शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
4
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
5
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
6
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
7
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
8
१०० वर्षांनी शुभ योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: ६ मूलांकांचे ग्रहण सुटेल; पैसा-लाभ-वरदान!
9
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
10
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
11
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
12
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
13
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
14
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
15
Vivo Y50i: झटक्यात चार्ज होणार आणि दिर्घकाळ चालणार; विवोचा बजेट स्मार्टफोन बाजारात!
16
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
17
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
18
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
19
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
20
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क

चहार्डी येथील ९० लाख रुपये खर्चून उभारलेला बंधारा दूर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 19:20 IST

चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील कोल्हापूर पद्धतीचा गेल्या पंधरा वर्षांपासून ९० लाख रुपये खर्चून उभारलेला बंधारा लघुसिंचन विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे दुर्लक्षित झाला असून शासनाच्या पैशांचा चुराडा झाला आहे. विशेष म्हणजे स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थांचीही बंधाऱ्याविषयी अनास्था असल्याने संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देपंधरा वर्षात केवळ एकदाच झाला बंधाºयात पाणी साठाबंधाºयाच्या फळ्या चोरीस, तर काही सडून गेल्याग्रामपंचायतीकडे हस्तांतरणदेखील नाही

लोकमत आॅनलाईनसंजय सोनवणेचोपडा, दि.१९ : एकीकडे आपल्या भागातील नदीवर बंधारे उभारावेत यासाठी काही गावातील ग्रामस्थ वारंवार उपोषण करीत असतांना मात्र चहार्डी येथे लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या बंधाºयाकडे तब्बल पंधरा वर्षांपासून दूर्लक्ष झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. केवळ एकदाच पाणी साठवण झालेला हा बंधारा किरकोळ दुरूस्तीच्या उपेक्षेमुळे आज मरणप्राय अवस्थेत उभा असून लोकप्रतिनिधींसह गावकºयांच्याही अनास्थेचा तो बळी ठरला आहे. यामुळे सुज्ञ नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.सद्याच्या पाणी टंचाईच्या काळात थेंब थेंब पाण्याला महत्व आले आहे. मात्र पंचायत समितीच्या लघुसिंचन विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे चहार्डी. ता चोपडा येथील चंपावती व रत्नावती नद्यांच्या संगमापासून अर्ध्या किलोमीटर अंतरावर गेल्या पंधरा वर्षांपासून ९० लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेला कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा दुर्लक्षित झाला आहे.हस्तांतरणदेखील नाहीविशेष म्हणजे पंधरा वर्षांपूर्वी काम पूर्ण झालेला हा बंधारा बांधून लघु सिंचन विभागाकडून ग्रामपंचायतीकडे हस्तांतरणाची औपचारिकताही पूर्ण करण्यात आलेली नाही. यात शासनाचा ९० लाख रुपयांचा चुराडा झाला आहे. या बंधाºयात पाणी अडविण्यासाठी पंधरा वर्षांपूर्वी आणण्यात आलेल्या लोखंडी फळ्या वापर न झाल्याने जागेवरच पडून पडून अखेर सडून गेल्यात. काही फळ्या ग्रामस्थांनी बसण्यासाठी बाकडा करण्यासाठी पळवून नेल्या आहेत तर काही फळ्या भंगार चोरांनी चोरून नेल्या आहेत. मात्र याबाबत स्थानिक आजी माजी पदाधिकाºयांना, सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांना काहीच सोयरं सुतक नसल्याचे चित्र सध्यातरी समोर आले आहे. शासनाने एवढा मोठा निधी खर्च करून बंधारा बांधला खरा, परंतु त्याची देखभालीची जबाबदारी घ्यायला कोणीही पुढे सरसावत नसल्याने पाणी अडविण्याबाबत उदासिनता दिसून येत आहे. सध्या चहार्डी गावातच पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई असताना या बंधाºयात पाणी अडविण्यासाठी काहीच हालचाल होत नसेल तर ते येथील ग्रामस्थांचे दुर्भाग्य समजावे लागेल.खासदारांनाही पडला विसरदरम्यान, गेल्या वर्षी २९ जून रोजी येथील दोन्ही नद्यांना महापूर आल्याने व बंधाºयात कचरा अडकून चहार्डी गावात पाणी घुसून हानी झाली होती. त्यावेळी खासदार रक्षा खडसे पाहणीसाठी आल्या असता त्यांनी कोल्हापुरी बंधाºयाची उंची कमी करण्याचे आश्वासन बाधित ग्रामस्थांना दिले होते. मात्र खडसे यांना याचा विसर पडल्याने या बंधाºयाची ना उंची कमी करण्यात आली, ना हा बंधारा अधिकाºयांच्या सांगण्यानुसार दुरुस्त करण्यात आला. जे येतात ते केवळ भेट देऊन जातात व वेळ मारून नेतात. आता पावसाळा सुरू होण्याची वेळ येऊन ठेपली तरी कोणताच निर्णय झाला नसल्याने पुन्हा नद्यांचे पाणी गावात घुसेल आणि तोच कित्ता गिरवला जाईल, असे बोलले जात आहे. मात्र या विषयावर गावातील जाणकार नागरिक एकत्र येऊन आवाज उठविण्यासाठी तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याच्या पवित्र्यात असल्याचे समजले आहे. या प्रश्नाकडे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीदेखील लक्ष घालणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे. 

टॅग्स :Chopdaचोपडा