी तत्काळ बसेस सोडण्यात येणार असल्याचेही बोरसे यांनी सांगितले.

शासनाने संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या नागरिकांनाच घराबाहेर पडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बाहेरील गावाहून जळगावकडे येणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी राहण्याची शक्यता आहे. तर जळगावहून बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांचीही संख्या कमी राहणार आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करता जळगाव आगारातर्फे गुरुवारपासून वेळापत्रकाप्रमाणे बसेस न सोडता, प्रवासी उपलब्ध झाल्यावरच बसेस सोडण्यात येणार आहेत. जर पुरेसे प्रवासी उपलब्ध झाले नाही, तर बसेसही सुटणार नाही. त्यामुळे वेळापत्रकाप्रमाणे जळगाव आगारातून धुळे, औरंगाबाद, नाशिक, पुणे, विरार, चाळीसगाव या ठिकाणी एकही बस रवाना होणार नाही. मात्र, अत्यावश्यक सेवेतील ग्रामीण, तसेच जिल्ह्यातील इतर तालुक्याच्या ठिकाणी जाणारे नागरिक आले, तर त्यांच्यासाठी तत्काळ बसेस सोडण्यात येणार आहेत. शासनाच्या सूचनेनुसार ३० एप्रिलपर्यंत महामंडळाचे हे नियोजन कायम राहणार आहे.

इन्फो :

तर उत्पन्न अधिकच घटणार

संचारबंदीच्या या काळात महामंडळाची सेवा ८० टक्के बंदच राहण्याची शक्यता आहे. कारण, शासनाच्या सूचनेनुसार अत्यावश्यक सेवा देणाऱ्या नागरिकांच बाहेर फिरण्याची सक्ती असल्याने परिणामी प्रवासी संख्येवरही याचा मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे सध्या कोरोना काळात येत असलेले साडेतीन ते चार लाखांपर्यंतचे उत्पन्न आता संचारबंदीच्या काळात अधिकच घटणार असल्याचा अंदाज आगार प्रशासनातर्फे वर्तविण्यात आला.

इन्फो:

निर्जंतुक करूनच बाहेरगावी बस रवाना

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महामंडळातर्फे प्रत्येक बसचे निर्जंतुकीकरण करूनच बाहेरगावी सोडण्यात येत असल्याचे आगार प्रशासनातर्फे सांगण्यात सांगितले. तसेच चालक व वाहकांना मास्क असणाऱ्या प्रवाशांच बसेसमध्ये प्रवेश देण्याबाबत सूचना करण्यात आल्या असून, महामंडळातर्फे याची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. तसेच मनपाच्या पथकामार्फत विनामास्क प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले.

इन्फो :

शासनाने लागू केलेल्या संचारबंदीमुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर नागरिकांना बाहेर पडता येणार नाही. त्यामुळे याचा महामंडळाच्या प्रवासी संख्येवर परिणाम होणार असून, आगारात प्रवासी असल्यावरच बसेस सोडण्यात येतील. नेहमीप्रमाणे वेळापत्रकानुसार बसेस सोडण्यात येणार नाहीत.मात्र, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या नागरिकांसाठी तत्काळ बसेस सोडण्यात येतील.

प्रज्ञेश बोरसे, आगार व्यवस्थापक, जळगाव आगार