शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

चहार्डी येथील ९० लाख रुपये खर्चून उभारलेला बंधारा दूर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 19:20 IST

चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील कोल्हापूर पद्धतीचा गेल्या पंधरा वर्षांपासून ९० लाख रुपये खर्चून उभारलेला बंधारा लघुसिंचन विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे दुर्लक्षित झाला असून शासनाच्या पैशांचा चुराडा झाला आहे. विशेष म्हणजे स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थांचीही बंधाऱ्याविषयी अनास्था असल्याने संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देपंधरा वर्षात केवळ एकदाच झाला बंधाºयात पाणी साठाबंधाºयाच्या फळ्या चोरीस, तर काही सडून गेल्याग्रामपंचायतीकडे हस्तांतरणदेखील नाही

लोकमत आॅनलाईनसंजय सोनवणेचोपडा, दि.१९ : एकीकडे आपल्या भागातील नदीवर बंधारे उभारावेत यासाठी काही गावातील ग्रामस्थ वारंवार उपोषण करीत असतांना मात्र चहार्डी येथे लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या बंधाºयाकडे तब्बल पंधरा वर्षांपासून दूर्लक्ष झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. केवळ एकदाच पाणी साठवण झालेला हा बंधारा किरकोळ दुरूस्तीच्या उपेक्षेमुळे आज मरणप्राय अवस्थेत उभा असून लोकप्रतिनिधींसह गावकºयांच्याही अनास्थेचा तो बळी ठरला आहे. यामुळे सुज्ञ नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.सद्याच्या पाणी टंचाईच्या काळात थेंब थेंब पाण्याला महत्व आले आहे. मात्र पंचायत समितीच्या लघुसिंचन विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे चहार्डी. ता चोपडा येथील चंपावती व रत्नावती नद्यांच्या संगमापासून अर्ध्या किलोमीटर अंतरावर गेल्या पंधरा वर्षांपासून ९० लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेला कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा दुर्लक्षित झाला आहे.हस्तांतरणदेखील नाहीविशेष म्हणजे पंधरा वर्षांपूर्वी काम पूर्ण झालेला हा बंधारा बांधून लघु सिंचन विभागाकडून ग्रामपंचायतीकडे हस्तांतरणाची औपचारिकताही पूर्ण करण्यात आलेली नाही. यात शासनाचा ९० लाख रुपयांचा चुराडा झाला आहे. या बंधाºयात पाणी अडविण्यासाठी पंधरा वर्षांपूर्वी आणण्यात आलेल्या लोखंडी फळ्या वापर न झाल्याने जागेवरच पडून पडून अखेर सडून गेल्यात. काही फळ्या ग्रामस्थांनी बसण्यासाठी बाकडा करण्यासाठी पळवून नेल्या आहेत तर काही फळ्या भंगार चोरांनी चोरून नेल्या आहेत. मात्र याबाबत स्थानिक आजी माजी पदाधिकाºयांना, सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांना काहीच सोयरं सुतक नसल्याचे चित्र सध्यातरी समोर आले आहे. शासनाने एवढा मोठा निधी खर्च करून बंधारा बांधला खरा, परंतु त्याची देखभालीची जबाबदारी घ्यायला कोणीही पुढे सरसावत नसल्याने पाणी अडविण्याबाबत उदासिनता दिसून येत आहे. सध्या चहार्डी गावातच पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई असताना या बंधाºयात पाणी अडविण्यासाठी काहीच हालचाल होत नसेल तर ते येथील ग्रामस्थांचे दुर्भाग्य समजावे लागेल.खासदारांनाही पडला विसरदरम्यान, गेल्या वर्षी २९ जून रोजी येथील दोन्ही नद्यांना महापूर आल्याने व बंधाºयात कचरा अडकून चहार्डी गावात पाणी घुसून हानी झाली होती. त्यावेळी खासदार रक्षा खडसे पाहणीसाठी आल्या असता त्यांनी कोल्हापुरी बंधाºयाची उंची कमी करण्याचे आश्वासन बाधित ग्रामस्थांना दिले होते. मात्र खडसे यांना याचा विसर पडल्याने या बंधाºयाची ना उंची कमी करण्यात आली, ना हा बंधारा अधिकाºयांच्या सांगण्यानुसार दुरुस्त करण्यात आला. जे येतात ते केवळ भेट देऊन जातात व वेळ मारून नेतात. आता पावसाळा सुरू होण्याची वेळ येऊन ठेपली तरी कोणताच निर्णय झाला नसल्याने पुन्हा नद्यांचे पाणी गावात घुसेल आणि तोच कित्ता गिरवला जाईल, असे बोलले जात आहे. मात्र या विषयावर गावातील जाणकार नागरिक एकत्र येऊन आवाज उठविण्यासाठी तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याच्या पवित्र्यात असल्याचे समजले आहे. या प्रश्नाकडे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीदेखील लक्ष घालणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे. 

टॅग्स :Chopdaचोपडा