शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

एकाच रात्री पिंप्राळा व चैत्रबन कॉलनीत घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:15 IST

दोन्ही ठिकाणी प्रत्येकी १७ हजारांचा ऐवज लंपास : चोरटे सीसीटीव्हीत कैद जळगाव : अक्षय तृतीयेनिमित्त घरे बंद असल्याची ...

दोन्ही ठिकाणी प्रत्येकी १७ हजारांचा ऐवज लंपास : चोरटे सीसीटीव्हीत कैद

जळगाव : अक्षय तृतीयेनिमित्त घरे बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी शहरात एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोडी केल्या. चैत्रबन कॉलनीत नारायण धर्मा पाटील यांच्या घरातून ८ हजार रुपयांची रोकड तर पिंप्राळा हुडकोत समाधान बाळू पाटील यांच्या घरातून १७ हजारांची रोकड लांबविण्यात आलेली आहे दरम्यान, समाधान पाटील यांच्या घरात चोरी करताना चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समाधान पाटील हा तरुण पिंप्राळा हुडकोत शासकीय रुग्णालयाच्या मागील बाजूस आई पत्नी व मुलगी या कुटुंबासह वास्तव्यास आहे. घरातच ओम साई नावाने किराणा दुकान आहे. त्यावर त्यांचा उदरनिर्वाह भागतो. १३ एप्रिल रोजी समाधान पाटील हा परिवारासह त्याच्या बहिणीकडे सोमेश्‍वर कांतीपूर, बारामती याठिकाणी गेला होता. शनिवारी सकाळी साडेसात वाजता जळगावात परतला. यावेळी घराचे कुलूप व कडी कोयंडा तुटलेले दिसले. घरात तसेच किराणा दुकानातील वस्तू अस्ताव्यस्त पडल्या होत्या. कपाटातील १७ हजारांची रोकड तसेच किराणा दुकानातील इतर किरकोळ वस्तू चोरीस गेल्याचे दिसून आले. चोरट्यांनी घरात सर्वत्र गुटखा खावून थुंकलेले होते, परततांना सीसीटीव्ही कॅमेराही फोडला. मात्र कॅमेरा फोडण्यापूर्वी घरात प्रवेश करतांना तिघे चोरटे कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. चोरीची झाल्याची खात्री झाल्यावर समाधान याने रामानंदनगर पोलिसात तक्रारीसाठी धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांना दाखविले.

चैत्रबन कॉलनीत अक्षय तृतीयेला घरफोडी

चैत्रबन कॉलनीत नारायण धर्मा पाटील (६८) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ८ हजार रुपये हजार रुपये व ९ हजार रुपयांचे चांदीचे भांडे असा १७ हजार रुपयांचा ऐवज लांबवल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शनिवारी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

नारायण पाटील हे खासगी कंपनीत नोकरीला आहेत. पत्नी चेतना, मुलगा योगेंद्र व सचिन अशांसह ते चैत्रबन काॅलनीत वास्तव्याला आहेत. अक्षयतृतीयेसाठी ९ मे रोजी सकाळी नऊ वाजता ते पातोंडी, ता. रावेर या मूळ गावी गेले होते. गावाला जाताना घराची चावी मुलाचा मित्र अभिनव चौधरी याच्याकडे ठेवली होती. घरातील फिश टँकमधील माशांना खाद्य टाकण्यासाठी अभिनव शुक्रवारी सकाळी दहा वाजता त्यांच्या घरी गेला असता मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला दिसून आला. अभिनव याने ही माहिती पाटील यांना कळवली. हे कुटुंब शनिवारी घरी आले असता कपाटात ठेवलेले आठ हजार रुपये व चांदीची भांडी दिसून आली नाहीत. घरफोडी झाल्याची खात्री झाल्यानंतर पाटील यांनी शनिवारी रामानंद नगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.