शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

चहार्डी येथील ९० लाख रुपये खर्चून उभारलेला बंधारा दूर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 19:20 IST

चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील कोल्हापूर पद्धतीचा गेल्या पंधरा वर्षांपासून ९० लाख रुपये खर्चून उभारलेला बंधारा लघुसिंचन विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे दुर्लक्षित झाला असून शासनाच्या पैशांचा चुराडा झाला आहे. विशेष म्हणजे स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थांचीही बंधाऱ्याविषयी अनास्था असल्याने संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देपंधरा वर्षात केवळ एकदाच झाला बंधाºयात पाणी साठाबंधाºयाच्या फळ्या चोरीस, तर काही सडून गेल्याग्रामपंचायतीकडे हस्तांतरणदेखील नाही

लोकमत आॅनलाईनसंजय सोनवणेचोपडा, दि.१९ : एकीकडे आपल्या भागातील नदीवर बंधारे उभारावेत यासाठी काही गावातील ग्रामस्थ वारंवार उपोषण करीत असतांना मात्र चहार्डी येथे लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या बंधाºयाकडे तब्बल पंधरा वर्षांपासून दूर्लक्ष झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. केवळ एकदाच पाणी साठवण झालेला हा बंधारा किरकोळ दुरूस्तीच्या उपेक्षेमुळे आज मरणप्राय अवस्थेत उभा असून लोकप्रतिनिधींसह गावकºयांच्याही अनास्थेचा तो बळी ठरला आहे. यामुळे सुज्ञ नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.सद्याच्या पाणी टंचाईच्या काळात थेंब थेंब पाण्याला महत्व आले आहे. मात्र पंचायत समितीच्या लघुसिंचन विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे चहार्डी. ता चोपडा येथील चंपावती व रत्नावती नद्यांच्या संगमापासून अर्ध्या किलोमीटर अंतरावर गेल्या पंधरा वर्षांपासून ९० लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेला कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा दुर्लक्षित झाला आहे.हस्तांतरणदेखील नाहीविशेष म्हणजे पंधरा वर्षांपूर्वी काम पूर्ण झालेला हा बंधारा बांधून लघु सिंचन विभागाकडून ग्रामपंचायतीकडे हस्तांतरणाची औपचारिकताही पूर्ण करण्यात आलेली नाही. यात शासनाचा ९० लाख रुपयांचा चुराडा झाला आहे. या बंधाºयात पाणी अडविण्यासाठी पंधरा वर्षांपूर्वी आणण्यात आलेल्या लोखंडी फळ्या वापर न झाल्याने जागेवरच पडून पडून अखेर सडून गेल्यात. काही फळ्या ग्रामस्थांनी बसण्यासाठी बाकडा करण्यासाठी पळवून नेल्या आहेत तर काही फळ्या भंगार चोरांनी चोरून नेल्या आहेत. मात्र याबाबत स्थानिक आजी माजी पदाधिकाºयांना, सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांना काहीच सोयरं सुतक नसल्याचे चित्र सध्यातरी समोर आले आहे. शासनाने एवढा मोठा निधी खर्च करून बंधारा बांधला खरा, परंतु त्याची देखभालीची जबाबदारी घ्यायला कोणीही पुढे सरसावत नसल्याने पाणी अडविण्याबाबत उदासिनता दिसून येत आहे. सध्या चहार्डी गावातच पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई असताना या बंधाºयात पाणी अडविण्यासाठी काहीच हालचाल होत नसेल तर ते येथील ग्रामस्थांचे दुर्भाग्य समजावे लागेल.खासदारांनाही पडला विसरदरम्यान, गेल्या वर्षी २९ जून रोजी येथील दोन्ही नद्यांना महापूर आल्याने व बंधाºयात कचरा अडकून चहार्डी गावात पाणी घुसून हानी झाली होती. त्यावेळी खासदार रक्षा खडसे पाहणीसाठी आल्या असता त्यांनी कोल्हापुरी बंधाºयाची उंची कमी करण्याचे आश्वासन बाधित ग्रामस्थांना दिले होते. मात्र खडसे यांना याचा विसर पडल्याने या बंधाºयाची ना उंची कमी करण्यात आली, ना हा बंधारा अधिकाºयांच्या सांगण्यानुसार दुरुस्त करण्यात आला. जे येतात ते केवळ भेट देऊन जातात व वेळ मारून नेतात. आता पावसाळा सुरू होण्याची वेळ येऊन ठेपली तरी कोणताच निर्णय झाला नसल्याने पुन्हा नद्यांचे पाणी गावात घुसेल आणि तोच कित्ता गिरवला जाईल, असे बोलले जात आहे. मात्र या विषयावर गावातील जाणकार नागरिक एकत्र येऊन आवाज उठविण्यासाठी तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याच्या पवित्र्यात असल्याचे समजले आहे. या प्रश्नाकडे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीदेखील लक्ष घालणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे. 

टॅग्स :Chopdaचोपडा