शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
3
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
4
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
5
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
6
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
7
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
8
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
9
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
10
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
11
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
12
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
13
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
14
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
15
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
16
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
17
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
18
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
19
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
20
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब

सुरक्षा पेटीला लागलेल्या आगीत दहा मीटर जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:12 IST

महावितरणतर्फे वीज चोरीला आळा घालण्यासाठी गेल्या वर्षी वीज चोरीचे प्रमाण असलेल्या सुप्रीम कॉलनी, रामवाडी, हुडको परीसर, कांचन नगर ...

महावितरणतर्फे वीज चोरीला आळा घालण्यासाठी गेल्या वर्षी वीज चोरीचे प्रमाण असलेल्या सुप्रीम कॉलनी, रामवाडी, हुडको परीसर, कांचन नगर व शिवाजी नगर या भागातील नागरिकांचे वीज मीटर घराबाहेर बसविण्यात आले आहेत. एका खांबावर साधारणतः ८ ते १० नागरिकांचे मीटर बसवून, त्यावर सुरक्षिततेसाठी फायबर प्लॅस्टिकची पेटी बसविली आहे. तसेच या पेटीला बाहेरून कुलूपही लावले आहे. ज्यामुळे नागरिकांना मीटरमध्ये फेरफार करता येणार नाही, अशा प्रकारचे नियोजन केले आहे. मात्र, शुक्रवारी पहाटे शिवाजी नगरात एका विद्युत खांबावर बसविण्यात आलेल्या वीज मीटर पेटीला अचानक आग लागली. या आगीत येथील दहा नागरिकांच्या घराचे वीज मीटर अवघ्या दहा मिनिटांत खाक झाले. परिणामी यामुळे नागरिकाचांही वीजपुरवठा खंडित झाला आहे.

इन्फो :

तर विरोध असल्यामुळे ‘आग’ लावली असल्याचा अभियंत्याचा दावा

या आगीबाबत या भागातील महावितरणचे सहायक अभियंता हर्षल इंगळे यांना ‘लोकमत’ प्रतिनिधीने विचारले असता, इंगळे यांनी वीज चोरीला आळा घालण्यासाठी नागरिकांचे मीटर घराबाहेर वीज खांबावर बसविले आहे. मात्र, सुरुवातीपासूनच वीज मीटर बाहेर लावण्याला नागरिकांचा विरोध होता. त्यामुळे विरोध करणाऱ्यानींच ही आग लावली आहे. आतापर्यंत ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या पेट्या बसविल्या आहेत. त्या ठिकाणी उष्णतेमुळे किंवा तांत्रिक कारणामुळे शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याचा प्रकार घडलेला नाही. शिवाजी नगरातच दोनदा हा प्रकार घडला. फेब्रुवारी महिन्यातही शिवाजी नगरात या पेटीची तोडफोड केल्याप्रकरणी पोलीस तक्रार अर्ज दिला आहे. तर आताही ज्या नागरिकांमधून विरोध होत आहे. त्यांनीच वीज मीटर पेटीला आग लावल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या प्रकाराबाबत आपण पोलीस ठाण्यात पुन्हा तक्रार करणार असल्याचे इंगळे यांनी सांगितले.

इन्फो :

तर शॉर्ट सर्किट किंवा उष्णतेमुळे आग लागल्याचा नागरिकांचा दावा

चार दिवसांपूर्वी लाकूडपेठेत एका खांबावर बसविण्यात आलेल्या वीज मीटर पेटीला दिवसाढवळ्या आग लागली होती. तर आता पुन्हा शिवाजीनगर लाकूड पेठेजवळच एका वीज मीटर पेटीला ही आग लागली. महावितरणतर्फे बसविण्यात आलेल्या फायबरच्या प्लॅस्टिक पेट्या उन्हामुळे निर्माण होणाऱ्या उष्णतेतून पेट घेत असाव्यात किंवा शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागण्याचा संशय व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे या भागातील नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी स्वत: आठवडाभरात दोनदा लागलेल्या आगीबाबत या वीज मीटर पेट्या काढण्याबाबत महावितरणकडे तक्रार केली आहे. तसेच पुन्हा असा प्रकार घडल्यास आंदोलन करण्याचा इशाराही दारकुंडे यांनी दिला आहे.